शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यातील जिल्हा परिषदांमधील अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या सविस्तर
2
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
3
पृथ्वीवर ९ दिवस फिरत होत्या अज्ञात लहरी...; ग्रीनलँडची २०२३ ची ती घटना अन्...
4
शेअर बाजारातील नुकसानीपासून वाचण्याचा सॉलिड फंडा, नितीन कामथ यांनी सांगितली भन्नाट ट्रिक
5
"ही तर फक्त सुरूवात..." नाशिकमध्ये उद्धवसेना-मनसे संयुक्त जनआक्रोश मोर्चा; भाजपाला दिलं आव्हान
6
'भारताच्या वाढीमुळे घाबरले, म्हणून शुल्क लादला', ट्रम्प टॅरिफवर मोहन भागवतांचे सूचक विधान
7
क्रूरतेचा कळस! गुजरातमधून विमानानं आला, गर्लफ्रेंडवर अत्याचार केला अन् ५१ वेळा स्क्रूड्रायव्हर खुपसला; कोर्टाने सुनावली शिक्षा
8
एकेकाळी ५००० रुपये होता पगार, आता त्यांची कंपनी आणतेय ३८२० कोटींचा IPO; कोण आहे ही व्यक्ती?
9
पितृपक्ष २०२५: ५ रुपयांत मिळणाऱ्या ५ वस्तू पितरांना अर्पण करा; पूर्वज आयुष्यभर आशीर्वाद देतील
10
UPSC ची तयारी करणाऱ्या युवकानं उचललं धक्कादायक पाऊल; स्वत:चा प्रायव्हेट पार्ट कापला, कारण...
11
विजयादशमी २०२५: दसरा कधी आहे? देशभरात होतो साजरा; पाहा, महाराष्ट्रातील वैशिष्ट्य-मान्यता
12
५ राशींचे शनि आयुष्यभर कल्याण करतो, सुख-सुबत्ता-समृद्धी देतो; पैशांची चणचण नसते, शुभच होते!
13
'मी अशिक्षित असूनही रडकुंडीला आणलं', भुजबळांच्या टीकेवर मनोज जरांगेंचे जोरदार प्रत्युत्तर
14
छत्तीसगडच्या बिजापूरमध्ये २ नक्षलवादी ठार; गेल्या २४ तासांत दुसरी मोठी कारवाई
15
दिल्लीनंतर मुंबई हायकोर्टालाही बॉम्बने उडवून देण्याची धमकी; दोन्ही कोर्टात गोंधळ
16
"सरकारने ओबीसींचा विश्वासघात केला, आतातरी तो अन्यायकारी शासन निर्णय रद्द करा’’, काँग्रेसची मागणी 
17
आता जुनी कार चालवणं होणार महाग, फिटनेस टेस्टच्या नावाखाली खिसे कापायची तयारी
18
"२ वाजल्यानंतर स्फोट होणार"; दिल्ली उच्च न्यायालय उडवून देण्याची धमकी; परिसरात खळबळ
19
सोन्या-चांदीच्या किंमतीत जोरदार तेजी; चांदीत २८०० रुपयांची वाढ, खरेदीपूर्वी जाणून घ्या लेटेस्ट रेट
20
VIRAL : "हा तर आमच्या पाणीपुरीचा अपमान"; सोशल मीडियावरील व्हायरल व्हिडीओ पाहून का संतापले नेटकरी?

कृषी पंपासाठी ५०० कोटी

By admin | Updated: March 9, 2015 01:53 IST

सोमवारपासून सुरू होत असलेले राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय

कमल शर्मा ल्ल नागपूरसोमवारपासून सुरू होत असलेले राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन विदर्भासाठी चांगले दिवस आणू शकते. कमीत कमी विदर्भातील कृषी पंपांचा अनुशेष दूर करण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांमुळे तरी हे संकेत मिळत आहेत. ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यानुसार राज्य सरकार कृषी पंपाचा बॅकलॉग दूर करण्यासाठी ५०० कोटी रुपये वितरित करणार आहे. बॅकलॉग तातडीने संपविण्याचा प्रयत्न सुरू आहे. राज्यात एकूण ९६० कोटी रुपयांचा कृषी पंपाचा अनुशेष आहे. त्यापैकी ६० टक्के अनुशेष एकट्या विदर्भात आहे. विदर्भवादी याला विदर्भावरील अन्याय मानतात. ज्या गतीने हे काम सुरू आहे, ते पाहता अनुशेष संपविण्यासाठी आणखी १०० वर्षे लागतील, असा आरोप सुद्धा केला जात आहे. डॉ. विजय केळकर यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेल्या समितीने कृषी पंपाचा अनुशेष हा विदर्भाच्या मागासलेपणाचे मुख्य कारण असल्याचे मान्य केले आहे. एकीकडे पश्चिम महाराष्ट्रात मागणीपेक्षा अधिक तीन लाख पंप लावण्यात आले आहेत तर दुसरीकडे विदर्भ व मराठवाड्यामध्ये पाच लाख कृषी पंपांचा अनुशेष कायम आहे. राज्याच्या नव्या सरकारने अनुशेषाची समस्या दूर करण्यासाठी पुढाकार घेतला असून त्यासाठी ५०० कोटी रुपये वितरित करण्याचा निर्णय घेतला आहे. ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शनिवारी महावितरण नागपूर परिमंडळातील अधिकाऱ्यांच्या बैठकीला मार्गदर्शन करतांना यासंबंधीचे संकेत दिले आहेत. त्यांनी सांगितले की, आर्थिक वर्ष २०१५-१६ मध्ये कृषी पंपाच्या अनुशेष निर्मूलनासाठी ५०० कोटी रुपये आणि पुढच्या वर्षी ४६० कोटी रुपये दिले जातील. कृषी पंपाची मागणी करणाऱ्या प्रत्येक शेतकऱ्याला कनेक्शन देण्याचे आदेश सुद्धा ऊर्जामंत्र्यांनी दिले. लोकमतशी बोलतांना बावनकुळे यांनी अनुशेष निर्मूलनासाठी शासन कटिबद्ध आहे आणि त्यासाठी निधीची कमतरता पडू देणार नाही, असे स्पष्ट केले. (प्रतिनिधी)विद्युत खांब हटविण्याचा भार आता नागरिकांवर नाही ४प्लॉट किंवा शेतातून विजेचे खांब हटविण्याचा भार आतापर्यंत सामान्य नागरिकांवर पडत होता. परंतु भविष्यात हे काम जिल्हा नियोजन समितीला मिळणाऱ्या विकास निधीतून केला जाईल, असे ऊर्जामंत्री बावनकुळे यांनी स्पष्ट केले आहे. जर निधी कमी पडेल तर महावितरण खर्च उचलेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.