शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
3
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
4
'त्या प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
5
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
6
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
7
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
8
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
9
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
10
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
11
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
12
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
13
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
14
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
15
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
16
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
17
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
18
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
19
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
20
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
Daily Top 2Weekly Top 5

६५ हजार मागासवर्गीय विद्यार्थी राहणार उच्च शिक्षणापासून वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 04:18 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : अभियांत्रिकी पदवी प्रवेश प्रक्रिया नियमात अचानक केलेल्या बदलामुळे एससी, एसटी, ओबीसी, व्हीजे एनटी आदींचे ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : अभियांत्रिकी पदवी प्रवेश प्रक्रिया नियमात अचानक केलेल्या बदलामुळे एससी, एसटी, ओबीसी, व्हीजे एनटी आदींचे तब्बल ६५ हजार मागासवर्गीय विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहणार आहेत. विशेष म्हणजे शासनाने कुठलाही बदल केला नसताना केवळ एका कार्यालयीन बाबूच्या चुकीमुळे हा सर्व प्रकार घडला आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर नॅशनल असोसिएशन ऑफ इंजिनियर्स (बानाई)ने यासंदर्भात पत्रपरिषद घेऊन या विषयाकडे लक्ष वेधले असून मागासवर्गीय विद्यार्थ्यांवरील हा अन्याय दूर करण्याची मागणी केली आहे. इंजि. कुलदीप रामटेके यांनी याबाबतीत अधिक माहिती देताना सांगितले की, राज्यात अभियांत्रिकी पदवी प्रथम वर्षाची प्रवेश प्रक्रिया राबविल्यानंतरही जर आरक्षित जागा रिकामी राहिली तर सर्व मागासवर्गीयांची एकत्रित मेरिट लिस्ट तयार करून ती आरक्षित जागा मागासवर्गीयांमधूनच भरली जात होती. परंतु शैक्षणिक वर्ष २०१९-२० पासून या प्रक्रियेत बदल केला असून आता जर एखाद्या वर्गाच्या आरक्षित जागा रिकाम्या राहिल्या तर त्या जागा मागासवर्गीयांच्या इतर वर्गातून किंवा गटातून भरल्या जाणार नाहीत. राज्यात अभियांत्रिकी शाखेच्या एकूण १ लाख ३० हजार जागा आहेत. यात एससी, एसटी, ओबीसी, व्हीजे एनटी यासर्वांचे आरक्षण धरले तर ६५ हजार जागा होतात. या बदलामुळे इतक्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांना फटका बसणार आहे. दुसरीकडे मेडिकलमधील प्रवेश प्रक्रिया मात्र पूर्वीप्रमाणेच सुरू आहे. तिथे कुठलाही नवीन नियम नाही. यासंदर्भात अधिक माहिती घेतली असता शासनाने असा कुठलाही बदल केलेला नाही. केवळ अभियांत्रिकी शाखेतील प्रवेशाबाबत नियमावली ठरवताना कार्यालयीन बाबूच्या चुकीने हा प्रकार झाल्याचे दिसून येत असल्याचे रामटेके यांनी सांगितले. यासंदर्भात संबंधित मंत्री व सचिव व आयुक्तांची भेट घेऊन हा सर्व प्रकार त्यांच्या लक्षात आणून दिला आहे. तरी अद्याप यात सुधारणा झाली नाही. शासनाने ही बाब गांभीर्याने घेऊन तातडीने यात सुधारणा करावी, अन्यथा बानाई रस्त्यावर उतरेल असा इशाराही यावेळी देण्यात आला.

पत्रपरिषदेत बानाईचे अध्यक्ष पी.एस. खोब्रागडे, जयंत इंगळे, महेंद्र राऊत, अमन कांबळे प्रामुख्याने उपस्थित होते.