शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

१४ बँकांना ६८०० कोटी रुपयांचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2018 01:09 IST

विनसम समूह : एसएलसीचा दुरुपयोग करून फसवणूक

नागपूर : विजय मल्ल्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या कर्जबुडव्या विनसम समूहाच्या जतीन मेहताने १५ भारतीय बँकांना ६८०० कोटी रुपयांचा फटका कसा दिला, ते आता समोर आले आहे.बँक आॅफ इंडियाच्या नुकत्याच सेवानिवृत्त झालेल्या एका जनरल मॅनेजरने नाव न छापण्याच्या अटीवर ‘लोकमत’ला जी माहिती दिली ती धक्कादायक आहे. या अधिकाºयाच्या मते जतीन मेहताने योजनाबद्ध पद्धतीने बँकांकडून स्टँडबाय लेटर आॅफ क्रेडिट (एसएलसी)च्या माध्यमातून ही कर्जे काढली आहेत.एसएलसीद्वारे फसवणूकविनसम डायमंड्स व फॉरएव्हर डायमंड्स या कंपन्यांनी विदेशातील बुलीयन बँक्स सोने व्यापाºयांच्या नावाने एसएलसी जारी करवून घेतल्या व त्यामार्फत सोने आयात केले व त्याचे दागिने बनवून संयुक्त अरब अमिरातीमधील व्यापाºयांना निर्यात केले. या एसएलसीच्या अटीमध्ये निर्यात केलेल्या दागिन्यांची रक्कम कंपन्यांना मिळाल्यानंतर कर्जफेड केली जाईल, अशी अट होती. अशाप्रकारे या दोन्ही कंपन्यांनी १५ बँकांकडून ६८०० कोटींचे कर्ज २०१० ते २०१२ दरम्यान घेतले व नंतर हात वर केले. आम्ही ज्या व्यापाºयांना दागिने निर्यात केले होेते त्या व्यापाºयांना सोन्याच्या सट्टाबाजारात नुकसान आले. त्यामुळे त्यांनी आम्हाला पैसे दिले नाहीत म्हणून आम्ही बँकांची कर्जफेड करू शकत नाही, असा युक्तिवाद दोन्ही कंपन्यांनी केला. करारातील अटीमुळे बँकांनी या कंपन्यांकडून कर्जवसुली केली नाही.जतीन मेहता व त्याचे सर्व कुटुंबीय कॅरेबियन आयलँड्समधील सेंट किट्सचे नागरिक आहेत. २०१३ साली ते भारतातून पसार झाले. पण या १५ भारतीय बँकात बँक आॅफ इंडियासुद्धा आहे का? या प्रश्नावर संबंधित अधिकाºयाने उत्तर देण्यास नकार दिला. दरम्यान, बँकांनी तक्रार केल्यानंतर गेल्या तीन वर्षांपासून सीबीआय व प्रवर्तन निदेशालय (ईडी) या प्रकरणाची चौकशी करत असून संयुक्त अरब अमिरातीमधील बँकांनी तपासात सहकार्य करण्याचे आश्वासन दिले आहे.नेमका घोटाळा कसा घडला?विनसम समूहाच्या दोन कंपन्या आहेत. विनसम डायमंड्स अ‍ॅण्ड ज्वेलरी व फॉरएव्हर डायमंड्स. या दोन्ही कंपन्या हिरेजडीत दागिन्यांचा व्यवसाय करत होत्या. त्यासाठी त्या सोने विदेशातून आयात करत होत्या व भारतात दागिने बनवून निर्यात करत होत्या. या कंपन्यांनी सोने आयात करण्यासाठी बँकांकडून ६८०० कोटींची कर्जे एसएलसीमार्फत घेतली व ती बुडवून १५ बँकांना चुना लावला, अशी माहिती या अधिकाºयाने दिली.

टॅग्स :fraudधोकेबाजीBank of Indiaबँक ऑफ इंडिया