शहरं
Join us  
Trending Stories
1
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
2
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
3
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
4
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
5
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
6
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
7
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
8
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
9
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
10
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
11
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
12
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
13
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
14
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
15
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
16
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
17
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
18
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
19
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
20
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?

कर्करोगामुळे ६० हजार मृत्यूची नोंद :सुशील मानधनिया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2019 21:47 IST

जागतिक आरोग्य संघटनेच्या ‘ग्लोबोकॉन २०१८’नुसार देशात २०१८ मध्ये ११ लाख ५७ हजार २९४ कर्करोगाचे रुग्ण आढळून आले आहेत. यातील सात लाख ८४ हजार रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर महाराष्ट्रात  एक लाख ७२ हजार रुग्ण आढळून आले असून, यातील ६० हजार रुग्णांच्या मृत्यूची नोंद आहे. धक्कादायक म्हणजे, राज्यात केवळ पाचच रुग्णालयात कर्करोगाच्या रुग्णांची नोंद होते. यामुळे याच्या कित्येकपटीने रुग्ण असण्याची शक्यता आहे. कर्करोगावर नियंत्रण मिळविण्यासाठी या रोगाला ‘नोटीफायबल डिसिज’मध्ये टाकणे आवश्यक आहे, असे मत प्रसिद्ध कर्करोग तज्ज्ञ डॉ. सुशील मानधनिया यांनी व्यक्त केले.

ठळक मुद्देराज्यात केवळ पाचच रुग्णालयात कर्करोगाची नोंदणी

लोकमत  न्यूज नेटवर्कनागपूर : जागतिक आरोग्य संघटनेच्या ‘ग्लोबोकॉन २०१८’नुसार देशात २०१८ मध्ये ११ लाख ५७ हजार २९४ कर्करोगाचे रुग्ण आढळून आले आहेत. यातील सात लाख ८४ हजार रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर महाराष्ट्रात  एक लाख ७२ हजार रुग्ण आढळून आले असून, यातील ६० हजार रुग्णांच्या मृत्यूची नोंद आहे. धक्कादायक म्हणजे, राज्यात केवळ पाचच रुग्णालयात कर्करोगाच्या रुग्णांची नोंद होते. यामुळे याच्या कित्येकपटीने रुग्ण असण्याची शक्यता आहे. कर्करोगावर नियंत्रण मिळविण्यासाठी या रोगाला ‘नोटीफायबल डिसिज’मध्ये टाकणे आवश्यक आहे, असे मत प्रसिद्ध कर्करोग तज्ज्ञ डॉ. सुशील मानधनिया यांनी व्यक्त केले.सोमवारी जागतिक कर्करोग दिन साजरा करण्यात आला. या दिनाच्या अनुषंगाने आयोजित पत्रपरिषदेत ते बोलत होते.डॉ. मानधनिया म्हणाले, भारतात कर्करोगाने मृत्यू झालेल्या पुरुषांची संख्या चार लाख १३ हजार तर महिलांची संख्या तीन लाख ७१ हजार आहे. पुरुषांमध्ये मुखाचा कर्करोग, फुफ्फुसाचा कर्करोग, पोटाचा कर्करोग, आतड्यांचा कर्करोग व अन्ननलिकेचा कर्करोग धोकादायक ठरतो, तर महिलांमध्ये स्तनाचा कर्करोग, मुखाचा कर्करोग, गर्भाशयाचा कर्करोग व फुफ्फुसाचा कर्करोग जोखमीचा ठरत आहे. महाराष्ट्रातही कर्करोग वाढत आहे. परंतु त्यावरील उपाययोजना अद्यापही तोकड्या आहेत. याला एक महत्त्वाचे कारण म्हणजे, ‘एचआयव्ही’ किंवा ‘स्वाईन फ्लू’रोगाच्या रुग्णांची शासनस्तरावर जशी नोंदणी होते तशी नोंदणी कर्करोगाची होत नाही. राज्यात कर्करोगाच्या रुग्णांचा नेमका आकडा समोर येत नसल्याने, व्यापक उपाययोजना होत नसल्याचे वास्तव आहे.गर्भाशयाच्या कर्करोगामुळे प्रत्येक आठ मिनिटात एकाचा मृत्यूडॉ. मानधनिया यांनी सांगितले, ग्रामीण व दुर्गम भागात स्तनाच्या कर्करोगाच्या तुलनेत गर्भाशयाच्या कर्करोगाचे प्रमाण मोठे आहे. या कर्करोगामुळे प्रत्येक आठ मिनिटात एका महिलेचा मृत्यू होतो. शहरी भागात स्तनाचा कर्करोग वाढत असून, २२ पैकी एका रुग्णाचा मृत्यू होतो. विशेष म्हणजे, कर्करोगाच्या जनजागृती अभावामुळे कर्करोगाचे रुग्ण हे दुसऱ्या ते तिसऱ्या टप्प्यात उपचारासाठी येतात. यामुळे ५० टक्के रुग्णांचा मृत्यू होतो. कीटकनाशकांचा वाढता वापर धोकादायककीटकनाशकांचा वाढता वापर, प्रदूषण, तंबाखूचे व्यसन, अयोग्य जीवनशैली व व्यायामाचा अभाव, हे कर्करोगाला कारणीभूत ठरत असल्याचे एका प्रश्नाच्या उत्तरात डॉ. मानधनिया यांनी सांगितले.

टॅग्स :cancerकर्करोगdoctorडॉक्टर