शहरं
Join us  
Trending Stories
1
Amit Shah: इतक्या वर्षांत महाराष्ट्रासाठी, मुंबईसाठी तुम्ही काय केले? अमित शाहांची काँग्रेसवर टीका
2
आजचे राशीभविष्य - २१ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना आज सामाजिक, आर्थिक तसेच कौटुंबिक क्षेत्रात लाभ होतील
3
Nana Patole: निवडणुकीच्या 'या' नियमात मोठा बदल; पटोलेंचा केंद्र अन् निवडणूक आयोगाला थेट सवाल!
4
लोकलमध्ये दोन महिलांत डोकं फुटेपर्यंत हाणामारी; नेमकं कशामुळं पेटलं भांडण? खरं कारण आलं समोर
5
Nagpur: राजधानी एक्सप्रेसवर दगडफेक, प्रवाशांमध्ये दहशत 
6
Elections: आगामी निवडणुका एकत्र की स्वतंत्र? महाआघाडीमध्ये अद्यापही सूर जुळेना!
7
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
8
'गोल्डन बॉय' नीरज चोप्रानं जिंकली पॅरिस डायमंड लीग स्पर्धा; पहिला प्रयत्न ठरला सगळ्यात भारी!
9
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
10
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
11
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
12
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
13
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
14
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
15
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
16
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
17
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
18
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
19
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
20
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा

५ महिन्यात ७२९.१५ कोटी

By admin | Updated: September 2, 2016 02:55 IST

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात राज्याचा विकास झपाट्याने होत असतांना नागपूर जिल्हा आणि शहराचा विकासही तेवढ्याच झपाट्याने होत आहे

पालकमंत्री बावनकुळे : मुख्यमंत्री फडणवीस व गडकरी यांच्यामुळेच केंद्र-राज्याकडून निधी उपलब्धनागपूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात राज्याचा विकास झपाट्याने होत असतांना नागपूर जिल्हा आणि शहराचा विकासही तेवढ्याच झपाट्याने होत आहे. देशाच्या विकासासोबतच जिल्ह्याच्या आणि शहराच्या विकासात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यामुळे या जिल्ह्यात विकास गंगा वाहून विकासाला वेगळी दिशा मिळाली. केंद्र व राज्य शासनाकडून नागपूर जिल्ह्यातील ग्रामीण भागाच्या विकासाठी ७२९.१५ कोटी रुपयांचा निधी गेल्या ५ महिन्यात विविध विकास कामांसाठी या जिल्ह्याला मिळाला असल्याची माहिती पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.मागील १५ वर्षांपेक्षा अधिक काळापासून नागपूर जिल्ह्यात विकास कामांचा मोठा बॅकलॉग होता. या जिल्ह्याच्या विकासाकडे लक्ष देण्यात आले नाही. जिल्ह्यातील विकास कामांसाठी निधी उपलब्ध करुन दिला नाही. त्या तुलनेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जिल्ह्यातील आणि शहरातील विविध विकास कामांसाठी प्रचंड निधीची व्यवस्था करून दिली आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक व जहाजबंधणी मंत्री नितीन गडकरी यांनी रस्त्यांची अनेक कामे नागपूर जिल्ह्यातच नव्हे विदर्भातही रस्त्यांचे जाळे विणले आहे. नागपूरच्या या दोन विकास पुरुषांनी एकत्रपणे मिहानला चालना दिली. एम्स, आयआयआयटी, नॅशनल लॉ स्कूल, आयआयएम, सेंट्रल पॉवर इन्स्टिट्यूट, पतंजली फूड पार्क असे मोठे प्रकल्प आणले आहे. प्रधानमंत्री आवास योजनेला वेग दिला. मेट्रो रेल्वे, मेट्रो रिजन आराखडा या प्रकल्पांना मुख्यमंत्री फडणवीस व नितीन गडकरी यांच्यामुळे वेग मिळाला आहे. शहर आणि जिल्ह्यात प्रचंड विकास कामे सुरू आहेत, याचा लोकांना अनुभव येत आहे.नागपूर शहराची जिल्हा नियोजन समिती ही दोन वर्षात ३५० कोटींची झाली. या समितीला एवढा निधी कधीच मिळाला नाही. केवळ मुख्यमंत्र्यांमुळेच हा निधी उपलब्ध झाला. या निधीशिवाय अन्य योजनांसाठी कोट्यवधींचा निधी या दोन विकास पुरुषांनी नागपूरला उपलब्ध करून दिला आहे.तसेच शहरातील व जिल्ह्यातील सर्व आमदारांच्या सहकार्यामुळे आणि सकारात्मक भूमिकेमुळे जिल्ह्याच्या व शहराच्या विकासाला चालना मिळाली आहे. शहरातील आमदार सुधाकर देशमुख, आ. सुधाकर कोहळे, आ. प्रा. अनिल सोले, आ. कृष्णा खोपडे, आ. विकास कुंभारे, आ. डॉ. मिलिंद माने, आ. गिरीश व्यास, आ. नागो गाणार, जिल्ह्यातील आ. आशिष देशमुख, आ. सुधीर पारवे, आ. समीर मेघे, आ. मल्लिकार्जुन रेड्डी हे सर्व आमदार विकास कामांसाठी निधी खेचून आणून आपल्या मतदार संघात विकास कामे करुन राज्याचा विकासाचा वेग वाढवण्यास मदत करीत आहेत, याकडे पालकमंत्री बावनकुळे यांनी लक्ष वेधले.जिल्ह्याला नुकतेच १४.५० कोटींचे विशेष व वैशिष्ट्यपूर्ण अनुदान मुख्यमंत्री फडणवीस यांनी मंजूर केले. तसेच १२ नगर परिषदा व ५ नगर पंचायतींना १८ कोटी शासनाने मंजूर केले. जिल्ह्यातील या आमदारांच्या सहकार्यानेच हे अनुदान मंजूर होऊ शकले, असेही पालकमंत्री बावनकुळे म्हणाले. (प्रतिनिधी)