शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
3
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
4
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
5
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
6
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
7
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
8
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
11
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
12
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
13
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
14
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
15
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
16
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
17
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
18
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
19
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
20
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान

'वंदे भारत'ला पहिल्या दिवशी ६० टक्के प्रवाशांचे नमन; सोशल मीडियावर धूम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2022 11:10 IST

नागपूरहून २३३, तर अन्य स्थानकांवरून सव्वाचारशे प्रवाशांचे तिकीट

नागपूर : सोमवारपासून खऱ्या अर्थाने प्रवाशांच्या सेवेत आलेल्या वंदे भारत रेल्वेगाडीला बिलासपूर ते नागपूर आणि नागपूर ते बिलासपूर या दोन्ही मार्गांवर सरासरी ६० टक्के प्रवाशांचा प्रतिसाद मिळाला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागपूर रेल्वेस्थानकावरून रविवारी सकाळी ९.५४ वाजता वंदे भारतला ग्रीन सिग्नल दिला होता. यावेळी या रेल्वेगाडीत खास निमंत्रित प्रवासी, पत्रकार आणि रेल्वे स्टाफचा समावेश होता. आजपासून मात्र तिची सर्व प्रवाशांसाठी नियमित सेवा सुरू झाली. त्यानुसार, सोमवारी सकाळी ६.४५ वाजता ती बिलासपूर रेल्वे स्थानकावरून प्रवाशांना घेऊन नागपूरकडे निघाली. वाटेत रायपूर, दुर्ग, राजनांदगाव आणि गोंदिया या चार स्थानकांवर तिने थांबून साडेपाच तासांत नागपूर गाठले.

१ तास ५० मिनिटांच्या विश्रामानंतर वंदे भारत सोमवारी दुपारी २.०५ वाजता नागपूरहून बिलासपूरकडे निघाली. ती रात्री ७.३५ ला बिलासपूरला पोहोचेल, असे रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. तिला पिहल्या दिवशी प्रवाशांचा प्रतिसाद कसा मिळाला, या संबंधाने दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांकडे विचारणा केली असता त्यांनी बिलासपूर ते नागपूर मार्गावर ५० ते ६०, तर नागपूर ते बिलासपूर मार्गावर ६० ते ७० टक्के प्रवाशांनी प्रवास केल्याचे त्यांनी सांगितले. नागपूर स्थानकावरून या गाडीत २३३ तर अन्य स्थानकावरून सुमारे सव्वाचारशे प्रवाशांनी या गाडीत प्रवास केला.

विशेष म्हणजे, वैशिष्ट्यपूर्ण वंदे भारतमध्ये दिव्यांगांसाठीही अनेक सुविधा आहे. टॉयलेट, ब्रेल लिपी आणि आरक्षित आसन (सिट)ची व्यवस्था आहे.

सोशल मीडियावरही धूम

रविवारी पंतप्रधानांनी नागपूरला वंदे भारतला ग्रीन सिग्नल दिल्यानंतर सुसाट निघालेल्या या रेल्वेगाडीचे जागोजागी जोरदार स्वागत झाले. नागपूरसह ठिकठिकाणच्या पत्रकार आणि सामान्य नागरिकांनी वंदे भारतचे फोटो, व्हिडीओ सोशल मिडियावर अपलोड केले. त्यामुळे या रेल्वेगाडीने सोशल मीडियावरही धूम केली आहे.

टॅग्स :Vande Bharat Expressवंदे भारत एक्सप्रेसrailwayरेल्वे