शहरं
Join us  
Trending Stories
1
शनिवारची रात्र, गोव्यात क्लबमध्ये सिलिंडर स्फोट; २३ मृतांमध्ये चार पर्यटक, उर्वरित नाईट क्लबचा स्टाफ...
2
गोव्यातील क्लबमध्ये भीषण आग, २३ जणांचा मृत्यू; सिलिंडर स्फोट झाल्याची शक्यता, CM कडून चौकशीचे आदेश
3
दिल्लीत PM नरेंद्र मोदी अन् राज ठाकरे एकत्र; मुलगा अमित अन् नातू किआननं मोदींसोबत काढला फोटो
4
Indigo आज १५०० उड्डाणे घेणार, १३५ ठिकाणांना जोडणार; एअरलाइन्सनं जारी केले निवेदन
5
आजचे राशीभविष्य, ०७ डिसेंबर २०२५: आर्थिक लाभाची संधी पण नकारात्मक विचार दूर करणे हितावह राहील
6
‘स्थानिक’ निवडणुकीची रणधुमाळी; ‘हिवाळी’ अधिवेशन ठरणार वादळी; उद्यापासून नागपुरात प्रारंभ; विरोधकांचा चहापानावर बहिष्कार
7
धक्कादायक... मेळघाटात व्यसनामुळे वाढतोय कॅन्सर; युवा ते प्रौढ व्यक्तींमध्ये रक्ताल्पता : संशोधन चमू काढणार निष्कर्ष
8
क्रेडिट कार्डांच्या विळख्यात..! क्रेडिट कार्डवर राेख रक्कम उचलली तर काय हाेते?
9
हा हा हा... आमच्यासारखे तुम्हाला भांडता येते का...?
10
विमान तिकीट दरवाढीला केंद्राचा चाप, चौथ्या दिवशीही इंडिगोचा घोळ कायम
11
घोडबंदर मार्गावर आज ‘अवजड’ प्रवेशबंदी; मोठा पोलिस फौजफाटा तैनात, पण कोंडी टळणार का?
12
इंडिगोवर रेल्वेचा दिलासा : ३७ ट्रेनला ११६ अतिरिक्त डबे, मध्य आणि पश्चिम रेल्वे चालवणार ४९ विशेष फेऱ्या
13
डॉ. आंबेडकरांनी भारताच्या विविधतेला एकत्र बांधणारे संविधान दिले : राज्यपाल
14
राणीच्या बागेत झेब्रा, जिराफ, जॅग्वार, चिंपांझीसाठी लगबग..! ‘एक्झॉटिक झोन’साठी प्रक्रिया सुरू; १७ प्रदर्शिनी, सुविधा निर्माण करणार
15
SIR प्रक्रियेत मोठा घोटाळा समोर, चुकीची माहिती दिल्याचे उघड; नूरजहां, आमिर, दानिश विरोधात FIR
16
"तुमच्या मर्यादेत राहा..." ODI मालिका जिंकताच गंभीरनं काढला मनातला राग! तो नेमकं कुणाला अन् काय म्हणाला?
17
एकनाथ शिंदेंनी मुलाचे भरसभेत केले तोंडभरून कौतुक; म्हणाले, “श्रीकांत हे व्हिजन असलेले खासदार”
18
'यशस्वी' सेंच्युरी... 'रो-को'ची फिफ्टी! टीम इंडियानं दाबात जिंकली दक्षिण आफ्रिकेविरुद्धची वनडे मालिका
19
“कोणतीही तडजोड अमान्य, अशी कारवाई करू की...”; Indigo प्रकरणी केंद्र सरकारची कठोर भूमिका
20
वयाच्या ६७ व्या वर्षी २५ वर्षांच्या तरुणीशी लग्न; संशयास्पद मृत्यूनंतर सून म्हणते, "लग्नानंतर दररोज..."
Daily Top 2Weekly Top 5

सुनील केदार यांच्या नेतृत्वातील नागपूर जि.प.चा ७०० कोटींचा निधी रोखला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2022 08:45 IST

Nagpur News माजी मंत्री सुनील केदार यांच्या नेतृत्वात काँग्रेसची सत्ता असलेल्या जिल्हा परिषदेची तब्बल ७१० कोटींची विकासकामे ठप्प पडली आहेत.

ठळक मुद्देपाणीपुरवठा, आरोग्य, रस्ते अशा अत्यावश्यक सेवेतील कामे ठप्प

नागपूर : महाविकास आघाडीची सरकारच्या काळात काँग्रेसची सत्ता असलेल्या नागपूर जिल्हा परिषदेला गरजेनुसार निधी मिळाला. मात्र, राज्यात सत्तांतर होऊन शिंदे -फडणवीस सरकार सत्तेवर येताच जिल्हा परिषदेचा विकासकामांचा निधी थाबंविण्यात आला आहे. परिणामी माजी मंत्री सुनील केदार यांच्या नेतृत्वात काँग्रेसची सत्ता असलेल्या जिल्हा परिषदेची तब्बल ७१० कोटींची विकासकामे ठप्प पडली आहेत.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या गृह जिल्ह्यातील जिल्हा परिषदेत काँग्रेसची एकहाती सत्ता आहे. काँग्रस नेते माजी मंत्री सुनील केदार यांच्या सत्ता स्थापनेत मोठा वाटा असून त्यांच्या कमांडवरच जिल्हा परिषद चालत आहे. नुकत्याच झालेल्या अध्यक्ष- उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीत काँग्रेसमध्ये बंडाळी झाल्यानंतरही केदार यांच्या सतर्कतेमुळे काँग्रेसला सत्ता राखता आली. हा सर्व राजकीय घटनाक्रम पाहता केदारांच्या नेतृत्त्वातील जिल्हा परिषदेचा निधी हेतूपूरस्सर रोखण्यात आला, असा काँग्रेसच्या जि.प. सदस्यांचा आरोप आहे. आरोग्य, शिक्षण, सिंचन व पाणीपुरवठा अशा अत्यावश्यक सेवेतील कामेही अडल्याने याचा परिणाम ग्रामीण भागातील सवर्सामान्य जनतेवर होण्याची शक्यता आहे. राजकीय सूड भावनेतून जनतेला वेठीस धरण्याचाच हा प्रकार असल्याची टीका काँग्रेस- राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केली असून हिवाळी अधिवेशनात याचा हिशेब मागण्याचा इशाराही दिला आहे.

निधी रोखल्यामुळे थांबलेली कामे

- २०२२-२३ या वर्षात हाती घेण्यात आलेली तसेच २०२३-२४ या वर्षातील प्रस्तावित १५० रस्त्यांची कामे ठप्प आहेत.

- जिल्ह्यातील लोकांना उत्तम दर्जाची आरोग्य सेवा उपलब्ध व्हावी, यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रांच्या बांधकामासाठी १५ कोटींचा निधी मंजूर करण्यात आला. मात्र ही कामे थांबली आहे.

- तीर्थक्षेत्र विकासासाठी १० कोटी, अंगणवाडी बांधकामासाठी ८ कोटी, शाळा बांधकामासाठी २० कोटींच्या कामांना मंजुरी प्राप्त आहे. मात्र, निधी रोखल्याने ही काम ठप्प पडली आहे.

- जनसुविधांच्या कामासाठी ३५ कोटी तर नागरी सुविधांसाठी २० कोटी मंजूर आहेत. ही कामे देखील थांबली आहेत.

- जिल्ह्यातील सिंचनात वाढ व्हावी, यासाठी २० कोटींचा निधी मंजूर करण्यात आला. मात्र, शासनाने निधी थांबविल्याने तलाव दुरुस्ती, खोलीकरण अशी कामे थांबली आहेत.

स्थायी समितीच्या पत्राची सरकारकडून दखलच नाही

विकास निधी थांबविल्याने जिल्हृयातील ७१० कोटींची विकासकामे ठप्प पडली आहेत. त्याचा ग्रामीण भागातील रोजगारावरही परिणाम झाला आहे. मार्च २०२३ पूर्वी ही कामे करावयाची असल्याने राज्य सरकारने थांबविलेला निधी जिल्हा परिषदेला तातडीने उपलब्ध करावा, अशी मागणी जि. प. च्या स्थायी समितीने राज्य सरकारकडे केली आहे. शासनाकडे वेळोवेळी पत्रव्यवहार केला. मात्र, शासनाने अद्याप याची दखल घेतली नसल्याची माहिती जि.प.च्या उपाध्यक्ष कुंदा राऊत दिली.

टॅग्स :Sunil Kedarसुनील केदार