शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

अवघ्या नऊ दिवसात ५२ हजार प्रवाशांनी रद्द केला प्रवास;  रेल्वेने परत केले ३ कोटी १८ लाख रुपये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2022 07:00 IST

Nagpur News कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. अशा स्थितीत रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे १ ते ९ जानेवारी दरम्यान तब्बल ५२ हजार ७०३ प्रवाशांनी प्रवास रद्द केल्याची माहिती आहे.

दयानंद पाईकराव

नागपूर : कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. अशा स्थितीत रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे १ ते ९ जानेवारी दरम्यान तब्बल ५२ हजार ७०३ प्रवाशांनी प्रवास रद्द केल्याची माहिती आहे.

कोरोनाची दुसरी लाट ओसरल्यानंतर रेल्वेगाड्यात प्रवाशांची गर्दी वाढली आहे. प्रवाशांच्या मागणीनुसार रेल्वेने विशेष रेल्वेगाड्यांऐवजी नियमित रेल्वेगाड्या सुरू केल्या आहेत. नियमित रेल्वेगाड्यात प्रवाशांना विशेष रेल्वेगाड्यांऐवजी कमी प्रवासभाडे आकारण्यात येत असल्यामुळे रेल्वे प्रवाशांचा प्रतिसाद नियमित रेल्वेगाड्यांना वाढला आहे. जवळपास सर्वच रेल्वेगाड्यात प्रवाशांची गर्दी दिसून येत आहे. परंतु कोरोनाच्या रुग्णांची संख्या अलीकडच्या काळात वाढत आहे.

नागपूर शहरात एका दिवसाला ८५० च्यावर कोरोनाचे रुग्ण आढळून येत आहेत. प्रसारमाध्यमांवरील कोरोनाच्या रुग्णांचा आकडा पाहून रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. त्यामुळे कोरोनापासून बचाव करण्यासाठी प्रवासी आपले तिकीट रद्द करीत आहेत. गेल्या नऊ दिवसात मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात एकूण ५२ हजार ७०३ प्रवाशांनी आपली प्रवासाची तिकिटे रद्द केल्याची माहिती आहे. त्यामुळे मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाला या प्रवाशांना ३ कोटी १८ लाख ३९ हजार ४६ रुपये परत करावे लागले आहे. कोरोनाचे रुग्ण कमी होईपर्यंत प्रवासी अत्यावश्यक कारणासाठीच प्रवास करीत असल्याची माहिती रेल्वेच्या सूत्रांनी दिली.

 

 

 

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वे