शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्री उदय सामंत चौथ्यांदा 'शिवतीर्थ'वर; मनसे प्रमुख राज ठाकरेंची घेतली भेट, कारण काय?
2
सीमेवर बंदुका थंडावल्या, पण एअर इंडिया, गो इंडिगोने विमानफेऱ्या रद्द केल्या; या विमानतळांवर आजही...
3
हिंडन विमानतळावरून बंगळुरू, लुधियाना, नांदेडसाठी आजपासून विमानसेवा सुरू; मुंबई, गोव्यासाठी केव्हा सुरू होणार?
4
Stock Market Today: विक्रमी तेजीनंतर शेअर बाजारात घसरण; ५०० पेक्षा जास्त अंकांनी आपटला, तरीही फार्मा सेक्टरमध्ये तेजी का?
5
सावधान! 'या' नंबरवरून पाकिस्तानी हॅकर्सचा भारतीयांना फोन; सुरक्षा यंत्रणेचा मोठा अलर्ट
6
धक्कादायक! अमृतसरमध्ये विषारी दारूमुळे १२ जणांचा मृत्यू, ५ जणांची प्रकृती गंभीर
7
India retaliatory tariff: चीननंतर भारताचं अमेरिकेला जोरदार प्रत्युत्तर, स्टील-अ‍ॅल्युमिनिअम टॅरिफवर मोठी घोषणा
8
'ऑपरेशन सिंदूर'वेळी भारतावर १५ लाख सायबर हल्ले; पाकिस्तान,बांगलादेशसह या ५ देशातील हॅकर्स
9
भीमा कोरेगाव प्रकरण: आज आयोगापुढे शरद पवार हजर राहणार?
10
स्पष्ट विजय! भारताच्या 'या' दोन मिसाइलला तोड नाही, पाकनं नांगी टाकली...; ऑपरेशन सिंदूरवर ऑस्ट्रियन इतिहासकाराचा मोठा दावा
11
गोळीबार नको, बॉर्डरवरील सैनिकांची संख्या कमी करावी; भारत-पाकिस्तान DGMO मध्ये चर्चा
12
"ज्या गोष्टी लढून मिळवायच्या, त्या मागून मिळत नाहीत..."; उद्धवसेनेचा PM मोदींवर निशाणा
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाकला स्पष्ट शब्दांत ठणकावले; पाहा, भाषणातील ५६ महत्त्वाचे मुद्दे
14
आजचे राशीभविष्य १३ मे २०२५ : या राशींना आर्थिक लाभ, कसा असेल तुमचा आजचा दिवस...
15
एअर मार्शल भारती म्हणाले, “भय बिनु होइ न प्रीति, कोणत्याही आव्हानांचा मुकाबला करण्यास सज्ज”
16
१९७१नंतर प्रथमच पाकला मोठा दणका; ५२हून अधिक वायुसैनिकांचा मृत्यू; १२ एअरबेसवर भारताचे हल्ले
17
‘हे’ तीन दहशतवादी हवेत, मगच थांबेल काश्मीरचा दहशतवाद; भारताची पाककडे सातत्याने मागणी
18
धास्ती: सीमावर्ती गावांत अद्याप शेकडो जिवंत बॉम्ब, ६ ठिकाणी केले निष्क्रिय; नागरिक परतले घरी
19
जे होते ‘ऑपरेशन सिंदूर’चा चेहरा त्यांचे ट्रोलिंग; मिस्रींच्या मुलीची वैयक्तिक माहिती लीक
20
युद्ध झालेलेच नाही, तेव्हा शस्त्रसंधीचा प्रश्नच नाही; भारत-पाकच्या राजनैतिकांनाच श्रेय

राज्य माहिती आयोगाकडे ७४ हजार प्रकरणे प्रलंबित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2021 04:11 IST

प्रशासकीय यंत्रणेतील त्रुटींबाबत सर्वसामान्य नागरिकांना प्रश्न उपस्थित करता यावेत व कामकाजात पारदर्शकता वाढावी, या हेतूने २००५ साली माहितीचा अधिकार ...

प्रशासकीय यंत्रणेतील त्रुटींबाबत सर्वसामान्य नागरिकांना प्रश्न उपस्थित करता यावेत व कामकाजात पारदर्शकता वाढावी, या हेतूने २००५ साली माहितीचा अधिकार अस्तित्वात आला. माहिती आयोगाकडे प्रामुख्याने तक्रारी व द्वितीय अपील करण्यात येते.

मे २०२० अखेरीस राज्यात प्रलंबित तक्रारी व प्रलंबित द्वितीय अपिलांची संख्या एकूण ५९ हजार २९३ इतकी होती. कोरोनाच्या कालावधीत आयोगाची गती संथ झाली. मे २०२१ मध्ये हाच आकडा ७४ हजार २४० वर पोहोचला. वर्षभरातच प्रलंबित प्रकरणांमध्ये १४ हजार ९४७ ने वाढ झाली. बृहन्मुंबई, नागपूर व कोकण खंडपीठ वगळता इतर विभागांमध्ये प्रलंबित अपील व तक्रारींची संख्या फार जास्त आहे.

पुण्यात १७ हजारांहून अधिक प्रकरणे प्रलंबित

राज्यात सर्वात जास्त प्रलंबित प्रकरणे पुणे कार्यालयांतर्गत आहेत. मेअखेरीस पुण्यात १७ हजार ७७२ प्रकरणे प्रलंबित होती. वर्षभरात पुण्यातील प्रलंबित प्रकरणांची संख्या ३ हजार ३७४ ने वाढली आहे. औरंगाबाद येथे सर्वाधिक ६ हजार ३५४ प्रलंबित प्रकरणे वाढली. मेअखेरीस तेथे १४ हजार २५८ प्रकरणे प्रलंबित होती. अमरावतीतील प्रलंबित प्रकरणे मात्र कमी झाली आहेत. मे २०२० अखेरीस तेथे ९ हजार ३०४ प्रकरणे प्रलंबित होती. मे २०२१ मध्ये ती संख्या ९ हजार १३६ वर पोहोचली.

राज्यातील प्रलंबित प्रकरणे (मे २०२१)

विभाग - प्रलंबित अपील - प्रलंबित तक्रारी - एकूण

मुख्यालय - ७९६० - १७६८ - ९७२८

बृहन्मुंबई - ४३४५ - ७०९ - ५०५४

कोकण - ४४७० - १५८४ - ६०५४

पुणे - १६९६१ - ८११ - १७७७२

औरंगाबाद - १०९१९ - ३३३९ - १४२५८

नाशिक - ६१६० - १४७३ - ७६३३

नागपूर - ३६४६ - ९५९ - ४६०५

अमरावती - ८५८४ - ५५२ - ९१३६

एकूण - ६३०४५ - १११९५ - ७४२४०