शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

वर्षभरात ५२ हजार प्रवासी रेल्वेगाड्या रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2021 23:12 IST

passenger trains canceled लॉकडाऊन आणि कोरोनाच्या धास्तीने असंख्य प्रवाशांनी प्रवास टाळला. प्रवाशांचा अत्यल्प प्रतिसाद असल्यामुळे रेल्वेगाड्या रद्द करण्याची पाळी आली.

ठळक मुद्देफक्त धावल्या १२७८२ गाड्या : १८ लाख ७२ हजार प्रवाशांनी केला प्रवास

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : लॉकडाऊन आणि कोरोनाच्या धास्तीने असंख्य प्रवाशांनी प्रवास टाळला. प्रवाशांचा अत्यल्प प्रतिसाद असल्यामुळे रेल्वेगाड्या रद्द करण्याची पाळी आली. १ एप्रिल २०२० ते ३१ मार्च २०२१ या वर्षभराच्या काळात नागपूर विभागातून धावणाऱ्या ५२ हजार ८५२ प्रवासी रेल्वेगाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.

शहरातील माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी मागविलेल्या माहितीतून ही आकडेवारी समोर आली आहे. कोरोनाने देशात शिरकाव करताच २४ मार्च २०२० पासून भारतीय रेल्वेने प्रवासी वाहतूक बंद केली. संपूर्ण एप्रिल महिन्यात एकही प्रवासी रेल्वेगाडी धावली नाही. परप्रांतीय श्रमिकांना त्यांच्या राज्यापर्यंत सोडून देण्यासाठी मे महिन्यात श्रमिक स्पेशल एक्सप्रेस चालविण्यात आल्या. जून महिन्यापासून मोजक्या विशेष एक्सप्रेस सुरू करण्यात आल्या. कोरोनाची पहिली लाट ओसरल्यानंतर सप्टेंबर महिन्यापासून पुन्हा रेल्वेगाड्यांची संख्या टप्प्याटप्प्याने वाढविण्यात आली. १ एप्रिल २०२० ते ३१ मार्च २०२१ या वर्षभराच्या काळात नागपूर विभागातून धावणाऱ्या ३७ हजार ३६१ एक्सप्रेस व १५ हजार ४९१ पॅसेंजर अशा एकूण ५२ हजार ८५२ प्रवासी रेल्वेगाड्या रद्द करण्यात आल्या. तर, याच काळात नागपूर विभागातून नऊ हजार ९८० एक्सप्रेस व दोन हजार ८०२ पॅसेंजर अशा एकूण १२ हजार ७८२ प्रवासी रेल्वेगाड्या धावल्या. त्यांतून १८ लाख ७२ हजार प्रवाशांनी प्रवास केला. त्यांच्याकडून मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाला १२२ कोटींचा महसूल प्राप्त झाला असून, वर्षभरात नऊ लाखांहून अधिक प्रवाशांनी रेल्वे तिकीट रद्द केले. त्यांच्याकडून तिकीट कॅन्सलेशन चार्जसपोटी रेल्वेला ७.८९ कोटींचे उत्पन्न मिळाले आहे.

टॅग्स :Nagpur Railway Stationरेल्वे स्टेशन नागपूर