शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

कर्करोगामुळे ६० हजार मृत्यूची नोंद :सुशील मानधनिया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2019 21:47 IST

जागतिक आरोग्य संघटनेच्या ‘ग्लोबोकॉन २०१८’नुसार देशात २०१८ मध्ये ११ लाख ५७ हजार २९४ कर्करोगाचे रुग्ण आढळून आले आहेत. यातील सात लाख ८४ हजार रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर महाराष्ट्रात  एक लाख ७२ हजार रुग्ण आढळून आले असून, यातील ६० हजार रुग्णांच्या मृत्यूची नोंद आहे. धक्कादायक म्हणजे, राज्यात केवळ पाचच रुग्णालयात कर्करोगाच्या रुग्णांची नोंद होते. यामुळे याच्या कित्येकपटीने रुग्ण असण्याची शक्यता आहे. कर्करोगावर नियंत्रण मिळविण्यासाठी या रोगाला ‘नोटीफायबल डिसिज’मध्ये टाकणे आवश्यक आहे, असे मत प्रसिद्ध कर्करोग तज्ज्ञ डॉ. सुशील मानधनिया यांनी व्यक्त केले.

ठळक मुद्देराज्यात केवळ पाचच रुग्णालयात कर्करोगाची नोंदणी

लोकमत  न्यूज नेटवर्कनागपूर : जागतिक आरोग्य संघटनेच्या ‘ग्लोबोकॉन २०१८’नुसार देशात २०१८ मध्ये ११ लाख ५७ हजार २९४ कर्करोगाचे रुग्ण आढळून आले आहेत. यातील सात लाख ८४ हजार रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर महाराष्ट्रात  एक लाख ७२ हजार रुग्ण आढळून आले असून, यातील ६० हजार रुग्णांच्या मृत्यूची नोंद आहे. धक्कादायक म्हणजे, राज्यात केवळ पाचच रुग्णालयात कर्करोगाच्या रुग्णांची नोंद होते. यामुळे याच्या कित्येकपटीने रुग्ण असण्याची शक्यता आहे. कर्करोगावर नियंत्रण मिळविण्यासाठी या रोगाला ‘नोटीफायबल डिसिज’मध्ये टाकणे आवश्यक आहे, असे मत प्रसिद्ध कर्करोग तज्ज्ञ डॉ. सुशील मानधनिया यांनी व्यक्त केले.सोमवारी जागतिक कर्करोग दिन साजरा करण्यात आला. या दिनाच्या अनुषंगाने आयोजित पत्रपरिषदेत ते बोलत होते.डॉ. मानधनिया म्हणाले, भारतात कर्करोगाने मृत्यू झालेल्या पुरुषांची संख्या चार लाख १३ हजार तर महिलांची संख्या तीन लाख ७१ हजार आहे. पुरुषांमध्ये मुखाचा कर्करोग, फुफ्फुसाचा कर्करोग, पोटाचा कर्करोग, आतड्यांचा कर्करोग व अन्ननलिकेचा कर्करोग धोकादायक ठरतो, तर महिलांमध्ये स्तनाचा कर्करोग, मुखाचा कर्करोग, गर्भाशयाचा कर्करोग व फुफ्फुसाचा कर्करोग जोखमीचा ठरत आहे. महाराष्ट्रातही कर्करोग वाढत आहे. परंतु त्यावरील उपाययोजना अद्यापही तोकड्या आहेत. याला एक महत्त्वाचे कारण म्हणजे, ‘एचआयव्ही’ किंवा ‘स्वाईन फ्लू’रोगाच्या रुग्णांची शासनस्तरावर जशी नोंदणी होते तशी नोंदणी कर्करोगाची होत नाही. राज्यात कर्करोगाच्या रुग्णांचा नेमका आकडा समोर येत नसल्याने, व्यापक उपाययोजना होत नसल्याचे वास्तव आहे.गर्भाशयाच्या कर्करोगामुळे प्रत्येक आठ मिनिटात एकाचा मृत्यूडॉ. मानधनिया यांनी सांगितले, ग्रामीण व दुर्गम भागात स्तनाच्या कर्करोगाच्या तुलनेत गर्भाशयाच्या कर्करोगाचे प्रमाण मोठे आहे. या कर्करोगामुळे प्रत्येक आठ मिनिटात एका महिलेचा मृत्यू होतो. शहरी भागात स्तनाचा कर्करोग वाढत असून, २२ पैकी एका रुग्णाचा मृत्यू होतो. विशेष म्हणजे, कर्करोगाच्या जनजागृती अभावामुळे कर्करोगाचे रुग्ण हे दुसऱ्या ते तिसऱ्या टप्प्यात उपचारासाठी येतात. यामुळे ५० टक्के रुग्णांचा मृत्यू होतो. कीटकनाशकांचा वाढता वापर धोकादायककीटकनाशकांचा वाढता वापर, प्रदूषण, तंबाखूचे व्यसन, अयोग्य जीवनशैली व व्यायामाचा अभाव, हे कर्करोगाला कारणीभूत ठरत असल्याचे एका प्रश्नाच्या उत्तरात डॉ. मानधनिया यांनी सांगितले.

टॅग्स :cancerकर्करोगdoctorडॉक्टर