शहरं
Join us  
Trending Stories
1
Sandhya Shantaram Death: नृत्याच्या 'बिजली'च्या पैंजणांचा आवाज थांबला..! ज्येष्ठ अभिनेत्री संध्या शांताराम यांचं निधन
2
प्रवाशांची दिवाळी! मुंबई-गोवा ‘वंदे भारत’च्या फेऱ्या वाढणार; कोकणवासीयांना फायदा, नवे टाइमटेबल
3
“आम्ही युती-आघाडीचे बळी ठरलो, आता स्थानिकांच्या भावना लक्षात घेणार”; उद्धव ठाकरे थेट बोलले
4
"गौतमी पाटील तू महाराष्ट्राचा बिहार केलास, तुझी कार..."; मराठी अभिनेत्याने व्यक्त केला संताप
5
'जननायक' पदवीची चोरी होतेय , बिहारी वाले सावधान! पंतप्रधान मोदींनी राहुल गांधी आणि 'राजद'वर निशाणा साधला
6
Uddhav Thackeray : बाळासाहेबांच्या पार्थिवावरुन रामदास कदम यांनी केलेल्या आरोपावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया
7
Kojagiri Purnima 2025: कोजागरीला १ रुपयांचा शिक्का करेल कमाल, नशीब उजळेल, व्हाल मालामाल 
8
धक्कादायक घटना ; 'कफ सिरप' घेतल्याने आठ बालकांचा मृत्यू ! जीव जाण्याला काय ठरले कारणीभूत ?
9
हृदयद्रावक! बॉयफ्रेंडसोबत पळून गेली बायको; ढसाढसा रडत नवऱ्याने ४ मुलांसह नदीत मारली उडी
10
IND vs AUS: ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा; रोहित शर्माला ठेंगा! शुबमन गिल वनडेचा नवा कॅप्टन
11
"हात पाय सलामत ठेवायचे असतील तर…", आमदार संतोष बांगर यांची अधिकाऱ्यांना धमकी, कॉल रेकॉर्डिंग व्हायरल
12
IND vs WI: मोहम्मद सिराज, रवींद्र जडेजाची कमाल; सामन्याच्या तिसऱ्याच दिवशी वेस्ट इंडीजचा खेळ खल्लास!
13
निर्दयी बाप! गावातील तरुणासोबत प्रेमसंबंध असल्याचा संशय; पोटच्या मुलीला दिली भयंकर शिक्षा
14
आसिम मुनीरची आणखी एक चाल, गाझा प्लॅनवर घेतली पलटी; पाकिस्तानची अमेरिकेला मोठी 'ऑफर'
15
वाहनधारकांसाठी आनंदाची बातमी! FASTag नसला तरी दंडापासून सवलत, UPI द्वारे भरावा लागणार फक्त एवढा दंड
16
Video: बाळासाहेब ठाकरे यांच्या 'हाताचे मोल्ड' कुठे होते?; अनिल परबांचा मोठा खुलासा, फोटोच दाखवला
17
१२ वर्षांनी हंस महापुरुष-रुचक योग: ७ राशींचे मंगलच होणार, सुबत्ता-कल्याण; पद-पैसा-प्रतिष्ठा!
18
टूर ठरली शेवटची! नागपूरचे हॉटेल व्यावसायिक आणि त्यांच्या पत्नीचा इटलीतील अपघातात मृत्यू
19
Lenskart च्या IPO ला सेबीची मंजुरी; केव्हा होणार लिस्टिंग, पाहा संपूर्ण डिटेल्स
20
Rohit Pawar : "गुंडांना पाठीशी घालून, निरपराधांना गुन्ह्यात गोवून..."; रोहित पवारांचा चंद्रकांत पाटलांना खोचक सवाल

६५ हजार मागासवर्गीय विद्यार्थी राहणार उच्च शिक्षणापासून वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 04:18 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : अभियांत्रिकी पदवी प्रवेश प्रक्रिया नियमात अचानक केलेल्या बदलामुळे एससी, एसटी, ओबीसी, व्हीजे एनटी आदींचे ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : अभियांत्रिकी पदवी प्रवेश प्रक्रिया नियमात अचानक केलेल्या बदलामुळे एससी, एसटी, ओबीसी, व्हीजे एनटी आदींचे तब्बल ६५ हजार मागासवर्गीय विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहणार आहेत. विशेष म्हणजे शासनाने कुठलाही बदल केला नसताना केवळ एका कार्यालयीन बाबूच्या चुकीमुळे हा सर्व प्रकार घडला आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर नॅशनल असोसिएशन ऑफ इंजिनियर्स (बानाई)ने यासंदर्भात पत्रपरिषद घेऊन या विषयाकडे लक्ष वेधले असून मागासवर्गीय विद्यार्थ्यांवरील हा अन्याय दूर करण्याची मागणी केली आहे. इंजि. कुलदीप रामटेके यांनी याबाबतीत अधिक माहिती देताना सांगितले की, राज्यात अभियांत्रिकी पदवी प्रथम वर्षाची प्रवेश प्रक्रिया राबविल्यानंतरही जर आरक्षित जागा रिकामी राहिली तर सर्व मागासवर्गीयांची एकत्रित मेरिट लिस्ट तयार करून ती आरक्षित जागा मागासवर्गीयांमधूनच भरली जात होती. परंतु शैक्षणिक वर्ष २०१९-२० पासून या प्रक्रियेत बदल केला असून आता जर एखाद्या वर्गाच्या आरक्षित जागा रिकाम्या राहिल्या तर त्या जागा मागासवर्गीयांच्या इतर वर्गातून किंवा गटातून भरल्या जाणार नाहीत. राज्यात अभियांत्रिकी शाखेच्या एकूण १ लाख ३० हजार जागा आहेत. यात एससी, एसटी, ओबीसी, व्हीजे एनटी यासर्वांचे आरक्षण धरले तर ६५ हजार जागा होतात. या बदलामुळे इतक्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांना फटका बसणार आहे. दुसरीकडे मेडिकलमधील प्रवेश प्रक्रिया मात्र पूर्वीप्रमाणेच सुरू आहे. तिथे कुठलाही नवीन नियम नाही. यासंदर्भात अधिक माहिती घेतली असता शासनाने असा कुठलाही बदल केलेला नाही. केवळ अभियांत्रिकी शाखेतील प्रवेशाबाबत नियमावली ठरवताना कार्यालयीन बाबूच्या चुकीने हा प्रकार झाल्याचे दिसून येत असल्याचे रामटेके यांनी सांगितले. यासंदर्भात संबंधित मंत्री व सचिव व आयुक्तांची भेट घेऊन हा सर्व प्रकार त्यांच्या लक्षात आणून दिला आहे. तरी अद्याप यात सुधारणा झाली नाही. शासनाने ही बाब गांभीर्याने घेऊन तातडीने यात सुधारणा करावी, अन्यथा बानाई रस्त्यावर उतरेल असा इशाराही यावेळी देण्यात आला.

पत्रपरिषदेत बानाईचे अध्यक्ष पी.एस. खोब्रागडे, जयंत इंगळे, महेंद्र राऊत, अमन कांबळे प्रामुख्याने उपस्थित होते.