शहरं
Join us  
Trending Stories
1
'काश्मीरला जा आणि लष्कराच्या छावणीचे फोटो घेऊन ये"; ISI एजंटने भारतातील गुप्तहेराला कोणते काम दिले होते?
2
'मीदेखील या गोष्टीला बळी पडलोय', सरन्यायाधीश प्रोटोकॉल प्रकरणावर उपराष्ट्रपतींची प्रतिक्रिया
3
'ऑपरेशन सिंदूर' आधी पाकिस्तानला दिली होती माहिती?; परराष्ट्र सचिवांनी संसदीय समितीत केला खुलासा
4
Shocking: व्हिडीओ कॉलसमोर प्रेमीयुगुलानं केलं विषप्राशन; प्रेयसीचा मृत्यू, प्रियकर आयसीयूमध्ये!
5
Jalana: कामाहून परतणाऱ्या तीन कष्टकरी मित्रांवर वीज कोसळली; दोघांचा मृत्यू
6
भुईमूग बाजारात नेला अन् पावसामुळे वाहून गेला; महाराष्ट्रातील शेतकऱ्याला थेट केंद्रीय कृषिमंत्र्याचा कॉल; म्हणाले...
7
"भारत धर्मशाळा नाही, जिथं जगातील शरणार्थींना ठेवू शकतो..."; सुप्रीम कोर्टाची टिप्पणी
8
सूरतमध्ये २३ वर्षीय युवतीवर गँगरेप; पोलिसांनी भाजपा पदाधिकाऱ्यासह त्याच्या मित्राला केली अटक
9
प्रशांत किशोर यांच्या जन सुराज पक्षाला मिळाला राष्ट्रीय अध्यक्ष; या व्यक्तीवर जबाबदारी...
10
प्लेऑफ्सआधी RCB ची मोठी चाल! रोहित, शुबमनवर भारी पडलेल्या झिम्बाब्वेच्या गड्यावर खेळला डाव
11
सैफुल्लाह खालिदचा खात्मा...आतापर्यंत १५ हून अधिक क्रूर दहशतवाद्यांना 'सीक्रेट किलर'ने मारले
12
'कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ठोस उपाययोजना राबवा', डॉ.दीपक सावंत यांचे उपमुख्यमंत्री शिंदेंना पत्र
13
IPL 2025: एकच नंबर..!! प्रिती झिंटा स्वत: जाऊन वैभव सूर्यवंशीला भेटली, केलं खास कौतुक (Video)
14
हृदयद्रावक! बहिणीच्या मुलावर आईसारखी केली माया अन् रागाच्या भरात त्यालाच संपवलं, कारण...
15
आठवड्यातून नेमका किती वेळा रेफ्रिजरेटर बंद करावा, कशामुळे होऊ शकतो लवकर खराब?
16
Mumbai Covid: मुंबईतील केईएम रुग्णालयात दोन रुग्णांचा कोविडमुळे मृत्यू; रुग्णालयाने अखेर काय सांगितलं?
17
चाळीशी ओलांडली तरी मुक्ता बर्वे का आहे सिंगल? या विवाहित दिग्दर्शकावर होतं अभिनेत्रीचं क्रश
18
"बाई आणि बाटली..." शरद पोंक्षेंकडून मुलाला दोन महत्त्वाचे सल्ले, म्हणाले "नाहीतर करिअरची वाट"
19
७ वर्षांनी 'टीम मोदी'मध्ये परतले एमजे अकबर; केंद्रीय मंत्रिपदाचा का द्यावा लागला होता राजीनामा?
20
भारताचा संघ Asia Cup 2025 मध्ये सहभागी होणार? BCCI ने दिली महत्त्वाची ताजी अपडेट

जिल्ह्यात ६६ टक्के आरटीईचे प्रवेश पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2021 04:06 IST

प्रवेशासाठी पुन्हा वाढविली मुदत : काही तांत्रिक अडचणी व पालकांना अपेक्षित शाळा न मिळाल्याने प्रवेशावर काहीसा परिणाम नागपूर : ...

प्रवेशासाठी पुन्हा वाढविली मुदत : काही तांत्रिक अडचणी व पालकांना अपेक्षित शाळा न मिळाल्याने प्रवेशावर काहीसा परिणाम

नागपूर : आरटीईची प्रवेशप्रक्रिया महिनाभरापासून सुरू आहे. आतापर्यंत जिल्ह्यात ६६ टक्के प्रवेश झाल्याने पुन्हा २३ जुलैपर्यंत प्रवेशास मुदतवाढ दिली. विशेष म्हणजे यापूर्वी ३० जूनपर्यंत मुदत देण्यात आली होती, नंतर ती ९ जुलैपर्यंत वाढविण्यात आली होती.

दुर्बल व वंचित घटकातील बालकांसाठी शिक्षण अधिकार कायद्यांतर्गत (आरटीई) खाजगी शाळांमध्ये २५ टक्के जागा राखीव असतात. मात्र यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर टाळेबंदीमुळे बालकांची प्रवेशप्रक्रिया विलंबाने सुरू झाली. आता कोरोनाची रुग्णसंख्या कमी होत असून जनजीवन पूर्वपदावर येत आहे. शिवाय शासनानेही निर्बंध शिथिल केले आहे. त्यामुळे निवड झालेल्या बालकांची प्रवेश प्रक्रिया ११ जूनपासून सुरू झाली. मात्र विद्यार्थ्यांच्या प्रवेशाची गती मंद असल्याने ९ जुलैपर्यंत मुदतवाढ दिली होती. त्यानंतर आतापर्यंत जिल्ह्यात ६६ टक्केच प्रवेश झाले आहे.

- दृष्टिक्षेपात

जिल्ह्यात आरटीई अंतर्गत शाळांची नोंद - ६८०

एकूण जागा - ५७२९

आतापर्यंत झालेले प्रवेश - ३७८६

शिल्लक जागा - १९४३

- २३ जुलै पर्यंत प्रवेश निश्चित करा

कोरोनामुळे यंदा प्रवेश प्रक्रिया ११ जूनपासून सुरू झाली. ३० जूनपर्यंत पालकांना शाळांमध्ये जाऊन प्रवेश निश्चित करायचे होते. दरम्यान शिक्षण विभागाने ९ जुलैपर्यंत मुदतवाढ दिली होती. आता पुन्हा २३ जुलैपर्यंत पालकांना प्रवेश निश्चित करता येणार आहे.

- शाळांचे पैसे सरकार कधी देणार?

तीन वर्षापासून आरटीईचे पैसे सरकारवर थकीत आहे. ऐन प्रवेशाच्या तोंडावर राज्यासाठी ५० कोटी रुपये देऊन एकप्रकारे तोंडाला पाणी पुसले आहे. शाळेची फी पालकांनी भरली नाही. वीज बिल, टॅक्स शाळांचे माफ करायला हवे होते. शाळा कशी चालवावी हा प्रश्न आहे. खरे तर शाळा कायमच्या बंद करण्यावर संस्थाचालकांची मानसिकता झाली आहे. आम्ही प्रशासनाला आवाहन करतोय की या परिस्थितीत तुम्हीच शाळा चालवून दाखवाव्यात.

कपिल उमाळे, सचिव, मेस्टा

- प्रवेशासाठी येताहेत अडचणी

पहिल्या राऊंडमध्ये निवड झालेल्या बालकांना १ किलोमीटरच्या आतील शाळेत प्रवेश मिळायला हवा होता. परंतु बालकांची निवड ३ किलोमीटर दूर असलेल्या शाळेत झाली आहे. त्यामुळे पालकांना शाळेत टाकण्याची मानसिकता नाही. काही शाळेत आरटीईच्या प्रवेशासाठी अ‍ॅक्टिव्हीटी फी आकारली जात आहे. काही पालकांना प्रवेशासाठी मॅसेज आला पण शाळेने त्या विद्यार्थ्यांचा प्रवेश घेतला नाही. कारण शाळेसोबत विभागाने पाठपुरावा केला नाही. अनेक पालकांचे कागदपत्र पूर्ण नाही. त्यामुळे प्रवेशावर परिणाम झाला आहे.

मो. शाहीद शरीफ, अध्यक्ष, आरटीई अ‍ॅक्शन कमिटी

- जिल्ह्यात आरटीईला चांगला प्रतिसाद

जिल्ह्यात दरवर्षी आरटीईला चांगला प्रतिसाद मिळतो. यंदाही ६६ टक्के प्रवेश निश्चित झाले आहे. राज्याच्या इतर जिल्ह्यात अपेक्षित प्रवेश न झाल्याने वारंवार मुदतवाढ दिली जात आहे. त्यामुळे नागपूर जिल्ह्यालाही ती लागू करून घ्यावी लागत आहे. काही पालकांना अपेक्षित शाळेत प्रवेश न मिळाल्यामुळे त्यांनी प्रवेश नाकारले असेल, तरीही प्रतिसाद चांगला असल्याचे शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले.