शहरं
Join us  
Trending Stories
1
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
2
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
3
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
4
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
5
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
6
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
7
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
8
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
9
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
10
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
11
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
12
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
13
Pitru Paksha 2025: दक्षिणेला श्राद्ध केले जाते, पण शुभ कार्य नाही; मात्र शिवलिंगाची दिशा तीच!!
14
कोल्हापूरच्या पठ्ठ्याने बनवले भारी AI टूल; डेटा सायंटिस्टस, ॲनालिस्ट्स यांना होणार फायदा
15
"माझे आईबाबा शेतकरी आहेत, त्यामुळे...", ललित प्रभाकरने सांगितला कुटुंबाचा संघर्षकाळ
16
Ladki Bahin Yojana: 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने'च्या ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी येणार? आदिती तटकरेंनी दिली माहिती
17
Asia Cup 2025: IND vs PAK सामन्यात 'अशी' असेल टीम इंडियाची Playing XI; माजी क्रिकेटरचा दावा
18
आरोग्य सांभाळा! जीभेचे चोचले पडतील महागात; मीठ, साखर, तेल... रोज किती खाणं योग्य?
19
तालिबानचे नवे फर्मान! इस्लामविरोधी असल्याचे सांगत अफगाण शाळांमधून काढून टाकले ५१ विषय
20
सणासुदीपूर्वी सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा घसरण; खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याची नवी किंमत

महाविद्यालयांच्या चुकीमुळे शिष्यवृत्तीचे ९८ कोटी परत गेले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2020 09:29 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : महाविद्यालयाच्या चुकीचा फटका गरीब, मागास विद्यार्थ्यांना बसत आहे. महाविद्यालयांनी योग्यप्रकारे अर्ज न भरल्याने शिष्यवृत्तीचे ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : महाविद्यालयाच्या चुकीचा फटका गरीब, मागास विद्यार्थ्यांना बसत आहे. महाविद्यालयांनी योग्यप्रकारे अर्ज न भरल्याने शिष्यवृत्तीचे ९८ कोटी रुपये शासनाकडे परत गेल्याने लाखो विद्यार्थी शिष्यवृत्ती लाभापासून वंचित राहिल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. समाजकल्याण विभागाने अशा महाविद्यालयांना समज दिली असून पुन्हा असे झाले तर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.

मागास विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेण्याकरता शिष्यवृत्तीची व्यवस्था करून देण्यात आली. अनुसूचित जाती, ओबीसी वर्गांतील विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर येणार खर्च शासनाकडून शिष्यवृत्तीच्या माध्यमातून देण्यात येतो. परंतु गेल्या काही वर्षांत शासनाकडून नियमितपणे रक्कम देण्यात येत नाही. यामुळे विद्यार्थांंची मोठी कोंडी होत आहे. ज्या संस्थांमध्ये विद्यार्थी शिक्षण घेत आहेत त्या संस्थांमधील संचालक शिक्षण शुल्क भरण्यासाठी तगादा लावत आहे. त्यामुळे आधीच अडचणीत सापडलेल्या विद्यार्थ्यांसमोर नवीन संकट उभे राहिले आहे. दुसरीकडे विद्यार्थ्‍यांचे अर्ज भरण्याची जबाबदारी महाविद्यालयांची आहे. त्यांच्याकडून योग्यप्रकारे अर्ज न भरल्याने लाखो विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळाली नाही. म्हणून महाविद्यालयांकडून शुल्कासाठी तगादा लावण्यात येतो. यामुळे अनेक विद्यार्थ्यांवर शिक्षण सोडण्याची वेळ आल्याचे सांगण्यात येते. महाविद्यालयांच्या चुकीमुळे विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीचे ९८ कोटी रुपये शासनास परत गेले. यामुळे गरीब विद्यार्थ्यांचे नुकसान झाले. मिळालेल्या माहितीनुसार नागपूर विभागील ५ हजार विद्यार्थ्यांंचे अर्ज अद्याप महाविद्यालयातच पडून आहेत.

काेट

शिष्यवृत्तीचे ९८ कोटी रुपये शासनास परत आले. यात महाविद्यालयांची चुकी आहे. त्यामुळे अशा महाविद्यालयांवर कारवाई करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांकडून परीक्षा व इतर शुल्काची नियमबाह्य वसुली करणाऱ्यांवर सुद्धा कारवाई करण्याचे आदेश सहाय्यक आयुक्तांना दिले.

डॉ. प्रशांत नारनवरे, आयुक्त, समाजकल्याण विभाग