शहरं
Join us  
Trending Stories
1
१२ किल्ल्यांचा युनेस्को यादीत समावेश, राज ठाकरे म्हणाले, "ही अतिशय आनंदाची बाब, त्यासोबतच..."
2
“एसटीने घडविले ९ लाख ७१ हजार भाविक-प्रवाशांना विठ्ठल दर्शन”; प्रताप सरनाईकांची माहिती
3
ना कोणता साईड बिझनेस, ना जास्त पगार.., ४५ व्या वर्षी रिटायरमेंट आणि ४.७ कोटींची नेटवर्थ, कसं झालं हे शक्य?
4
नेपाळ मार्गे भारताला हादरवण्याचा प्लॅन, जैश अन् लष्करची मोठी योजना उघड
5
छत्रपती संभाजीनगर: समृद्धी महामार्गावरील टोल नाक्यावर गोळीबार, कर्मचाऱ्याच्या पोटात लागली गोळी
6
Radhika Yadav : राधिकाला मारण्यापूर्वी स्वत:लाच संपवणार होते वडील; टेनिसपटूच्या हत्या प्रकरणात पुन्हा नवा ट्विस्ट
7
अल्पवयीन मुलासह दोघांना करायला लावला ओरल सेक्स; मुंबईतून अपहरण, पुण्याला नेईपर्यंत बेदम मारहाण, घडलं काय?
8
पत्नीच्या शस्त्रक्रियेसाठी जामीन मिळवला अन् बाहेर येताच फरार झाला सिद्धू मूसेवाला हत्याकांडातील आरोपी!  
9
चातुर्मासातील पहिले पंचक रविवारपासून, अजिबात करू नका ‘ही’ कामे; ५ दिवस ठरणार अत्यंत अशुभ?
10
"राधिका यादवला लग्न करायचं होतं, पण..."; शेजाऱ्यानं काही भलतंच सांगितलं! काय म्हणाला?
11
Electric Car: एका चार्जवर ३ देश फिरले, 'या' इलेक्ट्रिक कारची गिनीज बूकमध्ये नोंद होणार!
12
Plane Crash: पायलट म्हणाला, 'तू फ्यूल बंद का केलं?'; एअर इंडिया विमान अपघाताबद्दल स्फोटक माहिती आली समोर
13
"सैफ रुग्णालयात असताना करीना कपूरच्या कारवरही हल्ला झाला", रोनित रॉयचा धक्कादायक खुलासा
14
Tarot Card: या सप्ताहात परिस्थितीचा करा स्वीकार, भावनेत न गुंतता करा सारासार विचार!
15
Air India Plane Crash: टेकऑफ ते क्रॅश होईपर्यंत 'त्या' ९८ सेकंदात काय झालं?; AAIB चा रिपोर्ट, धक्कादायक खुलासे
16
अमृता सुभाषची झाली फसवणूक? ठळक अक्षरात लिहिलं CHEATED; "ह्याबद्दल बोलूच पण..."
17
अन्न-पाणीही मिळेना, लोकांची होतेय तडफड! गाझामध्ये मदत केंद्राजवळच ७९८ लोकांचा मृत्यू
18
चातुर्मासातील पहिली संकष्ट चतुर्थी: चंद्रोदय वेळ काय? बाप्पा होईल प्रसन्न, ‘असे’ करा पूजन
19
Maharashtra Co-op Bank case: आमदार रोहित पवार यांच्याविरोधात ईडीने दाखल केले पुरवणी आरोपपत्र
20
Radhika Yadav : "इथे खूप बंधनं, मला जीवनाचा आनंद घ्यायचाय..."; राधिकाचं कोचसोबतचं WhatsApp चॅट समोर

पोषणघटकांच्या कमतरतेमुळे ७५ टक्के बालकांचा मृत्यू

By admin | Updated: March 4, 2017 21:53 IST

मुलांच्या सुरुवातीच्या वर्षांमध्ये पुरेशा सूक्ष्मघटकांचे सेवन अत्यंत महत्त्वाचे असते. मात्र, या पोषणघटकांच्या कमतरतेमुळे ७५ टक्के मृत्यू होतात

ऑनलाइन लोकमत 
नागपूर, दि. 4 -  मुलांच्या सुरुवातीच्या वर्षांमध्ये पुरेशा सूक्ष्मघटकांचे सेवन अत्यंत महत्त्वाचे असते. मात्र, या पोषणघटकांच्या कमतरतेमुळे ७५ टक्के मृत्यू होतात आणि या गंभीर आकडेवारीत भरच पडत असल्याचा आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने (एमओएचएफडब्ल्यू) आपल्या अहवालात स्पष्ट केले आहे. 
६ ते २४ महिन्यांच्या वयोगटात बालकांच्या वाढीमधील घट आणि संसर्ग यांचा धोका अधिक प्रमाणात असतो. त्यामुळे बालकांची योग्य वाढ आणि विकासासाठी आहारात पुरेशा प्रमाणात जीवनसत्वे आणि खनिजांची भूमिका अत्यंत महत्त्वाचे असते, अशी माहिती बालरोगतज्ज्ञ डॉ. संजय मराठे यांनी पत्रकारांना दिली. 
डॉ. मराठे म्हणाले, बालकांचे आरोग्य आणि पोषण सुधारण्यात भारतात मोठ्या प्रमाणावर काम होत आहे. मात्र, तरीही दरवर्षी लाखो मुले पाचव्या वाढदिवसापूर्वीच जीवनसत्व आणि खनिजांच्या अभावाला बळी पडतात बालकांमधील मृत्यू आणि अपंगत्व यामागील हे एक मुख्य कारण ठरत आहे. आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या (एमओएचएफडब्ल्यू) अहवालानुसार दरवर्षी जन्मलेल्या २६ दशलक्ष बालकांपैकी ७ लाखांपेक्षा अधिक मुले नवजात अवस्थेतूनही पुढे जात नाहीत. 
देशातील १३ टक्के लोकसंख्या सहा वर्षांखालील मुलांची आहे आणि दररोज त्यातील १२.७ लाख मुले अपुºया पोषक घटकांमुळे मरण पावतात. मुलांच्या सुरुवातीच्या वर्षांमध्ये पुरेशा जीवनसत्व आणि खनिजांच्या सूक्ष्मघटकांचे सेवन अत्यंत महत्त्वाचे असते. मात्र, या पोषणघटकांच्या कमतरतेमुळे ७५ टक्के मृत्यू होतात. पाच वर्षांखालील बालकांमध्ये मृत्यूची प्रमुख कारण कुपोषण हेच आहे. 
बाळाचे पहिले हजार दिवस महत्त्वाचे 
बालकांच्या आयुष्यातील पहिले १००० दिवस त्यांच्या नंतरच्या आयुष्यासाठीचा पाया रचतात. त्याच्या आरोग्याची रचना करतात, त्याला आकार देतात. या कालावधीत पोषक घटकांनी युक्त आहाराचे सेवन अत्यंत महत्त्वाचे ठरते. कारण यामुळेच शारीरिक वाढ, शिकण्याची क्षमता यांच्याबाबत मुलांची क्षमता वाढते. 
सहा महिन्यानंतर कुपोषणाचा धोका असतो 
बालकाच्या वयाच्या सहा महिन्यांनंतर कुपोषणाचा मोठा धोका असतो. कारण, सहा महिन्यानंतर बाळाला केवळ स्तनपान न देता बाहेरचे अन्नपदार्थ देण्यास सुरुवात होते. याच टप्प्यात पोषक घटक देण्यातील तफावत सर्वाधिक जाणवते. कारण, या टप्प्यावर मुलांच्या गरजा वाढलेल्या असतात आणि स्तनपान कमी होते.