शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
5
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
6
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
7
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
8
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
9
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
10
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
11
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
12
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
13
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
14
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
15
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
16
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
17
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
18
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
19
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
20
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग

मायबाप सरकार डोळे मिटल्यावर मानधन वाढविणार काय? ८१ वर्षांचे वृद्धाचा केविलवाणा सवाल

By दयानंद पाईकराव | Updated: December 21, 2022 18:09 IST

८१ वर्षाचे वृद्ध कलावंत कृष्णा सोनबाजी घोडमारे यांनी मांडली व्यथा

नागपूर : कलावंतांना आयुष्यभर प्रवास करावा लागतो. पोटाची खळगी भरण्यासाठी आणि कुटुंबाच्या पालनपोषणाची जबाबदारी पूर्ण करण्यासाठी ते सतत या गावातून त्या गावात जाऊन समाजप्रबोधनाचे, मनोरंजनाचे काम करतात. परंतु एवढे सगळे करूनही शासन मानधनात वाढ करीत नसेल तर आयुष्यभर केलेल्या कष्टाला किंमत उरत नाही. त्यामुळे मायबाप सरकार डोळे मिटल्यानंतर मानधन वाढविणार आहे काय? असा केविलवाणा प्रश्न उपस्थित करून वर्धा जिल्ह्याच्या हिंगणघाट तालुक्यातील ८१ वर्षाचे वृद्ध कलावंत कृष्णा सोनबाजी घोडमारे यांनी आपली व्यथा मांडली.

वृद्ध कलावंतांना मिळणाऱ्या मानधनात वाढ करावी यांसह विविध मागण्यांसाठी भारतीय कलाकार शाहीर मंडळ व महाराष्ट्र शाहीर परिषदेच्या वतीने विधानभवनावर मोर्चा काढण्यात आला. टेकडी मार्गावर पोलिसांनी हा मोर्चा अडविला. मोर्चात वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट तालुक्यातील वडनेर येथील ८१ वर्षांचे वृद्ध कलावंत कृष्णाजी सोनबाजी घोडमारे हे सुद्धा सहभागी झाले होते. कृष्णाजी यांनी आयुष्यभर कलावंत म्हणून कार्य केले.

संत तुकडोजी महाराज, संत तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर महाराजांचे भजन करून ते गावोगाव समाजप्रबोधन केले. त्यासाठी आपल्या आयुष्याचे ४० वर्षे त्यांनी झिजविले. परंतु त्या मोबदल्यात तुटपुंजे मानधन शासनाच्या वतीने त्यांना मिळत आहे. हे मानधन वाढविण्यासाठी आजपर्यंत अनेकदा शासन दरबारी येरझारा घालूनही पदरात काहीच पडले नसल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे मायबाप सरकार डोळे मिटल्यावर मानधन वाढविणार काय? असा संतप्त सवाल उपस्थित करून शासनाच्या कलावंतांच्या प्रती असलेल्या असंवेदनशीलतेवर त्यांनी बोट ठेवले.

टॅग्स :Pensionनिवृत्ती वेतनGovernmentसरकारSenior Citizenज्येष्ठ नागरिक