शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
4
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
5
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
6
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
7
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
8
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
9
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
10
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
11
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
12
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
13
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
14
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
15
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
16
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
17
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
18
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
19
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

वन्यजीव संघर्षात १० वर्षात ४६६ व्यक्तींचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2020 12:12 IST

wildlife Tiger Nagpur News मागील १० वर्षात राज्यात ४६६ व्यक्तींना जीव गमवावे लागले. तर वाघ, बिबट आणि अस्वल या ४५ प्राण्यांनाही या काळात जीव गमवावे लागले आहेत.

ठळक मुद्देसर्वाधिक मृत्यू चालू वर्षातवाघ-बिबटांची दहशत अधिक

गोपालकृष्ण मांडवकर ।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ‘वाघ वाचवा-जंंगल वाचवा’ अशी साद वनविभागाकडून घातली जात असली तरी मानव-वन्य जीव संघर्षावर अद्यापही ठोस उत्तर सापडलेले नाही. सहजीवनाचा स्वीकार करण्याचे आवाहन वनविभागाकडून केले जात आहे. त्याला काहीअंशी यश आले असले तरी हा संघर्ष थांबलेला नाही. परिणामत: मागील १० वर्षात राज्यात ४६६ व्यक्तींना जीव गमवावे लागले. तर वाघ, बिबट आणि अस्वल या ४५ प्राण्यांनाही या काळात जीव गमवावे लागले आहेत.

मागील १० वर्षात राज्यात वाघांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. या सोबतच बिबट आणि अन्य प्राण्यांचीही संख्या वाढली आहे. वनविभागाच्या आकडेवारीनुसार राज्यात ३१२ वाघ असल्याची नोंद आहे. या १० वर्षाच्या काळात वाघ आणि बिबटांकडून मारल्या गेलेल्या व्यक्तींची संख्या अधिक आहे. वाघांकडून १५३ तर बिबटांकडून १२८ व्यक्तींचा मृत्यू झाला. त्या पाठोपाठ रानडुकरांमुळे मृत्युमुखी पडलेल्यांचा क्रमांक तिसरा असून ही संख्या ८९ आहे. आहे. त्यामुळे वाघ बिबटांची अधिक दहशत आहे.

१० वर्षात १६ वाघांचा विजेमुळे मृत्यूविजेचा सापळा लावून वाघ आणि बिबटांची हत्या केल्याची प्रकरणे राज्यात अधिक आहेत.मागील जानेवारी-२०१० ते सप्टेंबर-२०२० या १० वर्षात १६ वाघ, १८ बिबट आणि ११ अस्वलांचा मृत्यू यामुळे झाला आहे. अर्थात जंगलात शिकारी टोळ्यांकडून आणि शेतकऱ्याननी पिकाच्या रक्षणासाठी लावलेल्या सापळ्यांमुळे या घटना घडल्या आहेत. या सोबत, विषप्रयोगाच्याही घटना वेगळ्या आहेत.

सर्वाधिक मृत्यू चालू वर्षातवन्यजीव संघर्षातील माणसांचे सर्वाधिक मृत्यू चालू वर्षातील आहेत. सप्टेंबर-२०२० अखेरपर्यंत ही संख्या ५६ वर पोहचली आहे. २०१६ मध्ये हाच आकडा होता. या तुलनेत मागील वर्षात २०१९ मध्ये फक्त ३९ व्यक्तींच्या मृत्यूंची नोंद आहे. २०१७ मध्ये ही संख्या ५४ होती.

टॅग्स :Tigerवाघ