शहरं
Join us  
Trending Stories
1
कबुतरांच्या विष्ठेमुळे मुलांना फप्फुसाचे गंभीर आजार; फायब्रोसिसवर औषधेही परिणामकारक ठरत नाहीत
2
आजचे राशीभविष्य : मंगळवार १२ ऑगस्ट २०२५; आज शक्यतो प्रवास टाळावा, अचानक खर्च उदभवण्याची शक्यता
3
Post Office च्या MIS स्कीममध्ये ₹१,००,००० जमा कराल तर महिन्याला किती मिळेल व्याज, पाहा कॅलक्युलेशन
4
पाकिस्तानचे लाड सुरूच! अमेरिकेचा आणखी एक धक्का, 'या' संघटनेवर मारला दहशवादाचा शिक्का
5
दुचाकीला बांधून पत्नीचा मृतदेह नेताना चार पोलिस ठाणी झोपेत होती का? चार मोठी, १५ छोटी गावे ओलांडली, पण...
6
लोकलची प्रवासी वाहतूक क्षमता २५ टक्के वाढणार; सीएसएमटी-खोपोली दरम्यान १५ डब्यांची गाडी धावणार
7
हत्तीचं ॲक्युपंक्चर, बिबट्याचं रूट कॅनल अन् ICU मधील माकड
8
Indian Embassy in Pakistan :'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान घाबरला! इस्लामाबादमधील भारतीय राजदूतांना पाणी, गॅस पुरवठा थांबवला, वर्तमानपत्रांवरही बंदी
9
भटक्या कुत्र्यांचा सर्वाधिक 'चावा' महाराष्ट्राला; सहा वर्षांत तब्बल ३० लाख लोकांचे तोडले लचके
10
शिवाजी विद्यापीठात विद्यार्थीनीने वसतिगृहात टोकाचे पाऊल उचलले; नेमके कारण काय?
11
कबुतरखान्यांबद्दल 'सर्वोच्च' निर्णय आला, आता सरकार काय करणार? CM फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
12
'एसआयआर'वरून विरोधकांच्या गदारोळावर निवडणूक आयोगाचा मोठा खुलासा; पुरावा म्हणून व्हिडीओ जारी; काँग्रेस बॅकफूटवर
13
PM Modi and Zelenskyy phone Call : युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी PM मोदींशी चर्चा केली; लवकरच भारत दौऱ्यावर येऊ शकतात
14
Donald Trump's Tariffs : मोठी तयारी! कर लादणाऱ्या अमेरिकेला धक्का बसणार! भारत या शस्त्राचा वापर करणार
15
ट्रेनिंगमध्ये जुळले सूत, स्वीटीसोबत लग्नानंतरही शरीरसंबंध; आता आयुष्यातूनच उठला, पोलीस उपनिरीक्षक महिलेला अटक
16
नाशिकमध्ये शिंदेसेनेच्या बैठकीत अहिल्यानगरचे दोन गट भिडले; शरद पवार गटाचा पदाधिकारी बैठकीत शिरल्याचा दावा
17
Bank Job: बँकेत नोकरी करण्याचे स्वप्न पूर्ण होणार; आयओबीमध्ये भरती, महाराष्ट्रासाठी 'इतक्या' जागा राखीव
18
टी-२० आशिया कपमध्ये सर्वात मोठी खेळी करणारे टॉप-५ फलंदाज!
19
Dadar Kabutarkhana Ban : मोठी बातमी! कबुतरखान्यांवरील बंदीबाबत सुप्रीम कोर्टाने दिला महत्वाचा निर्णय
20
Ramdas Athawale : Video - "राहुल गांधी निवडणूक आयोगाला घाबरतात, म्हणूनच ते..."; रामदास आठवलेंचा हल्लाबोल

५८५ किलो हर्टसवर.. हे आकाशवाणीचे नागपूर केंद्र आहे...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2021 11:02 IST

Nagpur News आकाशवाणीच्या नागपूर केंद्राचे पहिले प्रसारण १६ जुलै १९४८ रोजी झाले. तेव्हापासून ते एफएम, ऑनलाइन रेडिओ, आदींच्या आधुनिक काळापर्यंत सुरू असलेली आकाशवाणीची वाटचाल नेत्रदीपक आहे.

ठळक मुद्देएफएमच्या दुनियेतही आकाशवाणीचा स्मृतिगंध अबाधितनागपूर आकाशवाणी केंद्राचा ७४ वा वर्धापनदिन

प्रवीण खापरे

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : तंत्रज्ञान कितीही बदलो, मीडिया कधीच लोप पावत नाही... हे म्हणणे आहे, आकाशवाणीचे माजी कार्यक्रम अधिकारी प्रा. बबन नाखले यांचे. नागपूर आकाशवाणीचे अर्काईव्हज अर्थात जुन्या आठवणींचा खजिना पाहिला की त्यांच्या या कथनाला दुजोरा मिळतो. स्मृतींच्या संग्रहाचा एवढा साठा क्वचितच कुणाकडे, कोण्या संस्थेकडे असेल. त्यामुळे, हे नुसते शासकीय स्थळ ठरत नाही तर लाखो मनांच्या प्रतिबिंबाचा वारसा ठरते.

आकाशवाणीच्या नागपूर केंद्राचे पहिले प्रसारण १६ जुलै १९४८ रोजी झाले. तेव्हापासून ते एफएम, ऑनलाइन रेडिओ, आदींच्या आधुनिक काळापर्यंत सुरू असलेली आकाशवाणीची वाटचाल नेत्रदीपक आहे. ५८५ किलो हर्टझ तरंग वारंवारिता असलेल्या या केंद्रावरून युवावाणी, विविध भारती, वृत्त विभाग, कृषी आदी विविध विभागांचे प्रसारण होत असते. आजही या केंद्रांवरून होणाऱ्या विविध कार्यक्रमांचा गोडवा रसिक मनांमध्ये कायम आहे. आजही खेडोपाडी आणि शहरांत आकाशवाणीचे कार्यक्रम ऐकणाऱ्यांची संख्या कमी झालेली नाही. पहिले पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू, आचार्य विनोबा भावे यांच्या निधनाचे थेट आवाजी प्रक्षेपण, लाइव्ह क्रिकेट समालोचन, अनेक घटनांचे वृत्तनिवेदन आणि त्यांचे कलेक्शन आजही आकाशवाणीकडे अर्काईव्हच्या स्वरूपात संग्रहित आहे.

कस्तूरचंद डागा यांनी दिली इमारत

इंग्रजांनी स्थापन केलेल्या भारतीय राज्य प्रसारण मंडळाचे १९३६ साली ऑल इंडिया रेडिओ असे नामकरण झाले. नागपुरात आकाशवाणी केंद्राची पायाभरणी आजच्या केंद्राच्याच ठिकाणी झाली. कस्तूरचंद डागा यांच्या मालकीच्या डागा इमारतीतच हे केंद्र सुरू झाले. ही इमारत आजही ऐतिहासिक वारसा म्हणून संरक्षित आहे.

दररोज किलोने यायची पत्रे

रेडिओ हे श्रवण माध्यम असल्याने कोण बोलतेय, हे कळत नव्हते. त्यामुळे, आवाजाचे प्रचंड फॅन फॉलोईंग असे. ‘माझं गाव माझं वावर’ या कार्यक्रमातील ‘खंडूजी’ हे पात्र इतके प्रसिद्ध होते की त्यांना भेटण्यासाठी प्रचंड गर्दी होत असे. दररोज किलो-दोन किलो पत्र येत असत आणि त्यांची उत्तरे देणे कठीण होत होते. मात्र, उत्तरे देणे क्रमप्राप्त असे.

- प्रा. बबन नाखले, निवृत्त कार्यक्रम अधिकारी, आकाशवाणी नागपूर केंद्र

.................

टॅग्स :Aakashvani square Nagpurआकाशवाणी चौक