शहरं
Join us  
Trending Stories
1
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
2
मोठी दुर्घटना टळली! अहमदाबादसारखेच अमेरिकेतही बोईंग 787 च्या इंजिनमध्ये बिघाड, उड्डाण होताच पायलट म्हणाला, मेडे, मेडे
3
Pakistan Water : पाकिस्तानमध्ये पाण्याचं संकट वाढलं! भारतासोबतचा संघर्ष महागात पडला
4
नवी मुंबईतील शिक्षिकेचं अल्पवयीन विद्यार्थ्यासोबत घाणेरडं कृत्य, वडिलांनी बघताच पोलीस स्टेशन गाठले!
5
पत्नी झाली बेवफा! पतीला दारू पाजली अन् नाल्यात ढकलून दिलं; प्रियकरासोबत पळणारच होती, पण...
6
फराह खानचा कुक दिलीपचा पगार किती? आयटी कंपनीतील कर्मचाऱ्याची सॅलरी पण पडेल फिक्की!
7
शेअर बाजारात NSDL ची होणार CDSL शी टक्कर; ग्रे मार्केटमध्ये काय संकेत, किती गुंतवणूक करावी लागणार?
8
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सोशल मीडिया वापराबाबत नवे नियम; उल्लंघन केल्यास नोकरी गमवाल!
9
लस्सीवरून दुकानदारांमध्ये तुफान राडा, एकमेकांवर लाठ्याकाठ्या, दगड विटांनी केला हल्ला
10
प्रियंका गांधी म्हणाल्या, 'मी शिवस्तोत्र म्हणून आलेय'; लोकसभेत नेमकं काय घडलं?
11
३ दिवसांच्या घसरणीला ब्रेक, टाटा-रिलायन्ससह 'या' शेअर्समुळे गुंतवणूकदारांना दिलासा! तुमच्या पोर्टफोलिओचं काय झालं?
12
आमिर खानने घेतला मोठा निर्णय, अभिनेत्याने सुरू केलं 'जनता का थिएटर'
13
"ऑपरेशन महादेव कालच का झालं?"; अखिलेश यादवांनी सरकारला घेरलं, पुलवामा हल्ल्यातील 'त्या' गाडीबद्दल काय बोलले?
14
शैलेश जेजुरीकर बनले 'या' अमेरिकन कंपनीचे CEO! मायक्रोसॉफ्ट, गुगलनंतर आता P&G लाही मिळणार 'भारतीय' नेतृत्व!
15
Tripti Dimri : "मी ३० वर्षांपासून गप्प...", तृप्ती डिमरीने खूप काही केलंय सहन, का नाही उठवला आवाज?
16
Russia Ukraine War: "हल्ले थांबवा अन्यथा..."; रशिया-युक्रेन युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्पकडून पुतिन यांना इशारा!
17
BCCI च्या ऑफिसमध्ये चोरी; सुरक्षा रक्षकाने लाखोंच्या IPL जर्सी चोरुन हरयाणात विकल्या
18
"कलंकित मंत्र्यांचा राजीनामा न घेणाऱ्या सरकारने गोमूत्र शिंपडून त्यांना पवित्र करून घ्यावे", विजय वडेट्टीवार यांची टीका
19
चीनमध्ये Apple ला मोठा झटका! एका रिटेल स्टोअरवर लावले टाळे, पण भारतासाठी आहे 'खुशखबर'!
20
हिंजवडीतील रस्ते अपुरे का पडू लागले? यावर काही उपाय आहेत का, की काहीच नाहीत... करणार कोण?

सुनील केदार यांच्या नेतृत्वातील नागपूर जि.प.चा ७०० कोटींचा निधी रोखला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2022 08:45 IST

Nagpur News माजी मंत्री सुनील केदार यांच्या नेतृत्वात काँग्रेसची सत्ता असलेल्या जिल्हा परिषदेची तब्बल ७१० कोटींची विकासकामे ठप्प पडली आहेत.

ठळक मुद्देपाणीपुरवठा, आरोग्य, रस्ते अशा अत्यावश्यक सेवेतील कामे ठप्प

नागपूर : महाविकास आघाडीची सरकारच्या काळात काँग्रेसची सत्ता असलेल्या नागपूर जिल्हा परिषदेला गरजेनुसार निधी मिळाला. मात्र, राज्यात सत्तांतर होऊन शिंदे -फडणवीस सरकार सत्तेवर येताच जिल्हा परिषदेचा विकासकामांचा निधी थाबंविण्यात आला आहे. परिणामी माजी मंत्री सुनील केदार यांच्या नेतृत्वात काँग्रेसची सत्ता असलेल्या जिल्हा परिषदेची तब्बल ७१० कोटींची विकासकामे ठप्प पडली आहेत.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या गृह जिल्ह्यातील जिल्हा परिषदेत काँग्रेसची एकहाती सत्ता आहे. काँग्रस नेते माजी मंत्री सुनील केदार यांच्या सत्ता स्थापनेत मोठा वाटा असून त्यांच्या कमांडवरच जिल्हा परिषद चालत आहे. नुकत्याच झालेल्या अध्यक्ष- उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीत काँग्रेसमध्ये बंडाळी झाल्यानंतरही केदार यांच्या सतर्कतेमुळे काँग्रेसला सत्ता राखता आली. हा सर्व राजकीय घटनाक्रम पाहता केदारांच्या नेतृत्त्वातील जिल्हा परिषदेचा निधी हेतूपूरस्सर रोखण्यात आला, असा काँग्रेसच्या जि.प. सदस्यांचा आरोप आहे. आरोग्य, शिक्षण, सिंचन व पाणीपुरवठा अशा अत्यावश्यक सेवेतील कामेही अडल्याने याचा परिणाम ग्रामीण भागातील सवर्सामान्य जनतेवर होण्याची शक्यता आहे. राजकीय सूड भावनेतून जनतेला वेठीस धरण्याचाच हा प्रकार असल्याची टीका काँग्रेस- राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केली असून हिवाळी अधिवेशनात याचा हिशेब मागण्याचा इशाराही दिला आहे.

निधी रोखल्यामुळे थांबलेली कामे

- २०२२-२३ या वर्षात हाती घेण्यात आलेली तसेच २०२३-२४ या वर्षातील प्रस्तावित १५० रस्त्यांची कामे ठप्प आहेत.

- जिल्ह्यातील लोकांना उत्तम दर्जाची आरोग्य सेवा उपलब्ध व्हावी, यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रांच्या बांधकामासाठी १५ कोटींचा निधी मंजूर करण्यात आला. मात्र ही कामे थांबली आहे.

- तीर्थक्षेत्र विकासासाठी १० कोटी, अंगणवाडी बांधकामासाठी ८ कोटी, शाळा बांधकामासाठी २० कोटींच्या कामांना मंजुरी प्राप्त आहे. मात्र, निधी रोखल्याने ही काम ठप्प पडली आहे.

- जनसुविधांच्या कामासाठी ३५ कोटी तर नागरी सुविधांसाठी २० कोटी मंजूर आहेत. ही कामे देखील थांबली आहेत.

- जिल्ह्यातील सिंचनात वाढ व्हावी, यासाठी २० कोटींचा निधी मंजूर करण्यात आला. मात्र, शासनाने निधी थांबविल्याने तलाव दुरुस्ती, खोलीकरण अशी कामे थांबली आहेत.

स्थायी समितीच्या पत्राची सरकारकडून दखलच नाही

विकास निधी थांबविल्याने जिल्हृयातील ७१० कोटींची विकासकामे ठप्प पडली आहेत. त्याचा ग्रामीण भागातील रोजगारावरही परिणाम झाला आहे. मार्च २०२३ पूर्वी ही कामे करावयाची असल्याने राज्य सरकारने थांबविलेला निधी जिल्हा परिषदेला तातडीने उपलब्ध करावा, अशी मागणी जि. प. च्या स्थायी समितीने राज्य सरकारकडे केली आहे. शासनाकडे वेळोवेळी पत्रव्यवहार केला. मात्र, शासनाने अद्याप याची दखल घेतली नसल्याची माहिती जि.प.च्या उपाध्यक्ष कुंदा राऊत दिली.

टॅग्स :Sunil Kedarसुनील केदार