शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू-काश्मीर पोलिसांची मोठी कारवाई, मुफ्ती इरफानला शोपियानमधून अटक; मोठे टेरर नेटवर्क उद्ध्वस्त
2
"ही पाकची जुनी खोड..."; इस्लामाबादच्या स्फोटाचं खापर भारतावर फोडणाऱ्या पाकिस्तानला मिळालं चोख उत्तर! 
3
न्यायालयाचा दणका! महिलांना मारहाण व शिवीगाळ केल्याप्रकरणी पुणे पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश
4
लाल किल्ला स्फोटात मोठा खुलासा! सुरक्षा यंत्रणांच्या जोरदार कारवाईमुळे मोठा धोका टळला
5
शेख हसीनानंतर आता युनूस सरकारविरोधात विद्यार्थी रस्त्यावर; बांगलादेशात पुन्हा चळवळ सक्रिय
6
बिहारमध्ये प्रशांत किशोर यांची जनसुराज्य खाते उघडणार? ८ एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादवांचे गणित बिघडले
7
लग्नाला नऊ वर्षे पूर्ण झाली, पतीने आपल्याच मित्रासोबत पत्नीचे लग्न लावून दिले; धक्कादायक कारण आले समोर
8
बिहारमध्ये काँग्रेसला मोठा धक्का! दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक संपताच मोठ्या नेत्याने दिला राजीनामा
9
Bihar Exit Poll : बिहारमध्ये उत्सुकता शिगेला! पहिला एक्झिट पोल आला, नितीश की तेजस्वी?
10
'तो शांत होता, त्याचे जास्त मित्र नव्हते'; दिल्ली बॉम्बस्फोटातील संशयित डॉक्टरच्या कुटुंबीयांची प्रतिक्रिया
11
राहुल द्रविडच्या लेकाची भारतीय U19 संघात वर्णी ; वैभव सूर्यवंशीचं नाव 'गायब' कारण...
12
छत्तीसगडच्या बीजापूरमध्ये मोठी चकमक, 6 नक्षलवादी ठार; मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त...
13
बॉसनं नोकरीवरून काढलं, पठ्ठ्यानं असं काही केलं की आता कंपनीला बसणार मोठा दंड!
14
फरीदाबाद मॉड्यूलचा खरा मास्टरमाईंड आला समोर; डॉक्टरांना कट्टरपंथी बनवणारा मौलवी इरफान अहमद कोण?
15
Travel : भारताशी कनेक्शन, 'या' देशात जाताच करोडपती व्हाल! परदेशवारीचा प्लॅन करताय तर नक्की विचार करा
16
ती चूक यामाहा नाही करणार...! पहिली वहिली इलेक्ट्रीक स्कूटर आली!  Aerox लूक; इतकी रेंज देणार की...
17
Delhi Red Fort Blast : जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्याचे कॉल डिटेल्स उघड; दिल्ली स्फोटाचं रहस्य उलगडलं, उमरने ‘तारिक’ नावाने घेतलं सिम कार्ड
18
Yamaha ची नव्या जमान्याची RX100...! स्टायलिश बाईक लाँच; किंमत फक्त ₹ १.** लाख!
19
IND vs SA : ईडन गार्डन्सच्या खेळपट्टीवर गंभीर नाराज; गांगुलीनं असं दिलं उत्तर
20
संत्र्याच्या साली कचरा समजून फेकून देता, थोडं थांबा... त्वचेसह घरालाही होईल मोठा फायदा

राज्यात १० वर्षात रानडुकरांकडून ८९ व्यक्तींचे बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2020 11:56 IST

Nagpur News मागील १० वर्षात रानडुकरांकडून राज्यात ८९ व्यक्तींचा मृत्यू झाला आहे.

ठळक मुद्देरानडुकरांचे शेतीपुढे संकट परवानगी घेऊन मारायला शेतकऱ्यांनी बंदुका आणायच्या कुठून ?

गोपालकृष्ण मांडवकरलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शेतकऱ्यांना सर्वाधिक उपसर्ग रानडुकरांकडून आणि रानम्हशींकडून आहे. रानडुकरांना वन विभागाची परवानगी घेऊन मारता येते, मात्र त्यासाठी नाचवल्या जाणाऱ्या कागदी घोड्यांची वाट किती पहायची, आणि परवानगी मिळाल्यावर बंदुका कुठून आणायच्या, असा शेतकऱ्यांपुढे असलेला प्रश्न आहे. विशेष म्हणजी मागील १० वर्षात रानडुकरांकडून राज्यात ८९ व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे हे संकट दोन्ही बाजूनी दिसत आहे.वन विभागाच्या नियमानुसार, बफर क्षेत्राच्या बाहेर असल्यास रानडुकरांचा बंदोबस्त करण्यासाठी आधी कायदेशीर परवानगी घ्यावी लागते. त्यावर वन विभाग परवानगी देतो. मात्र वाट बघावी लागते. या काळात रानडुकरांकडून डोळ्यादेखत होणारी नासधूस सहन होत नसल्याने शेतकरी गोळे खायला टाकून डुकरांना ठार करतात, परस्पर विल्हेवाटही लावतात. रानडुकरांना मारणे कायद्याने गुन्हा असला तरी शेतीचे अधिक नुकसान त्यांच्याकडूनच होते. त्यांच्या बंदोबस्तासाठी शेतकरी विजेचे सापळे लावतात. त्यात बरेचदा इतर वन्यजीवही मरतात.मागील १० वषार्तील रानडुकरांकडून माणसांच्या मृत्यूचा आकडा ८९ असा आहे. २०१६ मध्ये १७, २०१५ मध्ये १२, २०१३ मध्ये ११ व्यक्तींचा राज्यात रानडुकरांच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याची नोंद आहे.रानगव्यांकडूनही २३ मृत्यूरानगव्यांच्या हल्ल्यात मागील १० वर्षात २३ व्यक्तींचा मृत्यू झाल्याची नोंद आहे. तर नीलगायींच्या हल्ल्यातही राज्यात ७ जणांचा मृत्य झाला आहे. माकड, नीलगाय या प्राण्यांच्या हल्ल्यात दगावलेल्यांच्या वारसांना १० लाख रुपयांची नुकसानभरपाई मिळते तर जखमींना ५ ते २० हजाराची भरपाई दिली जाते. वाघ, बिबट या प्राण्यांकडून होणऱ्या मृत्यूमधील नुकसानभरपाईच्या तुलनेत ही रक्कम बरीच कमी आहे. शेतकऱ्यांच्या शेताचे रानडुकरांसोबतच माकड, हरिण, रानगवे, रानम्हशी, नीलगायींकडूनही मोठे नुकसान होते. मात्र नुकसानीच्या तुलनेत पुरेशी भरपाई मिळत नाही, ही शोकांतिका आहे.

 

टॅग्स :wildlifeवन्यजीव