शहरं
Join us  
Trending Stories
1
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
2
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
3
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
4
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
5
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
6
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
7
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
8
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
9
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
10
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
11
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
12
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
13
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
14
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
15
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
16
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
17
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
18
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
19
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
20
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
Daily Top 2Weekly Top 5

५०० कोटी बदलले, व्यवहारात मात्र १०० कोटीच

By admin | Updated: November 19, 2016 02:30 IST

५०० आणि १००० च्या नोटा चलनातून बंद झाल्यानंतर घरी असलेल्या जुन्या नोटा लोकांनी बँकांपुढे मोठ्या रांगा लावून बदलवून घेतल्या.

बाजारपेठांमध्ये मंदीचे सावट : खर्चाला बसला चाप मोरेश्वर मानापुरे  नागपूर५०० आणि १००० च्या नोटा चलनातून बंद झाल्यानंतर घरी असलेल्या जुन्या नोटा लोकांनी बँकांपुढे मोठ्या रांगा लावून बदलवून घेतल्या. पण त्या नोटा खर्च करण्याची लोकांची मानसिकता नाही. त्यांच्यामध्ये निर्माण झाली भीती आणि काटकसरीमुळे बाजाराची अर्थव्यवस्था कोलमडली आहे. त्यामुळे सर्वच बाजारपेठा ओस पडल्या आहेत. व्यवसायात ३० टक्क्यांपर्यंत घसरणकेंद्र सरकारचा काळ्या पैशाच्या विरोधातील सर्जिकल स्ट्राईकनंतर गेल्या आठ दिवसात लोकांनी राष्ट्रीयीकृत, खासगी आणि नागरी अर्बन बँकांच्या नागपुरातील ५५० पेक्षा जास्त शाखांमधून जवळपास ५०० कोटी रुपयांपेक्षा जास्त जुन्या नोटा बदलवून घेतल्या आणि त्या घरीच ठेवल्या. त्यातील १०० कोटीसुद्धा व्यवहारात नाहीत. त्यामुळे बाजाराची आर्थिक उलाढाल ठप्प पडली आहे. सर्वच बाजारपेठांमधील व्यवहारात ३० टक्क्यांपर्यंत घसरण झाली आहे. दुकानदार चिल्लर नोट देण्यास तयार नाहीत. कापड आणि सराफा बाजाराकडे ग्राहकांनी पाठ फिरविली आहे. थोडी फार खरेदी धान्य आणि खाद्यतेल बाजारात सुरू आहे. ग्राहक किरकोळ दुकानातून केवळ जीवनावश्यक वस्तूंची खरेदी करीत आहेत. १०० व २००० च्या नोटांमध्ये मोठी तफावतअर्थतज्ज्ञांनी सांगितले की, २००० ची नवीन नोट आणि चलनातील १०० ची नोट यात मोठी तफावत आहे. शिवाय नवीन ५०० रुपयांची नोट चलनात अजूनही न आल्यामुळे लोक १०० रुपयाची नोट खर्च करण्यास तयार नाहीत. शिवाय दुकानदार २००० हजार रुपयाच्या नोटेची चिल्लर देत नाही. दुसरी बाजू पाहिल्यास कॅशलेस व्यवस्थेत नागपुरातील ९५ टक्के दुकानदारांकडे डेबिट कार्डने पैसे स्वीकारण्यासाठी ‘टेलर मशीन’ उपलब्ध नाहीत. त्यामुळे आर्थिक उलाढालीत मोठी घसरण झाली आहे. ५०० रुपयांची नवीन नोट जेव्हा नागरिक आणि दुकानदारांच्या हातात येईल, तेव्हाच लोक खरेदीसाठी घराबाहेर पडणार आहेत. त्यावेळी दुकानदारांनाही खरेदीनंतर लोकांना चिल्लर नोट देणे शक्य होईल. तेव्हाच बाजारात उत्साह संचारेल. पण अशी सकारात्मक स्थिती निर्माण होण्यासाठी निश्चितच महिन्याचा कालावधी लागणार आहे. दोन दिवसातच ५०० ची नवीन नोटबॅँक आॅफ महाराष्ट्रचे नागपूर विभागीय उपमहाव्यवस्थापक विजय कांबळे यांनी सांगितले की, ५० आणि १०० रुपयांच्या नोटा लोकांनी घरीच ठेवल्या आहे. ते आवश्यक तेवढीच खरेदी करीत आहेत. ५०० रुपयाची नवीन नोट चलनात आल्यानंतर १०० आणि २००० रुपये यातील गॅप भरून निघेल आणि लोक मोठ्या प्रमाणात १०० रुपयांचे चलन बाजारात आणतील. दोन दिवसातच ५०० रुपयाची नोट चलनात येणार आहे. कांबळे म्हणाले, २००० हजाराची नोट आकारात छोटी आहे. शिवाय ५०० च्या नवीन नोटेचा आकारही पूर्वीच्या नोटेपेक्षा लहान आहे. लोकांना एटीएममधून सर्वच नोटा मिळाव्यात म्हणून बँकांच्या एटीएम मशीनमधील ट्रेमध्ये वास्तविक बदल करण्यात येत आहेत. आता १०० आणि २००० रुपयाची नोट एटीएममधून मिळत आहे. पुढे लोकांना १००, ५०० आणि २००० रुपयाची नोट सहजपणे मिळेल. त्यामुळे पूर्वीप्रमाणेच लोकांच्या खिशात पैसा खेळता राहील आणि बाजारपेठांमध्ये उत्साह येईल. पण यासाठी काही दिवस वाट पाहावी लागेल, असे कांबळे यांनी स्पष्ट केले.