शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
3
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
4
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
5
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
6
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
7
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
8
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
9
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
10
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
11
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
12
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
13
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
14
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
15
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
16
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
17
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
18
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
19
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
20
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!

लोक न्यायालयांनी अपघातपीडितांना मिळवून दिली ४३८ कोटीची भरपाई

By राकेश पांडुरंग घानोडे | Updated: May 20, 2024 15:30 IST

Nagpur : एप्रिल-२०२३ ते फेब्रुवारी-२०२४ पर्यंतची आकडेवारी

नागपूर : प्रभावी पर्यायी न्यायदान व्यवस्था म्हणून ओळख निर्माण केलेल्या लोक न्यायालय उपक्रमामुळे एप्रिल-२०२३ ते फेब्रुवारी-२०२४ या कालावधीमध्ये राज्यातील ७ हजार १२७ मोटार अपघात पीडितांना तब्बल ४३८ कोटी ४९ लाख रुपयांची भरपाई मिळाली.

विविध प्रकारचे तडजोडयोग्य खटले आपसी सहमतीने निकाली काढण्यासाठी दरवर्षी वेळोवेळी लोक न्यायालय उपक्रम राबविला जातो. लोक न्यायालयामध्ये तीन सदस्यांच्या पॅनलपुढे खटल्यावर सुनावणी होते. दरम्यान, खटल्यातील पक्षकारांमध्ये तडजोड घडवून आणण्याचा प्रयत्न केला जातो. या व्यवस्थेत सहमतीने वाद संपत असल्यामुळे पक्षकारांमध्ये नाराजीची भावना तयार होत नाही. याशिवाय, ही व्यवस्था पक्षकारांचा वेळ, पैसा व परिश्रमाचीही बचत करते. लोक न्यायालयामध्ये निकाली निघालेल्या मोटार अपघात दाव्यांची गेल्या पाच वर्षांतील आकडेवारी पाहिल्यास, २०१८-१९ साली ७ हजार ६१४ पीडितांना २९७ कोटी ९७ हजार ३२ हजार, २०१९-२० साली ४ हजार ७९८ पीडितांना ३३४ कोटी ६७ लाख ८३ हजार, २०२०-२१ साली २ हजार १५५ पीडितांना १११ कोटी २४ लाख ५० हजार, २०२१-२२ साली ८ हजार ११४ पीडितांना ५८५ कोटी २२ लाख ५९ हजार तर, २०२२-२३ साली ६ हजार ३०८ पीडितांना ६३० कोटी ८८ लाख ४२ हजार रुपयाची भरपाई मिळाली.

काय आहे लोक न्यायालय

आधी समाजातील आदरणीय व नि:पक्षपाती व्यक्ती एकत्र येऊन कोणताही वाद समजुतीने मिटवित होते. त्या व्यवस्थेला गाव पंचायत म्हटले जात होते. सध्याचे लोक न्यायालय याच व्यवस्थेचे आधुनिक रुप आहे. या व्यवस्थेत कायदेतज्ज्ञांचे न्यायमंडळ खटल्याशी संबंधित पक्षकारांमध्ये तडजोड घडवून वाद संपवतात.

टॅग्स :Courtन्यायालयnagpurनागपूर