शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
9
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
10
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
11
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
12
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
13
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
14
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
15
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
16
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
17
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
18
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
19
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
20
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार

जिल्हा परिषदेचा ४५ कोटींचा निधी परत जाणार

By गणेश हुड | Updated: May 31, 2024 19:00 IST

Nagpur : शासनाच्या स्थगितीचा विकास कामांना फटका

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राज्य शासनाच्या वित्त विभागाने अखर्चित निधी ३१ मे पर्यंत शासन जमा करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे जिल्हा नियोजन समितीमार्फत (डीपीसी) जिल्हा परिषदेला मिळालेला जवळपास ४५ कोटींचा  अखर्चित निधी परत जाणार आहे. वर्ष २०२१-२२ मधील हा निधी आहे. राज्यातील सत्तातरानंतर विकास कामांना स्थगिती देण्यात आली होती. परिणामी हा निधी अखर्चित राहीला आहे. 

राज्यात सत्तातरानंतर महायुतीचे सरकार अस्तित्वात आले.  सत्ताबदल होताच जिल्हा परिषदेच्या विकास कामांना  स्थगिती देण्यात आली होती. त्यामुळे मोठ्या प्रमाणात विकासकामांवर परिणाम झाला होता. जवळपास वर्षभरानंतर ही स्थगिती उठविण्यात आली.  त्यानंतर २८ फेब्रुवारी २०२४ पर्यंत हा निधी खर्च करण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यावेळी जवळपास १०० कोटींचा निधी अखर्चित होता. कालावधी कमी असल्याने प्रशासकीय व तांत्रिक मंजुरी, निविदा प्रक्रीया याला वेळ लागत असल्याने उपलब्ध निधीपैकी ४० कोटींचा निधी कालावधीत खर्च करता आला नाही. 

अखर्चित निधी खर्च करण्यास परवानगी देण्याचा प्रस्ताव जिल्हा परिषदेकडून शासनाला पाठविण्यात आला. परंतु त्याला शासनाकडून परवानगी मिळाली नाही. हा ४५ कोटींचा अखर्चित निधी आता हा अखर्चित निधी ३१ मे पर्यंत शासनाकडे परत पाठविण्याचे आदेश वित्त विभागाने दिल्याची माहिती सूत्रांनी दिली.  एका विशिष्ट नमुन्यात अखर्चित निधीची माहिती पाठविण्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे हा सर्व निधी शासनाकडे परत पाठवावा लागणार आहे. त्याचप्रमाणे वर्ष २०२२-२३ मधीलही अखर्चित निधी परत पाठवावा लागणार असल्याची माहिती आहे.

१४४ कोटी जादाचे मंजूर पण खर्च होणार का? जिल्हा नियोजन समितीने २०२४-२५ या वर्षात १४४ कोटींचा जादाचा निधी मंजूर केला आहे. परंतु नियोजन समितीकडून उशिरा प्राप्त होणारे नियोजन, विकास कामांना देण्यात येणारी स्थगिती यामुळे निधी खर्च होत नाही. त्यामुळे जादाचा निधी मिळूनही उपयोग काय असा प्रश्न निर्माण झाला आहे.

टॅग्स :nagpurनागपूर