शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

अवघ्या नऊ दिवसात ५२ हजार प्रवाशांनी रद्द केला प्रवास;  रेल्वेने परत केले ३ कोटी १८ लाख रुपये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2022 07:00 IST

Nagpur News कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. अशा स्थितीत रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे १ ते ९ जानेवारी दरम्यान तब्बल ५२ हजार ७०३ प्रवाशांनी प्रवास रद्द केल्याची माहिती आहे.

दयानंद पाईकराव

नागपूर : कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. अशा स्थितीत रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे १ ते ९ जानेवारी दरम्यान तब्बल ५२ हजार ७०३ प्रवाशांनी प्रवास रद्द केल्याची माहिती आहे.

कोरोनाची दुसरी लाट ओसरल्यानंतर रेल्वेगाड्यात प्रवाशांची गर्दी वाढली आहे. प्रवाशांच्या मागणीनुसार रेल्वेने विशेष रेल्वेगाड्यांऐवजी नियमित रेल्वेगाड्या सुरू केल्या आहेत. नियमित रेल्वेगाड्यात प्रवाशांना विशेष रेल्वेगाड्यांऐवजी कमी प्रवासभाडे आकारण्यात येत असल्यामुळे रेल्वे प्रवाशांचा प्रतिसाद नियमित रेल्वेगाड्यांना वाढला आहे. जवळपास सर्वच रेल्वेगाड्यात प्रवाशांची गर्दी दिसून येत आहे. परंतु कोरोनाच्या रुग्णांची संख्या अलीकडच्या काळात वाढत आहे.

नागपूर शहरात एका दिवसाला ८५० च्यावर कोरोनाचे रुग्ण आढळून येत आहेत. प्रसारमाध्यमांवरील कोरोनाच्या रुग्णांचा आकडा पाहून रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. त्यामुळे कोरोनापासून बचाव करण्यासाठी प्रवासी आपले तिकीट रद्द करीत आहेत. गेल्या नऊ दिवसात मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात एकूण ५२ हजार ७०३ प्रवाशांनी आपली प्रवासाची तिकिटे रद्द केल्याची माहिती आहे. त्यामुळे मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाला या प्रवाशांना ३ कोटी १८ लाख ३९ हजार ४६ रुपये परत करावे लागले आहे. कोरोनाचे रुग्ण कमी होईपर्यंत प्रवासी अत्यावश्यक कारणासाठीच प्रवास करीत असल्याची माहिती रेल्वेच्या सूत्रांनी दिली.

 

 

 

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वे