शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
2
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
3
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
4
आजचे राशीभविष्य : शनिवार १६ ऑगस्ट २०२५; आज ज्या-ज्या क्षेत्रात वावराल त्या-त्या क्षेत्रात आपली प्रशंसा होईल, प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आनंदित व्हाल
5
किश्तवाड ढगफुटीत ६५ जणांचा गेला जीव, ३८ जणांची प्रकृती गंभीर; १०० अजूनही बेपत्ता
6
मालाडमध्ये इतके लोक राहतात? ट्रॅफिकला कंटाळून कश्मीरा शाहने शेअर केला मजेशीर व्हिडीओ
7
ठाकरे बंधू महापालिका निवडणुका एकत्र लढणार, मुंबई, ठाण्यात सत्ता; संजय राऊत यांचा दावा
8
पूर्णा नदीत आंदोलनकर्ता गेला वाहून, अद्याप शोध लागलेला नाही; स्वातंत्र्यदिनी आंदोलनाला लागले गालबोट
9
गणेशोत्सवात मराठी गाणी वाजवा; सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीची आग्रही भूमिका
10
'पती-पत्नी संकल्पना' व्याख्येत समलैंगिकांचाही समावेश व्हावा; हायकोर्टात गिफ्ट टॅक्स नियमाविरुद्ध याचिका
11
मध्य रेल्वेवर आज रात्री, तर 'परे'वर उद्या ब्लॉक; २१ मेल-एक्स्प्रेस फेऱ्यांना फटका, काही लोकल रद्द
12
स्वतःहून घराबाहेर पडलेला पती 'ती' मागणी करू शकत नाही : कोर्ट
13
आता वेटिंगची चिंता नको; 'वंदे भारत'ला जोडणार चार डबे! ३१२ अतिरिक्त प्रवासी प्रवास करणार
14
लाल किल्ल्यावर स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्याला राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे का उपस्थित राहिले नाहीत? काँग्रेसने कारण दिले
15
एमबीबीएसच्या कट ऑफमध्ये घट; खुल्या प्रवर्गाची गुणवत्ता यादी ५०९ पर्यंत घसरली
16
जालना: न्यायासाठी मंत्र्याचा ताफा अडवला, मस्तवाल पोलीस अधिकाऱ्याने उडी मारून घातली लाथ; व्हिडीओ बघून येईल संताप
17
नागालँडचे राज्यपाल एल गणेशन यांचे निधन, डोक्याला दुखापत झाल्याने चेन्नईच्या रुग्णालयात झाले होते दाखल
18
धक्कादायक! आईशी प्रेमसंबंध असल्याचा संशय, मुलानं कोयत्यानं वार करत एकाला संपवले केले; दौंडमधील घटना
19
भारताची 'वंडर वुमन', ज्यांनी सैन्यातील पुरुषांना दिले प्रशिक्षण; 'मल्हार'च्या मंचावर डॉ. सीमा राव यांनी उलगडला प्रवास!
20
'स्कॅम १९९२'च्या 'हर्षद मेहता'ने अनेकदा पचवला नकार! प्रतीक गांधीने सांगितलं प्रोजेक्टमधून रिजेक्ट होण्याचं कारण, म्हणाला... 

८० बालवाड्या बंदचा नागपूर मनपाचा घाट?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2020 10:38 IST

नागपूर मनपा शाळांची पटसंख्या वाढावी यासाठी २०१५ मध्ये सभागृहात बालवाडी, केजी-१ व केजी- २ वर्ग सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र पुढील शैक्षणिक सत्रात हे वर्ग बंद करण्याचा घाट शिक्षण विभागाने घातला आहे.

ठळक मुद्देशाळांची १,२२० ने पटसंख्या घटली विद्यार्थ्यांचे भवितव्य अंधारात

गणेश हुड।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शिक्षणापासून कुणीही वंचित राहू नये, आजच्या स्पर्धेच्या युगात गरीब विद्यार्थ्यांना उत्तम दर्जाचे शिक्षण मिळावे, मनपा शाळांची पटसंख्या वाढावी यासाठी २०१५ मध्ये सभागृहात बालवाडी, केजी-१ व केजी- २ वर्ग सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र पुढील शैक्षणिक सत्रात हे वर्ग बंद करण्याचा घाट शिक्षण विभागाने घातला आहे.आमची प्राथमिक शिक्षण देण्याची जबाबदारी आहे. बालवाडी चालवण्याची जबाबदारी नाही. अशी भूमिका शिक्षण विभागाने घेतली आहे. मनपाचा हा निर्णय तुघलकी व आत्मघातकी ठरणार आहे. बालवाडी व केजी-१ व केजी -२ चे वर्ग बंद केल्यास गरीब कुटुंबातील हजारो विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहण्याची शक्यता आहे.२०१८-१९ च्या तुलनेत २०१९- २० या वर्षात मनपा शाळांची पटसंख्या १२२०ने घटली. तर बालवाडीतील पटसंख्या ५२२ ने वाढली आहे. मनपा शाळातील इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांची संख्या ९,३३६ असून ९ वी ते १२ वी या वर्गात ३ हजार विद्यार्थी आहेत.

बालवाडी, केजी-१ व केजी -२ मधून पुढे हेच विद्यार्थी मनपा शाळेत प्रवेश घेतात. यातून पटसंख्या वाढीला मदत होते. असे असतानाही हे वर्ग बंद करण्याच्या हालचाली सुरू आहेत. त्यामुळे मनपाच्या अगणवाडीतील विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात आले आहे.

८० शिक्षक अतिरिक्त ठरतीलमनपा शाळांतील पटसंख्या वाढावी म्हणून अगणवाडी, केजी- १ व केजी - २ वर्ग सुरू करून यासाठी शिक्षक नियुक्त करण्याचा निर्णय सभागृहात घेण्यात आला होता. असे ८० वर्ग बंद केल्यास तितकेच शिक्षक अतिरिक्त असल्याने अतिरिक्त शिक्षकांची संख्या वाढेल.

अंगणवाडी बंद केल्यास शाळाही बंद होतीलमनपा शाळांची पटसंख्या दरवर्षी कमी होत आहे. पटसंख्या वाढीसाठी अंगणवाडी व केजी -१ व केजी- २ सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. पण मनपा प्रशासनाने पुढील सत्रासाठी शिक्षकांची नियुक्ती केलेली नाही. आजच्या स्पर्धेच्या युगात असे वर्ग बंद केल्यास भविष्यात मनपाच्या शाळा बंद पडतील. शिक्षक अतिरिक्त ठरतील. गरीब विद्यार्थ्याचे भवितव्य धोक्यात येईल.- राजेश गवरे, अध्यक्ष, शिक्षक संघटना मनपा.

टॅग्स :Schoolशाळा