शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र मराठी माणसाच्या बापाचाच! इथे कुणी वेडंवाकडं वागायचा प्रयत्न केला तर...- राज ठाकरे
2
"आता दुकाने नाही शाळाच बंद करेन"; त्रिभाषा सूत्रावरुन राज ठाकरेंनी सरकारला दिला इशारा
3
वैभव सूर्यवंशीच्या 'त्या' कृत्यामुळे मोठा गोंधळ; विराट कोहलीचे चाहते प्रचंड संतापले, कारण...
4
"जो भारताचा नागरिक नाही...", बंगालमधील दुर्गापूरमध्ये पंतप्रधान मोदींची सभा; घुसखोरांना इशारा दिला
5
भाजपा आमदाराच्या काकांना पालिका कर्मचाऱ्यांकडून लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण, कारण काय?  
6
करुण नायरला दोन्ही टेस्टमध्ये संधी मिळेल! फ्लॉप शोनंतरही कोचला त्याच्यावर 'भरवसा'
7
"विधिमंडळात हे माझे ३६वे वर्ष, पण एवढ्या वर्षात..."; जयंत पाटील यांना नेमकी कसली खंत?
8
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
9
नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, चकमकीत ६ नक्षलवादी ठार
10
IND vs ENG ...तर रिषभ पंतला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवू नका! शास्त्रींनी दिला गिल-गंभीर जोडीला सल्ला
11
ITI प्रवेशासाठी 'अनुसूचित जाती' व 'अल्पसंख्याक'चा दुहेरी लाभ घेणाऱ्यांवर होणार कारवाई
12
Dukes Ball Controversy : विषय हार्ड! चेंडूच्या क्वॉलिटी संदर्भातील मुद्द्यावर कंपनी घेणार रिव्ह्यू
13
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
14
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
15
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
16
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
17
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं
18
गोपिचंद पडळकर यांच्या मागणीला मोठं यश, रायगडाजवळील निजामपूर ग्रामपंचायतीचं नाव बदललं
19
"इन्स्टावर ४ लाख फॉलोअर्स पण गावात ४ लोकांनाही..."; गावकऱ्यांनी केली 'त्या' दोघींची पोलखोल
20
'मै हूँ ना'मध्ये होती 'ही' मराठी अभिनेत्री, तिचं नृत्य पाहून शाहरुख खानही झालेला अवाक

पाच वर्षांत ४४ वाघांचा मृत्यू

By admin | Updated: July 22, 2014 00:53 IST

देशभरात ‘वाघ वाचवा’ मोहीम राबविली जात असताना महाराष्ट्रात गत पाच वर्षांत ४४ वाघ व ३०४ बिबट्यांचा मृत्यू झाल्याची माहिती पुढे आली आहे.

१० वाघांच्या शिकारी : वन विभागाला धक्का नागपूर : देशभरात ‘वाघ वाचवा’ मोहीम राबविली जात असताना महाराष्ट्रात गत पाच वर्षांत ४४ वाघ व ३०४ बिबट्यांचा मृत्यू झाल्याची माहिती पुढे आली आहे. उपलब्ध आकडेवारीनुसार गत २००९ ते मार्च २०१४ पर्यंत २५ वाघांचा नैसर्गिक मृत्यू झाला आहे. शिवाय ९ वाघांचा अपघाती मृत्यू झाला असून, १० वाघांना शिकाऱ्यांनी ठार केले आहे. गतवर्षी बहेलिया शिकारी टोळ्यांनी विदर्भातील अनेक वाघांना टार्गेट करून त्यांची शिकार केल्याची माहिती पुढे आली होती. यानंतर वन विभागाने वर्षभर आरोपींचा पाठलाग करून, गत ७ जून २०१४ पर्यंत ४० ते ४५ संशयितांना ताब्यात घेतले होते. मात्र यानंतरही शिकाऱ्यांनी किती वाघ ठार केले, याची वन विभागाला माहिती मिळू शकली नाही. त्यामुळे शेवटी राज्य सरकारने हस्तक्षेप करून, संपूर्ण शिकारी प्रकरण सीबीआयच्या हाती सोपविण्याचा निर्णय घेतला. विशेष म्हणजे, गत पाच वर्षांत वाघांसोबतच शेकडो बिबट्यांचाही मृत्यू झाला आहे. यात २००९ ते मार्च २०१४ पर्यंत १३९ बिबट्यांचा नैसर्गिक व ९७ बिबट्यांचा अपघाती मृत्यू झाला आहे, तसेच ६८ बिबट शिकाऱ्यांनी ठार केले आहेत. वन विभागाने वाघ व बिबट्यांच्या मृत्यूची ही संख्या लक्षात घेता, व्याघ्र प्रकल्पात स्पेशल टायगर प्रोटेक्शन फोर्स (एसटीपीएफ) तैनात केली आहे. जाणकारांच्या मते, व्याघ्र प्रकल्पासोबतच प्रादेशिक वन क्षेत्रातही अनेक वाघांचा अधिवास आहे. परंतु मनुष्यबळाच्या अभावामुळे त्यांची सुरक्षा व संवर्धनाचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.(प्रतिनिधी)