शहरं
Join us  
Trending Stories
1
जगदीप धनखड यांनी अचानक राजीनामा का दिला? अमित शाह म्हणाले, 'जास्त ताणून काहीतरी...'
2
काय आहे 'सलवा जुडूम' ?; ज्यावरून अमित शाहांनी विरोधकांच्या उपराष्ट्रपतिपदाच्या उमेदवाराला घेरले
3
AI ची कमाल, आता म्हातारपणही रोखणार, राहाल "चिरतरुण"! काय आहे चॅटबॉट रिव्हर्स एजिंग? जाणून घ्या
4
अमित साटम मुंबई भाजपाचे नवे अध्यक्ष; महापालिकेत नवा रेकॉर्ड करणार, CM देवेंद्र फडणवीसांचा दावा
5
ओला इलेक्ट्रिकच्या शेअर्समध्ये जोरदार तेजी; नीति आयोगाच्या वृत्ताचा परिणाम, तुमच्याकडे आहे का?
6
Pune: सिंहगडावरून बेपत्ता झालेला गौतम गायकवाड पाच दिवसांनी सापडला; कुठे होता, पोलिसांनी काय सांगितलं?
7
"मी कुणाच्या वाट्याला जात नाही आणि..." अजित पवारांनी घेतली संकर्षण कऱ्हाडेची फिरकी
8
अमेरिका ७, चीन ४, भारत १.., ही कोणती यादी, जिथे फक्त दोनच दिग्गजांचं आहे वर्चस्व; यातून काय मिळताहेत संकेत?
9
लहान गुंतवणुकीतून कोट्यधीश होण्यासाठी SIP का आहे बेस्ट? 'हे' ८ मुद्दे ठरतात गेमचेंजर
10
गर्लफ्रेंडशी शरीरसंबंध प्रस्थापित करताना पुरूषाचा मृत्यू, कोर्टाने प्रेमिकेला ठोठवला दंड
11
वराह म्हणजे डुक्कर नाही, तर ते यज्ञरूप आहे; वराह जयंतीनिमित्त जाणून घ्या विष्णूंचे अवतारकार्य
12
Viral: रीलचा नाद जीवावर बेतला; २२ वर्षीय युट्यूबर धबधब्यामध्ये बुडाला, घटनाकॅमेऱ्यात कैद
13
गुडन्यूज! परिणीती चोप्रा होणार आई, लग्नाच्या दोन वर्षांनंतर कुणीतरी येणार येणार गं...
14
सरकारच्या एक निर्णयाने अडचणीत आली ₹6,98,44,77,87,200 ची कंपनी; कोण आहेत ड्रीम-11 चे मालक हर्ष जैन? अंबानी कुटुंबाशी खास नातं!
15
एक मुलगा छातीवर बसला, दुसऱ्याने हात-पाय बांधले; रिटायर्ड DSP ना मारहाण; हिसकावलं ATM
16
चौथ्या स्टेजच्या कर्करोगाशी झुंजतेय अभिनेत्री तनिष्ठा चॅटर्जी, तिला सतावतेय ९ वर्षांच्या मुलीची चिंता
17
Prithvi Shaw : संघ बदलला अन् फार्मात आला! पृथ्वी शॉच्या भात्यातून आली आणखी एक कडक खेळी
18
Nikki Murder Case : हुंड्यासाठी निक्कीला जाळून मारलं; पती, सासूनंतर आता दीर आणि सासऱ्यालाही अटक
19
हरितालिका व्रत २०२५: ‘हे’ नियम अवश्य पाळावेत; व्रत पूजनानंतर म्हणावी हरितालिका आरती
20
१० वेळा बॉयफ्रेंडसोबत पळाली, आता विवाहित महिलेने ठेवला १५-१५ चा अजब फॉर्म्युला; ऐकून सगळेच हैराण

७0 गावे रात्रभर अंधारात

By admin | Updated: May 16, 2014 00:52 IST

देवलापार परिसरातील तब्ब्ल ७0 गावांमधील वीजपुरवठा बुधवारी रात्री ८ वाजता खंडित करण्यात आला. मंगळवारी सकाळी १0 वाजताच्या सुमारास वीजपुरवठा सुरळीत करण्यात आल्याने ..

करवाही : देवलापार परिसरातील तब्ब्ल ७0 गावांमधील वीजपुरवठा बुधवारी रात्री ८ वाजता खंडित करण्यात आला. मंगळवारी सकाळी १0 वाजताच्या सुमारास वीजपुरवठा सुरळीत करण्यात आल्याने ग्रामस्थांना अख्खी रात्र अंधारात व गरमीमध्ये काढावी लागली. ब्रेक डाऊनमुळे हा प्रकार घडल्याचे कारण महावितरणच्या अधिकार्‍यांनी पुढे केले आहे.

बुधवारी दिवसभर परिसरातील वातावरण नीरभ्र होते. दिवसभर व रात्री वादळी परिस्थिती नसताना रात्री ८ वाजताच्या सुमारास या परिसरातील ७0 गावांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला. रात्रभर वीजपुरवठा सुरळीत करण्यात न आल्याने लहान मुलांसह अंदाजे ६0 हजार ग्रामस्थांना डासांचा सामना करीत गरमीमध्ये रात्रा काढावी लागली. यासंदर्भात देवलापार येथील कनिष्ठ अभियंता धाबेकर यांच्याशी कारण विचारण्यासाठी संपर्क साधला असता, त्यांनी उर्मटपणे उत्तर दिल्याचे अनेकांनी सांगितले. शिवाय, रात्री ११ नंतर त्यांनी फोन घेणही बंद केले. योग्य कारण न कळाल्याने नागरिकांमध्ये संभ्रमाची स्थिती होती. काहींनी महावितरणच्या रामटेक व नागपूर येथे कार्यालयांत संपर्क साधला, मात्र कुणीही समाधान केले नाही.

हा संपूर्ण परिसर जंगलव्याप्त व आदिवासीबहुल आहे. या भागात अधिक काळ भारनियमन न करण्याचे निर्देश संबंधितांनी महावितरणच्या कर्मचार्‍यांना दिले आहे. हा परिसर भारनियमनमुक्त करण्यासाठी सिंगल फेज लाईनची व्यवस्था करण्यात आली. त्यासाठी मोठमोठे स्वतंत्र ट्रान्सफॉर्मर उभारले आहेत. यासाठी शासनाने कोट्यवधी रुपयांचा खर्च केला. मात्र, ही संपूर्ण व्यवस्था या भागात कुचकामी ठरली असल्याचे दिसून येते.

जिल्ह्यात सर्वाधिक भारनियमन हे देवलापर परिसरात केले जाते. या परिसरातील करवाही, मानेगाव (टेक), बांद्रा, खुर्सापार यासह काही गावांमध्ये ब्रेक डाऊनच्या नावावर दोन-दोन दिवस वीजपुरवठा खंडित केला जातो. येथील आदिवासीबांधव आधीच विविध मूलभूत सुविधांपासून वंचित असताना महावितरण कंपनीही परिसरातील ग्रामस्थांना वेठीस धरत असल्याचा आरोप काहींनी केला. या भागात ब्रेक डाऊनच्या नावावर नेहमीच वीजपुरवठा खंडित केला जातो. हा प्रकार बंद करून हा परिसर भारनियमनमुक्त करावा, अशी मागणी नागरिकांनी केली असून, आंदोलनाचा इशारा दिला आहे. (वार्ताहर)