शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
2
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
3
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
4
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
5
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
6
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
7
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
8
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
11
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
12
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
13
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
14
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
15
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
16
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
17
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
18
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
19
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
20
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...

५०० कोटी बदलले, व्यवहारात मात्र १०० कोटीच

By admin | Updated: November 19, 2016 02:30 IST

५०० आणि १००० च्या नोटा चलनातून बंद झाल्यानंतर घरी असलेल्या जुन्या नोटा लोकांनी बँकांपुढे मोठ्या रांगा लावून बदलवून घेतल्या.

बाजारपेठांमध्ये मंदीचे सावट : खर्चाला बसला चाप मोरेश्वर मानापुरे  नागपूर५०० आणि १००० च्या नोटा चलनातून बंद झाल्यानंतर घरी असलेल्या जुन्या नोटा लोकांनी बँकांपुढे मोठ्या रांगा लावून बदलवून घेतल्या. पण त्या नोटा खर्च करण्याची लोकांची मानसिकता नाही. त्यांच्यामध्ये निर्माण झाली भीती आणि काटकसरीमुळे बाजाराची अर्थव्यवस्था कोलमडली आहे. त्यामुळे सर्वच बाजारपेठा ओस पडल्या आहेत. व्यवसायात ३० टक्क्यांपर्यंत घसरणकेंद्र सरकारचा काळ्या पैशाच्या विरोधातील सर्जिकल स्ट्राईकनंतर गेल्या आठ दिवसात लोकांनी राष्ट्रीयीकृत, खासगी आणि नागरी अर्बन बँकांच्या नागपुरातील ५५० पेक्षा जास्त शाखांमधून जवळपास ५०० कोटी रुपयांपेक्षा जास्त जुन्या नोटा बदलवून घेतल्या आणि त्या घरीच ठेवल्या. त्यातील १०० कोटीसुद्धा व्यवहारात नाहीत. त्यामुळे बाजाराची आर्थिक उलाढाल ठप्प पडली आहे. सर्वच बाजारपेठांमधील व्यवहारात ३० टक्क्यांपर्यंत घसरण झाली आहे. दुकानदार चिल्लर नोट देण्यास तयार नाहीत. कापड आणि सराफा बाजाराकडे ग्राहकांनी पाठ फिरविली आहे. थोडी फार खरेदी धान्य आणि खाद्यतेल बाजारात सुरू आहे. ग्राहक किरकोळ दुकानातून केवळ जीवनावश्यक वस्तूंची खरेदी करीत आहेत. १०० व २००० च्या नोटांमध्ये मोठी तफावतअर्थतज्ज्ञांनी सांगितले की, २००० ची नवीन नोट आणि चलनातील १०० ची नोट यात मोठी तफावत आहे. शिवाय नवीन ५०० रुपयांची नोट चलनात अजूनही न आल्यामुळे लोक १०० रुपयाची नोट खर्च करण्यास तयार नाहीत. शिवाय दुकानदार २००० हजार रुपयाच्या नोटेची चिल्लर देत नाही. दुसरी बाजू पाहिल्यास कॅशलेस व्यवस्थेत नागपुरातील ९५ टक्के दुकानदारांकडे डेबिट कार्डने पैसे स्वीकारण्यासाठी ‘टेलर मशीन’ उपलब्ध नाहीत. त्यामुळे आर्थिक उलाढालीत मोठी घसरण झाली आहे. ५०० रुपयांची नवीन नोट जेव्हा नागरिक आणि दुकानदारांच्या हातात येईल, तेव्हाच लोक खरेदीसाठी घराबाहेर पडणार आहेत. त्यावेळी दुकानदारांनाही खरेदीनंतर लोकांना चिल्लर नोट देणे शक्य होईल. तेव्हाच बाजारात उत्साह संचारेल. पण अशी सकारात्मक स्थिती निर्माण होण्यासाठी निश्चितच महिन्याचा कालावधी लागणार आहे. दोन दिवसातच ५०० ची नवीन नोटबॅँक आॅफ महाराष्ट्रचे नागपूर विभागीय उपमहाव्यवस्थापक विजय कांबळे यांनी सांगितले की, ५० आणि १०० रुपयांच्या नोटा लोकांनी घरीच ठेवल्या आहे. ते आवश्यक तेवढीच खरेदी करीत आहेत. ५०० रुपयाची नवीन नोट चलनात आल्यानंतर १०० आणि २००० रुपये यातील गॅप भरून निघेल आणि लोक मोठ्या प्रमाणात १०० रुपयांचे चलन बाजारात आणतील. दोन दिवसातच ५०० रुपयाची नोट चलनात येणार आहे. कांबळे म्हणाले, २००० हजाराची नोट आकारात छोटी आहे. शिवाय ५०० च्या नवीन नोटेचा आकारही पूर्वीच्या नोटेपेक्षा लहान आहे. लोकांना एटीएममधून सर्वच नोटा मिळाव्यात म्हणून बँकांच्या एटीएम मशीनमधील ट्रेमध्ये वास्तविक बदल करण्यात येत आहेत. आता १०० आणि २००० रुपयाची नोट एटीएममधून मिळत आहे. पुढे लोकांना १००, ५०० आणि २००० रुपयाची नोट सहजपणे मिळेल. त्यामुळे पूर्वीप्रमाणेच लोकांच्या खिशात पैसा खेळता राहील आणि बाजारपेठांमध्ये उत्साह येईल. पण यासाठी काही दिवस वाट पाहावी लागेल, असे कांबळे यांनी स्पष्ट केले.