शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

नागपुरात ५०० रुपयांच्या खंडणीसाठी हत्येचा प्रयत्न; पानटपरीचालक गंभीर जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2018 16:06 IST

पान टपरी चालकाने ५०० रुपयांची खंडणी दिली नाही म्हणून त्याच्यावर चाकूचे घाव घालून त्याची हत्या करण्याचा प्रयत्न यशोधरानगरातील चार गुंडांनी केला. सोमवारी दुपारी १२.३० च्या सुमारास ही थरारक घटना घडली.

ठळक मुद्देचाकूने भोसकले

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पान टपरी चालकाने ५०० रुपयांची खंडणी दिली नाही म्हणून त्याच्यावर चाकूचे घाव घालून त्याची हत्या करण्याचा प्रयत्न यशोधरानगरातील चार गुंडांनी केला. सोमवारी दुपारी १२.३० च्या सुमारास ही थरारक घटना घडली. समीर अहमद जाकीर अहमद शेख (वय ३२) असे गंभीर जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे.यशोधरानगरातील आयेशा मशिदीजवळ समीर अहमद राहतो. त्याची राजीव गांधी नगरातील उड्डाणपुलाखाली पान टपरी आहे. सोमवारी दुपारी १२. ३० वाजता तो बसून असताना या भागातील गुंड समीर खान समशेर खान (वय २५) त्याच्या तीन साथीदारांसह पान टपरीवर आला. आरोपी खान याने समीरला पान टपरीच्या बाहेर बोलविले. नंतर त्याची कॉलर पकडून त्याला अश्लील शिवीगाळ केली. ५०० रुपये दे नही तो जान से मार दुंगा, असे आरोपी म्हणाला. समीरने पैसे नाही म्हणताच आरोपीने त्याच्या कंबरेत असलेला चाकू बाहेर काढून समीरच्या पोटात भोसकण्याचा प्रयत्न केला. प्रसंगावधान राखत समीर पलटला असता तो चाकू त्याच्या पाठीत खुपसला गेला. तशाही अवस्थेत जीव वाचविण्यासाठी समीर पळू लागला. आरोपी खान आणि त्याच्या तीन साथीदारांनी जखमी समीरचा पाठलाग करून त्याला पकडले. त्यांनी त्याच्यावर पुन्हा चाकूचा वार करण्याचा प्रयत्न केला. मात्र, समीरने जीवाची याचना करीत त्याच्याजवळचे ३०० रुपये आरोपीच्या हातात दिले. त्यामुळे पैसे घेऊन शिवीगाळ करीत आरोपी पळून गेले. दिवसाढवळ्या घडलेल्या या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ निर्माण झाली. जखमी समीरला परिसरातील काही जणांनी डॉक्टरकडे पोहचविले. तेथून माहिती मिळाल्याने यशोधरानगर पोलिसांनी रुग्णालयात पोहचून समीरचे बयाण नोंदविले. त्यावरून आरोपी समीर खान समशेर खान आणि त्याच्या साथीदारांविरुद्ध विविध कलमानुसार गुन्हा दाखल केला. आरोपींचा शोध घेतला जात आहे.

 

टॅग्स :Murderखून