शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

प्रवाशांना खाऊपिऊ घालत रेल्वेने घातले ८.१३ कोटी खिशात

By नरेश डोंगरे | Updated: March 2, 2024 20:24 IST

मध्य रेल्वेची सरबराई : ११ महिन्यातच कॅटरिंग कमाईचे टार्गेट पूर्ण

नरेश डोंगरे, लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर : प्रवाशांना विविध अन्नपदार्थ खाऊ घालत मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाने आतापर्यंत ८.१३ कोटी रुपये आपल्या तिजोरीत टाकले. विशेष म्हणजे, सुरू असलेल्या आर्थिक वर्षाचे कॅटरिंगचे टार्गेट पूर्ण होण्याच्या अवधीसाठी एक महिना शिल्लक आहे. मात्र, ११ महिन्यातच लक्ष्य पूर्ण करण्याची किमया नागपूर विभागातील अधिकाऱ्यांनी साधली आहे.

गेले आर्थिक वर्ष संपताना मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाने २०२३-२४ चे कॅटरिंग उत्पन्नाचे लक्ष्य ७.५० कोटी रुपये निर्धारित केले होते. ते पूर्ण करण्यासाठी रेल्वे गाड्या आणि स्थानकांवर दिल्या जाणाऱ्या कॅटरिंच्या कंत्राटावर आणि कंत्राटदारांकडून दिल्या जाणाऱ्या खाण्यापिण्याच्या सेवांवर विशेष लक्ष केंद्रीत केले होते. खानपानाचा दर्जा सुधारण्यासोबतच विविध रेल्वेस्थानक तसेच गाड्यांमध्ये अनधिकृत वेंडर्सचा असणारा धुमाकुळही थांबविला. विभागातील प्रमूख रेल्वे स्थानकांवर अचानक तपासणीची मोहिम राबवून अनधिकृत खाद्य पदार्थ, पाणी, ज्यूससह अन्य चिजवस्तू विकणारांवर कारवाईचा सपाटा लावला होता. खाद्यपदार्थ विकणाऱ्या अधिकृत विक्रेत्यांना स्वच्छता आणि दर्जा राखण्यासाठीही वारंवार सूचना, आदेश दिले जात होते. त्याचेच चांगले परिणाम समोर आले असून, निर्धारित केलेले उद्दीष्ट पूर्ण होण्याच्या एक महिन्यापूर्वीच कॅटरिंग उत्पन्नाचे लक्ष्य नागपूर विभागाने साधले. मार्च २०२४ पर्यंत ७ कोटी, ५० लाखांच्या उत्पन्नाची अपेक्षा असताना २९ फेब्रुवारीपर्यंत विभागाने ८ कोटी १३ लाखांचे उत्पन्न मिळवले.टार्गेट पेक्षा १८ टक्के जास्त

नागपूर विभागाने मिळवलेले हे उत्पन्न सुरू असलेल्या आर्थिक वर्षाच्या निर्धारित केलेल्या टार्गेटपेक्षा १८ टक्के जास्त आहे. या यशाचे श्रेय कॅटरिंग विभागाचे नियोजन करणाऱ्या आणि वेळोवेळी त्या संबंधाने आवश्यक कारवाई करणाऱ्या सर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांना जाते, अशी प्रतिक्रिया या निमित्ताने रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक मनीष अग्रवाल आणि वरिष्ठ वाणिज्य व्यवस्थापक अमन मित्तल यांनी नोंदविली आहे. खानपानाचा दर्जा उंचावल्यामुळेच प्रवाशांकडून चांगला प्रतिसाद मिळत असल्याचेही अधिकाऱ्यांनी म्हटले आहे. 

टॅग्स :central railwayमध्य रेल्वे