शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

मनपा कर्मचाऱ्यांचा ५९ महिन्यांचा एरिअर्स थांबला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2019 21:54 IST

महापालिकेतील कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाचा ५९ महिन्यांचा एरिअर्स व ८० महिन्यांचा महागाई भत्ता देण्यासंदर्भात कर्मचारी संघटना व प्रशासनात चर्चा सुरू होती. यासंदर्भात आयुक्तांकडे गेल्या काही दिवसांपूर्वी बैठकही आयोजित करण्यात आली. यात निर्णय न झाल्याने पुन्हा चर्चा होणार होती. मात्र लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागल्याने कर्मचाऱ्यांच्या मागण्यांवरील चर्चा प्रलंबित राहिली. आता आचारसंहिता संपल्यानंतर यावर प्रशासनाकडून निर्णय होण्याची कर्मचाऱ्यांना आशा आहे.

ठळक मुद्देआचारसंहितेची झळ : कर्मचाऱ्यांच्या मागण्या प्रलंबित

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महापालिकेतील कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाचा ५९ महिन्यांचा एरिअर्स व ८० महिन्यांचा महागाई भत्ता देण्यासंदर्भात कर्मचारी संघटना व प्रशासनात चर्चा सुरू होती. यासंदर्भात आयुक्तांकडे गेल्या काही दिवसांपूर्वी बैठकही आयोजित करण्यात आली. यात निर्णय न झाल्याने पुन्हा चर्चा होणार होती. मात्र लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागल्याने कर्मचाऱ्यांच्या मागण्यांवरील चर्चा प्रलंबित राहिली. आता आचारसंहिता संपल्यानंतर यावर प्रशासनाकडून निर्णय होण्याची कर्मचाऱ्यांना आशा आहे.महापालिकेतील कर्मचाऱ्यांना सहावा वेतन आयोग लागू होऊ न नऊ वर्षे झाली; परंतु अद्याप कर्मचाऱ्यांना ५९ महिन्यांचा एरिअर्स मिळालेला नाही तसेच ८० महिन्यांचा महागाई भत्ता कर्मचाऱ्यांना मिळालेला नाही. हक्काचा पैसा मिळत नसल्याने कर्मचाऱ्यांत नाराजी आहे. पदाधिकारी व अधिकारी यांच्याशी कर्मचारी संघटनांच्या समन्वय समितीच्या पदधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांसंदर्भात वेळोवेळी चर्चा के ली. निदर्शने, लाक्षणिक संप व आंदोलने केली; परंतु त्यानंतरही न्याय मिळत नसल्याने कर्मचाऱ्यांत नाराजी आहे.सहावा वेतन आयोग राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना २००६ सालापासून लागू करण्यात आला. महापालिकेत याची अंमलबजावणी १ डिसेंबर २०१० पासून करण्यात आली. राज्य कर्मचाऱ्यांना हा आयोग लागू करण्याला १३ वर्षे झाली तर महापालिकेतील कर्मचाऱ्यांना १० वर्षे झाली. २००६ ते २०१० या दरम्यानच्या ५९ महिन्यांचा एरिअर्स कर्मचाऱ्यांना मिळणे अपेक्षित होते. परंतु ही फरकाची रक्कम अजूनही मिळालेली नाही तसेच महागाई भत्त्यात झालेल्या वाढीची रक्कम वेळोवेळी देण्यात आलेली नाही. अशी जवळपास ८० महिन्यांची थकबाकी कर्मचाºयांना मिळालेली नाही.एरिअर्स व महागाई भत्त्याची थकबाकी मिळावी, यासाठी कर्मचाऱ्यांच्या विविध संघटनांनी एकत्र येत समन्वय समिती गठित केली. या माध्यमातून वेळोवेळी आंदोलनाचा इशारा दिला. लाक्षणिक संपानंतर शिक्षक कर्मचारी संघटनेने मुंडण आंदोलन केले. प्रशासनाने दखल घ्यावी यासाठी समन्वय समितीने बेमुदत संपाची तयारी केली. कर्मचाऱ्यांची सहमती जाणून घेण्यासाठी स्वाक्षरी मोहीम राबविण्यात आली. यात जवळपास ८० टक्के कर्मचाऱ्यांनी बेमुदत आंदोलनाला सहमती दर्शविली.दिवाळीत १० हजारामुळे संप टळलादिवाळीपूर्वी कर्मचाऱ्यांनी एरिअर्स व महागाई भत्ता मिळावा, यासाठी आंदोलनाचा इशारा दिला होता. मात्र प्रशासनाने दिवाळीला कर्मचाऱ्यांना प्रत्येकी १० हजार रु. देण्याचा निर्णय घेण्यात आला. यामुळे आंदोलन टळले. मात्र सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना प्रत्येकी पाच हजार रु. देण्यात आले. यामुळे सेवानिवृत कर्मचाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली.

 

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाEmployeeकर्मचारी