शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठीचा उल्लेख करत भारतीय भाषांबाबत लाल किल्ल्यावरून नरेंद्र मोदींनी केलं मोठं विधान, म्हणाले...
2
'दिवाळीत जीएसटीमध्ये होणार मोठे बदल, सामान्यांसाठी अनेक गोष्टी स्वस्त'; पंतप्रधान मोदींची घोषणा
3
सचिन तेंडुलकरची होणारी सून सानिया, अर्जुन अन् छोटंसं कुत्र्याचं पिल्लू... पाहा UNSEEN PHOTOS
4
“भारताच्या पाण्याने शत्रूंची शेती समृद्ध, सिंधू करार अन्यायकारक”; PM मोदींनी पाकला सुनावले
5
मेक इन इंडिया फायटर जेट इंजिन निर्मितीचे लक्ष्य; PM मोदींचे शास्त्रज्ञांना आवाहन, म्हणाले...
6
"दहशतवाद्यांचे तळ नाहीसे केले, पाकिस्तानची झोप अजूनही उडलेली आहे", PM मोदींनी केले 'ऑपरेशन सिंदूर'वर भाष्य
7
नवी जबाबदारी मिळताच नवाब मलिक अ‍ॅक्शन मोडवर; बैठका घेत मुंबई महापालिका निवडणूक कामाला लागले
8
Independence Day 2025: "वंद्य वंदे मातरम्...", ७९व्या स्वातंत्र्यदिनाच्या सलील कुलकर्णींनी दिल्या सुरेल शुभेच्छा
9
पतीला मारलं अन् तुरुंगात गेली, नवा बॉयफ्रेंड बनवला; कैदेतून बाहेर येताच सासऱ्याचाही खेळ खल्लास केला! नेमकं झालं काय?
10
सचिन तेंडुलकरच्या होणाऱ्या सुनेची पहली झलक; सानिया चांडोकचा सर्वात लेटेस्ट फोटो आला समोर
11
डोनाल्ड ट्रम्प आणि व्लादिमीर पुतिन यांची भेट भारतासाठी फायदेशीर ठरणार? टॅरिफवर होऊ शकतो मोठा निर्णय!
12
आजचे राशीभविष्य, १५ ऑगस्ट २०२५: ५ राशींना शुभ, आर्थिक लाभ; स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घ्याल
13
भारत जगात भारी... अमेरिकेच्या टॅरिफचा परिणाम होणार नाही; एस अँड पी ग्लोबल रेटिंग्सचा दावा
14
मुंबईत फक्त मनसे आणि उद्धवसेनेचीच ताकद, तयारीला लागा; राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
15
किश्तवाडमध्ये लंगर सुरू असतानाच अचानक ढगफुटी, ४६ जण दगावले; १२० जणांना वाचविले
16
६२ आयआयटी उभ्या राहतील इतके पैसे भारतीयांकडून परदेशी शिक्षणावर खर्च; देशातील शिक्षणाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह
17
सरकारला त्यांची जागा दाखवण्याचा निर्धार करू, जनतेला जाणीव करून देण्याची गरज: शरद पवार
18
राज ठाकरेंविरोधात जनहित याचिका; भाषण करु न देण्याची मागणी, लवकरच सुनावणीची शक्यता
19
मुंबईतील घरे विकू नका, बहिणीचेही नाव लावा; धारावीचाही दर्जेदार पुनर्विकास: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
20
तीन हजार कोटींचा घोटाळा; परिमॅच अॅपप्रकरणी ११० कोटींची मालमत्ता जप्त, ईडीची कारवाई

मनपा कर्मचाऱ्यांचा ५९ महिन्यांचा एरिअर्स थांबला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2019 21:54 IST

महापालिकेतील कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाचा ५९ महिन्यांचा एरिअर्स व ८० महिन्यांचा महागाई भत्ता देण्यासंदर्भात कर्मचारी संघटना व प्रशासनात चर्चा सुरू होती. यासंदर्भात आयुक्तांकडे गेल्या काही दिवसांपूर्वी बैठकही आयोजित करण्यात आली. यात निर्णय न झाल्याने पुन्हा चर्चा होणार होती. मात्र लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागल्याने कर्मचाऱ्यांच्या मागण्यांवरील चर्चा प्रलंबित राहिली. आता आचारसंहिता संपल्यानंतर यावर प्रशासनाकडून निर्णय होण्याची कर्मचाऱ्यांना आशा आहे.

ठळक मुद्देआचारसंहितेची झळ : कर्मचाऱ्यांच्या मागण्या प्रलंबित

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महापालिकेतील कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाचा ५९ महिन्यांचा एरिअर्स व ८० महिन्यांचा महागाई भत्ता देण्यासंदर्भात कर्मचारी संघटना व प्रशासनात चर्चा सुरू होती. यासंदर्भात आयुक्तांकडे गेल्या काही दिवसांपूर्वी बैठकही आयोजित करण्यात आली. यात निर्णय न झाल्याने पुन्हा चर्चा होणार होती. मात्र लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागल्याने कर्मचाऱ्यांच्या मागण्यांवरील चर्चा प्रलंबित राहिली. आता आचारसंहिता संपल्यानंतर यावर प्रशासनाकडून निर्णय होण्याची कर्मचाऱ्यांना आशा आहे.महापालिकेतील कर्मचाऱ्यांना सहावा वेतन आयोग लागू होऊ न नऊ वर्षे झाली; परंतु अद्याप कर्मचाऱ्यांना ५९ महिन्यांचा एरिअर्स मिळालेला नाही तसेच ८० महिन्यांचा महागाई भत्ता कर्मचाऱ्यांना मिळालेला नाही. हक्काचा पैसा मिळत नसल्याने कर्मचाऱ्यांत नाराजी आहे. पदाधिकारी व अधिकारी यांच्याशी कर्मचारी संघटनांच्या समन्वय समितीच्या पदधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांसंदर्भात वेळोवेळी चर्चा के ली. निदर्शने, लाक्षणिक संप व आंदोलने केली; परंतु त्यानंतरही न्याय मिळत नसल्याने कर्मचाऱ्यांत नाराजी आहे.सहावा वेतन आयोग राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना २००६ सालापासून लागू करण्यात आला. महापालिकेत याची अंमलबजावणी १ डिसेंबर २०१० पासून करण्यात आली. राज्य कर्मचाऱ्यांना हा आयोग लागू करण्याला १३ वर्षे झाली तर महापालिकेतील कर्मचाऱ्यांना १० वर्षे झाली. २००६ ते २०१० या दरम्यानच्या ५९ महिन्यांचा एरिअर्स कर्मचाऱ्यांना मिळणे अपेक्षित होते. परंतु ही फरकाची रक्कम अजूनही मिळालेली नाही तसेच महागाई भत्त्यात झालेल्या वाढीची रक्कम वेळोवेळी देण्यात आलेली नाही. अशी जवळपास ८० महिन्यांची थकबाकी कर्मचाºयांना मिळालेली नाही.एरिअर्स व महागाई भत्त्याची थकबाकी मिळावी, यासाठी कर्मचाऱ्यांच्या विविध संघटनांनी एकत्र येत समन्वय समिती गठित केली. या माध्यमातून वेळोवेळी आंदोलनाचा इशारा दिला. लाक्षणिक संपानंतर शिक्षक कर्मचारी संघटनेने मुंडण आंदोलन केले. प्रशासनाने दखल घ्यावी यासाठी समन्वय समितीने बेमुदत संपाची तयारी केली. कर्मचाऱ्यांची सहमती जाणून घेण्यासाठी स्वाक्षरी मोहीम राबविण्यात आली. यात जवळपास ८० टक्के कर्मचाऱ्यांनी बेमुदत आंदोलनाला सहमती दर्शविली.दिवाळीत १० हजारामुळे संप टळलादिवाळीपूर्वी कर्मचाऱ्यांनी एरिअर्स व महागाई भत्ता मिळावा, यासाठी आंदोलनाचा इशारा दिला होता. मात्र प्रशासनाने दिवाळीला कर्मचाऱ्यांना प्रत्येकी १० हजार रु. देण्याचा निर्णय घेण्यात आला. यामुळे आंदोलन टळले. मात्र सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना प्रत्येकी पाच हजार रु. देण्यात आले. यामुळे सेवानिवृत कर्मचाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली.

 

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाEmployeeकर्मचारी