शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
2
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
3
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
4
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
5
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
6
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
7
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
8
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
11
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
12
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
13
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
14
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
15
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
16
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
17
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
18
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
19
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
20
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...

७0 गावे रात्रभर अंधारात

By admin | Updated: May 16, 2014 00:52 IST

देवलापार परिसरातील तब्ब्ल ७0 गावांमधील वीजपुरवठा बुधवारी रात्री ८ वाजता खंडित करण्यात आला. मंगळवारी सकाळी १0 वाजताच्या सुमारास वीजपुरवठा सुरळीत करण्यात आल्याने ..

करवाही : देवलापार परिसरातील तब्ब्ल ७0 गावांमधील वीजपुरवठा बुधवारी रात्री ८ वाजता खंडित करण्यात आला. मंगळवारी सकाळी १0 वाजताच्या सुमारास वीजपुरवठा सुरळीत करण्यात आल्याने ग्रामस्थांना अख्खी रात्र अंधारात व गरमीमध्ये काढावी लागली. ब्रेक डाऊनमुळे हा प्रकार घडल्याचे कारण महावितरणच्या अधिकार्‍यांनी पुढे केले आहे.

बुधवारी दिवसभर परिसरातील वातावरण नीरभ्र होते. दिवसभर व रात्री वादळी परिस्थिती नसताना रात्री ८ वाजताच्या सुमारास या परिसरातील ७0 गावांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला. रात्रभर वीजपुरवठा सुरळीत करण्यात न आल्याने लहान मुलांसह अंदाजे ६0 हजार ग्रामस्थांना डासांचा सामना करीत गरमीमध्ये रात्रा काढावी लागली. यासंदर्भात देवलापार येथील कनिष्ठ अभियंता धाबेकर यांच्याशी कारण विचारण्यासाठी संपर्क साधला असता, त्यांनी उर्मटपणे उत्तर दिल्याचे अनेकांनी सांगितले. शिवाय, रात्री ११ नंतर त्यांनी फोन घेणही बंद केले. योग्य कारण न कळाल्याने नागरिकांमध्ये संभ्रमाची स्थिती होती. काहींनी महावितरणच्या रामटेक व नागपूर येथे कार्यालयांत संपर्क साधला, मात्र कुणीही समाधान केले नाही.

हा संपूर्ण परिसर जंगलव्याप्त व आदिवासीबहुल आहे. या भागात अधिक काळ भारनियमन न करण्याचे निर्देश संबंधितांनी महावितरणच्या कर्मचार्‍यांना दिले आहे. हा परिसर भारनियमनमुक्त करण्यासाठी सिंगल फेज लाईनची व्यवस्था करण्यात आली. त्यासाठी मोठमोठे स्वतंत्र ट्रान्सफॉर्मर उभारले आहेत. यासाठी शासनाने कोट्यवधी रुपयांचा खर्च केला. मात्र, ही संपूर्ण व्यवस्था या भागात कुचकामी ठरली असल्याचे दिसून येते.

जिल्ह्यात सर्वाधिक भारनियमन हे देवलापर परिसरात केले जाते. या परिसरातील करवाही, मानेगाव (टेक), बांद्रा, खुर्सापार यासह काही गावांमध्ये ब्रेक डाऊनच्या नावावर दोन-दोन दिवस वीजपुरवठा खंडित केला जातो. येथील आदिवासीबांधव आधीच विविध मूलभूत सुविधांपासून वंचित असताना महावितरण कंपनीही परिसरातील ग्रामस्थांना वेठीस धरत असल्याचा आरोप काहींनी केला. या भागात ब्रेक डाऊनच्या नावावर नेहमीच वीजपुरवठा खंडित केला जातो. हा प्रकार बंद करून हा परिसर भारनियमनमुक्त करावा, अशी मागणी नागरिकांनी केली असून, आंदोलनाचा इशारा दिला आहे. (वार्ताहर)