शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
3
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
4
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
5
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
6
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
7
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
8
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
9
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
10
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
11
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
12
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
13
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
14
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
15
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
16
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
17
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
18
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
19
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
20
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई

राज्यात १० वर्षात रानडुकरांकडून ८९ व्यक्तींचे बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2020 11:56 IST

Nagpur News मागील १० वर्षात रानडुकरांकडून राज्यात ८९ व्यक्तींचा मृत्यू झाला आहे.

ठळक मुद्देरानडुकरांचे शेतीपुढे संकट परवानगी घेऊन मारायला शेतकऱ्यांनी बंदुका आणायच्या कुठून ?

गोपालकृष्ण मांडवकरलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शेतकऱ्यांना सर्वाधिक उपसर्ग रानडुकरांकडून आणि रानम्हशींकडून आहे. रानडुकरांना वन विभागाची परवानगी घेऊन मारता येते, मात्र त्यासाठी नाचवल्या जाणाऱ्या कागदी घोड्यांची वाट किती पहायची, आणि परवानगी मिळाल्यावर बंदुका कुठून आणायच्या, असा शेतकऱ्यांपुढे असलेला प्रश्न आहे. विशेष म्हणजी मागील १० वर्षात रानडुकरांकडून राज्यात ८९ व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे हे संकट दोन्ही बाजूनी दिसत आहे.वन विभागाच्या नियमानुसार, बफर क्षेत्राच्या बाहेर असल्यास रानडुकरांचा बंदोबस्त करण्यासाठी आधी कायदेशीर परवानगी घ्यावी लागते. त्यावर वन विभाग परवानगी देतो. मात्र वाट बघावी लागते. या काळात रानडुकरांकडून डोळ्यादेखत होणारी नासधूस सहन होत नसल्याने शेतकरी गोळे खायला टाकून डुकरांना ठार करतात, परस्पर विल्हेवाटही लावतात. रानडुकरांना मारणे कायद्याने गुन्हा असला तरी शेतीचे अधिक नुकसान त्यांच्याकडूनच होते. त्यांच्या बंदोबस्तासाठी शेतकरी विजेचे सापळे लावतात. त्यात बरेचदा इतर वन्यजीवही मरतात.मागील १० वषार्तील रानडुकरांकडून माणसांच्या मृत्यूचा आकडा ८९ असा आहे. २०१६ मध्ये १७, २०१५ मध्ये १२, २०१३ मध्ये ११ व्यक्तींचा राज्यात रानडुकरांच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याची नोंद आहे.रानगव्यांकडूनही २३ मृत्यूरानगव्यांच्या हल्ल्यात मागील १० वर्षात २३ व्यक्तींचा मृत्यू झाल्याची नोंद आहे. तर नीलगायींच्या हल्ल्यातही राज्यात ७ जणांचा मृत्य झाला आहे. माकड, नीलगाय या प्राण्यांच्या हल्ल्यात दगावलेल्यांच्या वारसांना १० लाख रुपयांची नुकसानभरपाई मिळते तर जखमींना ५ ते २० हजाराची भरपाई दिली जाते. वाघ, बिबट या प्राण्यांकडून होणऱ्या मृत्यूमधील नुकसानभरपाईच्या तुलनेत ही रक्कम बरीच कमी आहे. शेतकऱ्यांच्या शेताचे रानडुकरांसोबतच माकड, हरिण, रानगवे, रानम्हशी, नीलगायींकडूनही मोठे नुकसान होते. मात्र नुकसानीच्या तुलनेत पुरेशी भरपाई मिळत नाही, ही शोकांतिका आहे.

 

टॅग्स :wildlifeवन्यजीव