शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
2
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधुबद्दलही बरंच बोलले
3
'प्रियंका गांधींना पंतप्रधान बनवा', काँग्रेस नेत्याची मागणी; राहुल गांधींचे काय होणार? म्हणाले...
4
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
5
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
6
बांगलादेशमधील दीपूच्या मृत्यूप्रकरणी दिल्लीत VHP चे निदर्शने; बांगलादेश परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय उच्चायुक्तांना बोलावले
7
ज्ञानदा रामतीर्थकरचं लग्न ठरलं! अभिनेत्रीने गुपचूप साखरपुडाही केला, आता लवकरच होणार शुभमंगल सावधान
8
Astrology: नावात बरंच काही आहे! बाळाचे नाव ठेवताना 'ही' काळजी घ्या, नाहीतर लोक नावं ठेवतील
9
अखेर चीनने आयडिया चोरलीच! भारताच्या UPI सोबत स्पर्धा करण्यासाठी ॲप लाँच केले... 'Nihao China'
10
Video - हृदयद्रावक! डीजेवर नाचताना आक्रित घडलं, २३ वर्षीय तरुण खाली कोसळला अन्...
11
"तिथं मी बुलेटप्रूफ कारशिवाय बाहेर पडू शकत नाही!"; कारण... अफगाणिस्तान स्टार क्रिकेटर राशीद खानचा खुलासा
12
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
13
“काँग्रेसचा विषय नक्कीच संपलेला आहे, पण निकालानंतर गरज लागली तर…”; संजय राऊतांचे मोठे विधान
14
ठाकरे बंधुंमधील दादर, शिवडीचा तिढा अखेर सुटला, मोठ्या भावासाठी धाकट्याने घेतले झुकते माप
15
महापालिका निवडणूक २०२६ : प्रस्तावच नाही; काँग्रेस-'वंचित'ची युती होणार की नाही? गोंधळ कायम 
16
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
17
खळबळजनक! सकाळी एन्काऊंटर, संध्याकाळी फरार; पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाला आरोपी
18
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
19
पहाटे ५ ची वेळ, उर्फी जावेद घाबरलेल्या अवस्थेत पोलिस स्टेशनमध्ये पोहोचली; नक्की काय घडलं?
20
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
Daily Top 2Weekly Top 5

विदर्भात उद्योगांसाठी ६० हजार कोटींचे सामंजस्य करार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2023 21:19 IST

Nagpur News आजवर राज्य सरकारने विविध उद्योगांशी २ लाख २३ हजार ३२७ कोटी रुपयांचे सामंजस्य करार केले आहेत. यापैकी तब्बल ६० हजार ४८५ कोटी रुपयांचे करार विदर्भातील आहेत अशी माहिती उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिली.

नागपूर : शिंदे-फडणवीस सरकारच्या एक वर्षाच्या कार्यकाळात राज्यात १ लाख १८ हजार ४२२ कोटींची विदेशी गुंतवणूक आली असून, महाराष्ट्र देशात पहिल्या क्रमाकांवर राहिले आहे. आजवर राज्य सरकारने विविध उद्योगांशी २ लाख २३ हजार ३२७ कोटी रुपयांचे सामंजस्य करार केले आहेत. यापैकी तब्बल ६० हजार ४८५ कोटी रुपयांचे करार विदर्भातील आहेत. यामुळे सुमारे ३० हजार युवकांना रोजगार मिळेल, अशी माहिती उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिली.

उद्योगमंत्री उदय सामंत यांनी बुधवारी उद्योजकांची बैठक घेत त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. यानंतर पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, सरकार विदर्भातील औद्योगिक विकासावर विशेष लक्ष देत आहे. एमआयडीसीतर्फे अमरावती विभागात ४४४५ हेक्टर, तर नागपूर विभागात ५६८५ हेक्टर जमीन अधिग्रहित केली जाणार आहे. विदर्भात १३ हजार कोटी रुपयांची रिन्युएबल इंडस्ट्री लावण्यासाठी करार करण्यात आला आहे. गडचिरोली, चंद्रपूर येथे स्टील उद्योगासाठी पोषक वातावरण आहे. येथे ४० हजार कोटी रुपयांच्या गुंतवणुकीतून ६ कंपन्या प्रकल्प उभारतील. पाणी, वीज, रस्ते आदी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी बुटीबोरी एमआयडीसीला १०० कोटी व भद्रावतीला २०० कोटी रुपये देण्यात आले आहेत. एमआयडीसीत रखडलेल्या उद्योगांसाठी नवसंजीवनी योजना सुरू करण्यात आली आहे. मात्र, जे उद्योग काम सुरूच करणार नाहीत त्यांचे भूखंड परत घेतले जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. रत्नागिरी येथे प्रस्तावित पेट्रोलियम रिफायनरी प्रकल्पासाठी माती परीक्षणाचे काम सुरू आहे. याचा अहवाल आल्यानंतर चित्र स्पष्ट होईल. नागपुरात पेट्रोलियम कॉम्प्लेक्स उभारायचे असेल तर आधी काहीतरी रिफायनरी आली पाहिजे. उपमुख्यमंत्री फडणवीस यासाठी प्रयत्न करीत आहेत, असेही त्यांनी स्पष्ट केले.

चंद्रपूर व मेळघाटमध्ये ट्रायबल क्लस्टर

- आदिवासी भागात विविध प्रकल्प उभारण्याचे धोरण आहे. याअंतर्गत चंद्रपूर व मेळघाट येथे ट्रायबल क्लस्टर उभारण्यास मंजुरी देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

उद्योजकांकडून जीएसटी वसुलीला स्थगिती

- एमआयडीसीमधील उद्योगांवर २०१७ पासून जीएसटी लागू करण्यात आला आहे. केंद्र सरकार एमआयडीसीकडून जीएसटीचे ६५० कोटी रुपये वसूल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. मात्र, याचा बोजा उद्योजकांवर येऊ नये म्हणून उद्योग विभागाने मार्ग काढण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. तोपर्यंत उद्योजकांकडून जीएसटी वसूल करण्यावर स्थगिती देण्यात आली आहे, असेही सामंत यांनी स्पष्ट केले.

वेदांता-फॉक्सकॉनवर अधिवेशनात श्वेतपत्रिका

- वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्प महाराष्ट्रात का सुरू होऊ शकला नाही, याची वस्तुस्थिती मांडणारी श्वेतपत्रिका येत्या पावसाळी अधिवेशनात राज्य सरकारतर्फे सादर केली जाईल, असे सामंत यांनी जाहीर केले. यापूर्वीच्या राज्य सरकारने योग्य प्रतिसाद न दिल्यामुळेच हा प्रकल्प गेल्याचा आरोप त्यांनी केला.

टॅग्स :Uday Samantउदय सामंत