शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

८५ कोटी कोणत्या शाळांना वाटले?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:51 IST

नागपूर : राज्य सरकारच्या शालेय शिक्षण विभागाने आरटीईच्या नोंदणीकृत शाळांना २०१९-२१ या वर्षात ८५ कोटी रुपये दिल्याची लेखी माहिती ...

नागपूर : राज्य सरकारच्या शालेय शिक्षण विभागाने आरटीईच्या नोंदणीकृत शाळांना २०१९-२१ या वर्षात ८५ कोटी रुपये दिल्याची लेखी माहिती नागपुरातील आरटीई फाउंडेशनला दिली आहे. विशेष म्हणजे राज्यातील एकाही शाळेला २०१९-२० या सत्रातील एकही रुपया मिळाला नाही. त्यामुळे विभागाने ८५ कोटी कोणत्या शाळांना वाटले, असा सवाल आरटीईच्या नोंदणीकृत शाळा संचालकांनी केला आहे. आरटीईचा २०२१-२२ या वर्षासाठी प्रवेश प्रक्रियेचा कार्यक्रम प्रसिद्ध करण्यात आले आहे. परंतु, गेल्या चार वर्षांत आरटीईची थकीत प्रतिपूर्ती न मिळाल्याने आरटीई फाउंडेशनने न्यायालयात धाव घेण्याचा इशारा दिला आहे.

राज्यातील खाजगी विनाअनुदानित तसेच इंग्रजी माध्यमाच्या शाळांत गेल्या चार वर्षांपासून आरटीईचा निधी न मिळाल्याने शाळांना आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे पालकांनी फी भरण्यास हात वर केले आहे. यासंदर्भात शासनास वारंवार लेखी निवेदन देऊनही कुठलीच दखल घेतली नाही. आरटीई शाळांना चार वर्षांचा थकीत निधी वाटप करा. नंतरच नवीन सत्रात प्रवेश देण्यात येईल, असे आरटीई फाउंडेशनचे अध्यक्ष प्रा. सचिन काळबांडे यांनी शासनाला कळविले आहे. केंद्र सरकारने आरटीईतील आपला ६० टक्के वाटा वेळोवेळी दिल्याचे माहितीच्या अधिकारात स्पष्ट केले आहे. २०१२-१३ ते २०१९-२० या वर्षात ४४०.२८ कोटी रुपये केंद्राने राज्याला आरटीईचे दिले आहे. परंतु, राज्य सरकार आपला ४० टक्के वाटा कोणत्या वर्षी किती दिला, याची माहिती माहितीच्या अधिकारात देण्यास टाळाटाळ करीत आहे. राज्यास केंद्राकडून केवळ ४८४.७० कोटीच मिळाले, अशी कबुली देत आहे. त्यामुळे आरटीईच्या निधीसंदर्भात कोण खोटे बोलते आहे, असा प्रश्न फाउंडेशनने उपस्थित केला आहे. शासनाने शाळांना आरटीईच्या प्रतिपूर्तीबाबत धोरणात्मक निर्णय घेऊन, नवीन सत्र सुरू होण्यापूर्वी त्याचे वाटप करावे. विभागाने प्रवेशाकरिता दबाव वाढविल्यास न्यायालयात जाण्याची भूमिका फाउंडेशनने घेतली आहे.