शहरं
Join us  
Trending Stories
1
'दोषींना पाठिशी घालणाऱ्यांवरही कारवाई करणार', एकनाथ शिंदेंनी घेतली वैष्णवी हगवणेच्या आईवडिलांची घेतली भेट
2
PBKS vs DC : दिल्लीकर समीरची मॅच विनिंग फिफ्टी; पंजाबचं टेन्शन वाढलं! Qualifier 1 च्या शर्यतीत नवं ट्विस्ट
3
हे वागणं बरं नव्हं... खासदारांनी नाराजीचा सूर आळवत रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना धरले धारेवर 
4
टायपिंगमधून सुटका! तुम्ही जो विचार कराल तो दिसेल स्क्रीनवर; मनातील विचारांनी मोबाइलही चालवता येणार
5
तीन वर्षांच्या मुलाला अंधार असलेल्या खोलीत नेले अन्...; उल्हासनगरात डान्स टीचरचा अल्पवयीन मुलावर अत्याचार
6
अंबा एक्सप्रेसची ओव्हरहेड वायर तुटली! विदर्भ एक्स्प्रेस, नागपूर-पुणे एक्स्प्रेससह अनेक गाड्यांचे वेळापत्रक कोलमडले
7
EPF News: 7 कोटींपेक्षा जास्त लोकांसाठी गुड न्यूज! केंद्र सरकारने पीएफवरील व्याजाची केली घोषणा
8
मोठी कारवाई! मराठवाड्यातील चार जिल्ह्यात ४ कोटी ४८ लाखांचा माल जप्त, ४६४ जणांना अटक
9
'...तर कमी लोक मेले असते', पहलगाममध्ये कुंकू पुसलं गेलेल्या महिलांबद्दल भाजप खासदाराचं वादग्रस्त विधान
10
नाव ऐकून गुन्हेगारांना भरायची धडकी! नागपूरचे माजी पोलीस आयुक्त एस.पी. यादव यांचे मुंबईत निधन
11
वैष्णवी मृत्यु प्रकरण : 'कार, दोन पिस्तूल, चांदीची भांडी...' हगवणेंच्या घरून पोलिसांनी जप्त केलं घबाड
12
जिथं संधी मिळते तिथं तो 'बेस्ट'च देतो! टेस्टमधून डावललेल्या श्रेयस अय्यरनं पुन्हा दाखवली आपली ताकद
13
केरळजवळच्या समुद्रात बुडतंय परदेशी जहाज, तटरक्षक दलाने ९ जणांना वाचवले 
14
Mahayuti: छगन भुजबळ यांना काटशह देण्यासाठी शिंदेंच्या शिवसेनेकडून नरेंद्र दराडे, राजकारण काय?
15
"ज्यांना अजून देश समजला नाही त्यांना परराष्ट्र धोरण काय समजणार?’’, बावनकुळेंची राहुल गांधींवर बोचरी टीका  
16
"मला बऱ्याच दिवसांपासून हे सांगायचं होतं की, मी अनुष्कासोबत रिलेशनशिपमध्ये'; तेज प्रताप यादवांनी दिली प्रेमाची कबुली
17
Sai Sudharsan: भारतीय संघात निवड झाल्यानंतर साई सुदर्शनची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाला?
18
Crime: लग्न मोडल्याच्या रागातून दिवसाढवळ्या तरुणीची निर्घृण हत्या, घरात घुसून चिरला गळा
19
Karun Nair : रोहित-विराटच्या टेस्ट निवृत्तीनंतर आठवला 'त्रिशतकवीर'! आठ वर्षांनी कमबॅकची संधी
20
'धनंजय मुंडेंना क्लीनचिट मिळाली तर मी मंत्रिपदाचा राजीनामा देईन', मंत्री होताच छगन भुजबळांचे मोठे विधान

महाराष्ट्रातील ५३ नद्या अति प्रदूषणाच्या विळख्यात ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2021 04:08 IST

जागतिक नदी संवर्धन दिन विशेष निशांत वानखेडे नागपूर : औद्याेगिकरणाच्या व शहरीकरणाच्या सपाट्यात विविध प्रकारचे प्रदूषण माेठ्या प्रमाणात वाढले ...

जागतिक नदी संवर्धन दिन विशेष

निशांत वानखेडे

नागपूर : औद्याेगिकरणाच्या व शहरीकरणाच्या सपाट्यात विविध प्रकारचे प्रदूषण माेठ्या प्रमाणात वाढले आहे. त्यात जल प्रदूषणाची स्थिती दयनीय झाली असून नद्यांची अवस्था दिवसेंदिवस वाईट हाेत चालली आहे. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ (सीपीसीबी) च्या सर्वेक्षणानुसार देशातील ३५१ लहान-माेठ्या नद्यांचे किनारे अति प्रदूषणाच्या विळख्यात सापडले असून त्यात महाराष्ट्रातील ५३ नद्यांचा समावेश आहे. यामध्ये विदर्भातील वैनगंगा, वर्धा या माेठ्या नद्यांसह कन्हान, वेणा यांचा समावेश आहे. नागनदी, मरू नदी आदी नद्यांचे अस्तित्वही संपुष्टात आले आहे, हे विशेष.

सीपीसीबीने २०१८ मध्ये हा अहवाल जाहीर केला आहे. त्यानुसार हिंडन नदीच्या धर्तीवर प्रदूषण नियंत्रणाचा ॲक्शन प्लॅनही सादर केला हाेता. मात्र दुर्दैव म्हणजे या कृती याेजनेचा हवा तसा लाभ दिसून येत नाही. मंडळाच्या यादीमध्ये मुंबईची उल्हास आणि मिठी नदी सर्वाधिक प्रदूषित म्हणून गणली गेली आहे. मात्र यादीत वैनगंगा व वर्धा नदीचा समावेश असल्याने विदर्भाचीही चिंता वाढली आहे. मंडळाने यामध्ये विशिष्ट किनाऱ्यांचा उल्लेख केला आहे.

मध्य प्रदेशातून उगम पावलेल्या वैनगंगा नदीचा तुमसर ते आष्टीपर्यंतचा ७०७ किलाेमीटरचा विस्तार अति प्रदूषित म्हणून गणला गेला आहे. यामध्ये नागपूर जिल्ह्यातून वाहणाऱ्या किनाऱ्यांचाही समावेश आहे. वर्धा नदीचा घुग्घूस ते राजुरापर्यंतचा ५१ किलाेमीटरचा विस्तार प्रदूषणाच्या उच्च श्रेणीत आहे. कन्हान नदीचा नागपूर ते भंडारा (कामठी, कन्हान, पिंपरी, माैदा) पर्यंतचा १०० कि.मी.चा विस्तार अति प्रदूषणाच्या श्रेणीत असल्याचे नमूद आहे. वेणा नदी ही कावडघाट ते हिंगणघाटच्या किनारी प्रदूषित झाल्याचे या अहवालात नमूद आहे.

वैनगंगा, कन्हान नदीच्या संवर्धनाचा आराखडा

नदीच्या पाण्यात असलेल्या बीओडीच्या स्तरावरून प्रदूषणाची स्थिती निर्धारित करण्यात आली आहे. उल्लेखनीय म्हणजे या सर्वेक्षणानंतर देशातील इतर नद्यांप्रमाणे विदर्भातील वैनगंगा, कन्हान, वर्धा या नद्यांचे प्रदूषण नियंत्रित करण्यासाठी ॲक्शन प्लॅन तयार केला हाेता. मात्र या प्लॅनचे पुढे काय झाले, याबाबत कुणीही सांगायला तयार नाही.

औद्याेगिक व सांडपाणी सर्वाधिक कारणीभूत

- कारखाने, उद्याेगातून निघणारे रासायनिक प्रदूषण हे नद्यांच्या प्रदूषणासाठी सर्वाधिक कारणीभूत आहे.

- त्यापाठाेपाठ शहरातील घरांमधून निघणारे सिव्हेज व सांडपाणी हेही प्रदूषणाचे महत्त्वपूर्ण कारण आहे. नागपूर शहराचा विचार केला असता, शहरातून निघणारे ६५० एमएलडीपैकी ३४० एमएलडी सांडपाणी ट्रिट केले जाते, तर उर्वरित सांडपाणी थेट कन्हान व वैनगंगेला जाऊन मिळते.

- याशिवाय निघणारा कचरा थेट नदीत फेकणे, पर्यटकांचा कचरा नदीत जाणे, तसेच प्लास्टिक प्रदूषण सर्वात भयानक ठरले आहे.

- किनाऱ्यावर असलेले गाव आणि शहरातील मृतकांचे अंत्यसंस्कार हेही प्रदूषणास कारणीभूत ठरत आहे.

- नदीतून वाळूचा अमर्याद उपसा नद्यांच्या अस्तित्वावर संकटकारक ठरला आहे.