शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
2
“भावाला न्याय मिळत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही”; संतोष देशमुख यांच्या बहिणीचा निर्धार
3
“जातनिहाय जनगणनेचा मुद्दाही सुप्रीम कोर्टात जाईल, १० वर्षे तरी...”; वकिलांनी कायदाच सांगितला
4
OLA Electric ची डोकेदुखी वाढली, इनसाइडर ट्रेडिंग प्रकरणी SEBI कडून तपास; प्रकरण काय?
5
"मी माझ्या पत्नीवर खरं प्रेम केलं होतं पण तिने..."; तरुणाने Video बनवून स्वत:वर झाडली गोळी
6
"अनेकांची झोप उडवेल आजचा कार्यक्रम, जेथे मेसेज जायला हवा होता, तेथे पोहोचला"; नेमकं काय म्हणाले पीएम मोदी
7
भारतातील या मुख्यमंत्र्यांनी भारत-पाकिस्तान युद्धावेळी चालवलं होतं विमान, सैनिकांना पोहोचवलं होतं श्रीनगरला
8
भारतीयांवर लक्ष्मी प्रसन्न! लोकांनी तीन वर्षात 'यु ट्यूब'वरून कमावले तब्बल 21000 कोटी
9
एजाज खान अडचणीत, महिला आयोगाची कारवाई; ULLU ने 'हाउस अरेस्ट'चे सर्व एपिसोड हटवले
10
सौरभची हत्या करणाऱ्या मुस्कान-साहिलने हात जोडले; जेलमध्ये ढसाढसा रडले अन् म्हणाले...
11
आई, वडील आयटी प्रोफेशनल; काळजावर दगड ठेवत अवघ्या तीन वर्षांच्या मुलीला दिला जैन धर्माचा संथारा, कहाणी ऐकून व्हाल भावूक...
12
Gold Rates 2 May : सोन्याच्या किंमतीत जोरदार घसरण, ७८ हजारांपर्यंत येऊ शकतो १० ग्रॅम सोन्याचा दर?
13
अधिकाधिक हिंदू तरुणींवर बलात्कार करण्याचं होतं लक्ष्य, भोपाळ लव्ह जिहाद प्रकरणातील आरोपीचा धक्कादायक दावा 
14
पहलगाम हल्ल्याचा दणका! भारताकडून पाकिस्तानचा ऑलिम्पिक विजेता अर्शद नदीम BLOCK!!
15
वादग्रस्त आयएएस प्रशिक्षणार्थी पूजा खेडकर दिल्ली पोलिसांत हजर; मनाने आलेली नाही, सामाजिक कार्यकर्त्यांचा आरोप 
16
Waves Summit 2025: "भारतात पुरेसे सिनेमागृहच नाहीत..." आमिर खानने व्यक्त केली खंत
17
श्रीराम दर्शनाची ओढ लागली, ३०० वर्षे जुनी परंपरा मोडली; हनुमानगढीचे महंत मंदिराबाहेर पडले!
18
केवळ १००० रुपयांनी गुंतवणूक करून तुमच्या मुलांना बनवू शकता कोट्यधीश; कोणती आहे ही स्कीम?
19
पत्नी माहेरी गेली, पतीने घरातच केली आत्महत्या; अकोला जिल्ह्यातील धक्कादायक घटना
20
प्रेक्षकांचा सूरज चव्हाणला 'गोलीगत धोका', 'झापुक झुपूक'ने पहिल्या आठवड्यात केली फक्त इतकी कमाई

वर्धा-यवतमाळ-नांदेड रेल्वे मार्गाला साडेसातशे कोटींचा बुस्ट; आणखी अडीच ते पावणेतीन हजार कोटींची गरज

By नरेश डोंगरे | Updated: February 1, 2024 22:54 IST

महाराष्ट्रातील दोन मागास भागांना समृद्धीच्या मार्गावर नेण्याची ताकद असलेला बहुप्रतीक्षित वर्धा-यवतमाळ-पुसद-नांदेड रेल्वे प्रकल्प आता आणखी गतीमान होणार आहे.

नरेश डोंगरेनागपूर : महाराष्ट्रातील दोन मागास भागांना समृद्धीच्या मार्गावर नेण्याची ताकद असलेला बहुप्रतीक्षित वर्धा-यवतमाळ-पुसद-नांदेड रेल्वे प्रकल्प आता आणखी गतीमान होणार आहे. आज सादर करण्यात आलेल्या अंतरिम अर्थसंकल्पात या प्रकल्पाला साडेसातशे कोटींच्या तरतुदीचे आर्थिक इंजिन जोडले गेले आहे. मात्र, जाणकारांच्या माहितीनुसार या प्रकल्पाच्या पुर्णत्वासाठी आणखी अडीच ते पावणेतीन हजार कोटींची गरज भासणार आहे.

२८४.६५ किलोमीटर लांबीचा वर्धा-यवतमाळ-नांदेड हा रेल्वे मार्ग ज्यावेळी मंजूर झाला होता त्यावेळी त्यासाठी २७४.५५ कोटींचा खर्च अपेक्षित होता. मात्र, मध्यंतरी प्रकल्प रेंगाळल्याने त्याचे बजेटही वाढले. लोकमत एडिटोरियल बोर्डचे चेअरमन आणि माजी खासदार डॉ. विजय दर्डा यांचा हा ड्रीम प्रोजेक्ट आहे. त्यांनी या संबंधाने राज्य तसेच केंद्रात सातत्याने पाठपुरावा केला. डॉ. दर्डा यांच्या प्रयत्नामुळेच राज्य सरकारने या प्रकल्पासाठी स्पेशल वॉर रूम तयार केली. या कामात कुठलाही अडथळा निर्माण होऊ नये यासाठी विशेष सूचना दिल्या आणि निधीही उपलब्ध करून दिला. त्याचमुळे गेल्या काही वर्षांत या प्रकल्पाला गती मिळाली आहे.

या पार्श्वभूमीवर, आतापावेतो १९१० कोटी, ७ लाख रुपये खर्च झाले असून त्यातून वर्धा जिल्ह्यातील देवळी, भिडी आणि यवतमाळ जिल्ह्यातील कळंब या रेल्वेस्थानकापर्यंतचे संपूर्ण काम पूर्ण झाले आहे. ताशी १२५ किलोमीटर वेगाने रेल्वे गाडी चालवून देवळी ते कळंबपर्यंतची ट्रायलही पार पडली आहे. त्यामुळे वर्धा ते कळंब पर्यंत रेल्वेगाडी सुरू करण्याचा निर्णयही घेण्यात आला असून त्यासाठी आधी १२ जानेवारी २०२४ चा मुहूर्त ठरविण्यात आला होता. नंतर ११ फेब्रुवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या मार्गाचे उद्घाटन करण्यात येणार असल्याची चर्चाही सुरू झाली. या पार्श्वभूमीवर, आज जाहिर झालेल्या अंतरिम अर्थसंकल्पात वर्धा-यवतमाळ-नांदेड रेल्वे प्रकल्पासाठी ७५० कोटी रुपयांची तरतुद जाहीर झाली. तथापि, एवढ्याने भागणार नाही तर आणखी ३ हजार ४४५.४८ कोटी रुपये खर्च या मार्गासाठी अपेक्षित असल्याचे जाणकार सांगत आहेत. तो तातडीने उपलब्ध करून दिला जावा, अशी मागणीही पुढे आली आहे.तरतुदीचे स्वागत, पुरेशी नाही : डॉ. विजय दर्डा

लोकमत एडिटोरियल बोर्डचे चेअरमन आणि माजी खासदार डॉ. विजय दर्डा यांच्याशी या संबंधाने चर्चा केली असता त्यांनी या अर्थसंकल्पाचे स्वागत केले. मात्र, वर्धा - यवतमाळ - नांदेड प्रकल्पाचे ७५० कोटींने भागणार नाही. त्यासाठी आवश्यक संपूर्ण निधी तातडीने उपलब्ध करून दिला जावा आणि हा प्रकल्प शक्य तेवढ्या लवकर पुर्ण व्हावा, अशी अपेक्षा व्यक्त केली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या व्हिजननुसार केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव चांगली पावलं उचलत आहेत. सर्वसामान्य व्यक्तींचे दळणवळणाचे रेल्वे मुख्य साधन आहे. त्याचे नुतनीकरण होत आहे, हे काैतुकास्पद असल्याचे डॉ. दर्डा यांनी म्हटले. मात्र, ज्येष्ठ नागरिकांना सुलभ जाणे-येणे करता यावे यासाठी सर्व रेल्वे स्थानकांवर एस्केलेटर सुरू करावे. देशातील सर्व ठिकाणचे रेल्वे क्रॉसिंग फाटक बंद करून उड्डाण पुल किंवा भुयारी मार्गाची निर्मिती करावी तसेच अपघात रोखण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर व्हावा, अशी मागणी वजा अपेक्षाही डॉ. दर्डा यांनी व्यक्त केली.