शहरं
Join us  
Trending Stories
1
उबाठा म्हणजे युज ॲण्ड थ्रो पार्टी, त्यांचा जीव मुंबई महानगरपालिकेच्या तिजोरीत; एकनाथ शिंदे यांची टीका
2
Pahalgam Terror Attack: कलमा पढायला सांगितलं, पँट काढली अन्...! पहलगाममध्ये दहशतवाद्यांचा उन्माद; धर्म विचारून २७ जणांची हत्या
3
हा देशाच्या एकता व अखंडतेवर हल्ला, पहलगाम हल्ल्याचा संघाकडून निषेध
4
हॉस्टेलच्या रूममध्येच 'ती'ने संपविले जीवन; सोलापुरातील धक्कादायक घटना
5
KL राहुलचं एकमद कूल सेलिब्रेशन! मग संजीव गोयंका यांच्या हातात हात दिला; पण... (VIDEO)
6
लग्नानंतर सातव्या दिवशीच नौदलाच्या अधिकाऱ्याची दहशतवाद्यांकडून हत्या; हनिमूनसाठी गेले होते विनय नरवाल
7
अमरनाथ यात्रेपूर्वी जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; TRF च्या टेरर मॉड्यूलने चिंता वाढली
8
चोरीच्या आरोपातून दोन तरूणांना बैलबंडीला जुंपले; व्हीडिओ व्हायरल, १० जणांवर गुन्हा दाखल
9
IPL 2025 LSG vs DC : लखनौच्या संघासमोर केएल राहुलचा रुबाब; सिक्सर मारत संपवली मॅच
10
पहलगाम मध्ये तुमच्या ओळखीचे कुणी अडकले असेल तर 'या' तीन क्रमांकावर साधू शकता संपर्क
11
Rishabh Pant : पंतनं हिंमत दाखवली नाही की, तो किंमत शून्य झालाय? एक निर्णय अन् अनेक प्रश्न
12
महाराष्ट्रातल्या दोन पर्यटकांचा पहलगाम हल्ल्यात मृत्यू; पर्यटक जखमी असल्याची CM फडणवीसांची माहिती
13
"तुला मारणार नाही, जा आणि मोदींना सांग"; पतीची डोळ्यांसमोर हत्या केल्यानंतर दहशतवाद्यांनी पत्नीला धमकावलं
14
दररोज फक्त ₹7 ची बचत करा अन् दरमहा ₹5000 मिळवा; जाणून घ्या सरकारी योजनेचे फायदे...
15
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
16
मराठी मुलीच्या वडिलांना, काकांना दहशतवाद्यांनी नाव विचारून डोळ्यांदेखत गोळ्या घातल्या- एकनाथ शिंदे
17
"सरकारला धन्यवाद, पण पुन्हा एकदा सांगतो..."; हिंदी सक्तीच्या माघारीनंतर राज ठाकरेंचे ट्विट
18
पहलगाममध्ये टीआरएफने घडवला नरसंहार; दहशतवादी संघटनेने पत्र जारी करुन सांगितले कारण
19
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
20
‘यूपीएससी’त प्रज्ञाचक्षू विद्यार्थ्यांमध्ये मनू गर्ग देशात अव्वल

९० टक्के अन्ननलिकेच्या कॅन्सरचे उशिरा निदान  : श्रीकांत मुकेवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2020 22:59 IST

साधारण ९० टक्के या कॅन्सरचे निदान उशिरा होते. परिणामी, मृत्यूचे प्रमाण अधिक आहे, अशी माहिती प्रसिद्ध गॅस्ट्रोएन्ट्रोलॉजिस्ट डॉ. श्रीकांत मुकेवार यांनी दिली.

ठळक मुद्दे‘जीपीकॉन-२०२०’ परिषद शुक्रवारपासून

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : गुटखा, तंबाखू, धूम्रपान व दारूच्या व्यसनामुळे अन्ननलिकेचा कॅन्सरचे प्रमाण वाढले आहे. दीर्घ कालावधीच्या अ‍ॅसिडिटीमुळेही हा कॅन्सर होऊ शकतो. या कॅन्सरमध्ये अन्ननलिका दोन ते तीन सेंटीमीटरने अरुंद झाली तरी त्याचा त्रास जाणवत नाही. सुरुवातीला याकडे दुर्लक्ष होते. त्रास वाढल्यावरच रुग्ण डॉक्टरांकडे जातात. तोपर्यंत बराच उशीर झालेला असतो. यामुळे साधारण ९० टक्के या कॅन्सरचे निदान उशिरा होते. परिणामी, मृत्यूचे प्रमाण अधिक आहे, अशी माहिती प्रसिद्ध गॅस्ट्रोएन्ट्रोलॉजिस्ट डॉ. श्रीकांत मुकेवार यांनी दिली.मिडास मेडिकल फाऊंडेशन अ‍ॅण्ड रिसर्च इन्स्टिट्यूटच्यावतीने जठराच्या आजारावर ‘जीपीकॉन-२०२०’चे शुक्रवार २४ जानेवारी रोजी आयोजन करण्यात आले आहे; याची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रपरिषदेत ते बोलत होते. यावेळी डॉ. भाऊ राजूरकर, डॉ. प्रशांत देशमुख व डॉ. सौरभ मुकेवार उपस्थित होते.डॉ. मुकेवार म्हणाले, या परिषदेत अ‍ॅसिडिटी, डायरिया, यकृताचा आजार, ‘हेपेटायटिस-बी’ आदी आजारांच्या संदर्भातील अद्ययावत माहिती, नव्या उपचार पद्धतीवर चर्चासत्र, नव्या एण्डोस्कोपीच्या वापरातून आजाराचे निदान व उपचार, याशिवाय ‘कॉलीन जोस्कोपी’च्या मदतीने उपचार यावर प्रकाश टाकला जाणार आहे. परिषदेत डॉ. कुलविंदर दुवा, डॉ. सौरभ मुकेवार, डॉ. नरेश भट, डॉ. अजय दुसेजा, डॉ. रुपरॉय हे विविध विषयांवर मार्गदर्शन करतील. अजिनो मोटोमुळेही होऊ शकतो कॅन्सर‘अजिनो मोटो’च्या (मोनोसोडियम ग्लुटामेट) वापरामुळे पदार्थांची चव वाढत असली तरी याचे खूप वाईट परिणाम शरीरावर होतात. विशेषत: अन्ननलिकेचा कॅन्सर होण्याची शक्यता असते. प्रक्रिया केलेल्या खाद्यपदार्थांमुळेही हा कॅन्सर होऊ शकतो. गिळायला त्रास होणे, छातीत दुखणे, घास खाली घालण्यासाठी घासानंतर पाणी पिणे आवश्यक ठरणे, पुढे पुढे पाणी पितानाही अडकल्याचा त्रास जाणवणे व पाठीत दुखणे ही काही सामान्य लक्षणे आहेत. हा कॅन्सर टाळण्यासाठी रोजच्या आहारात भाज्या, फळे, झिंकचे प्रमाण वाढवायला हवे, असा सल्लाही डॉ. मुकेवार यांनी दिला.अ‍ॅसिडिटीवर स्वत:हून औषधे घेणे टाळावेएका प्रश्नाच्या उत्तरात डॉ. मुकेवार म्हणाले, अ‍ॅसिडिटी हा सामान्य आजार असला तरी यावर स्वत:हून औषधे घेऊ नये. वारंवार स्वत:हून औषधे घेतल्यास अतिसार, न्यूमोनिया होण्याचा धोका होऊ असू शकतो. यासोबतच मूत्रपिंडाचे आजार, डिमेन्शिया, हृदयविकाराचे आजारही होऊ शकतात. परंतु यासंदर्भातील पुरावे अद्यापही अपुरे आहेत.

टॅग्स :cancerकर्करोगnagpurनागपूर