शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
6
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
7
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
8
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
9
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
10
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
11
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
12
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
13
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
14
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
15
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
16
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
17
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
18
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
19
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
20
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली

बोंडअळीग्रस्त शेतकऱ्यांना ४३४.११ कोटी रुपयांची मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 5, 2018 23:24 IST

खरीप हंगामातील कापूस पिकांवर बोंडअळी व धानपिकावरील तुडतुडा किडीच्या प्रादुर्भावामुळे झालेल्या नुकसानीसंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांना मदत जाहीर केली होती. त्यानुसार नागपूर विभागातील ४ लाख ९९ हजार ७१५ बाधित शेतकऱ्यांना ४३४ कोटी ११ लक्ष ८५ हजार रुपयांच्या मदतीचे वाटप पूर्ण झाले आहे.

ठळक मुद्दे४ लाख ९९ हजार ७१५ बाधित शेतकऱ्यांचा समावेश

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : खरीप हंगामातील कापूस पिकांवर बोंडअळी व धानपिकावरील तुडतुडा किडीच्या प्रादुर्भावामुळे झालेल्या नुकसानीसंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांना मदत जाहीर केली होती. त्यानुसार नागपूर विभागातील ४ लाख ९९ हजार ७१५ बाधित शेतकऱ्यांना ४३४ कोटी ११ लक्ष ८५ हजार रुपयांच्या मदतीचे वाटप पूर्ण झाले आहे.खरीप हंंगाम २०१७ मध्ये कापूस पिकावर बोंडअळीचा प्रादुर्भाव आढळून आल्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पादनावर त्याचा विपरीत परिणाम झाला होता. तसेच पूर्व विदर्भातील धान उत्पादक क्षेत्रात तुडतुडा किडीच्या प्रादुर्भावामुळे सुद्धा शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते. शेतकऱ्यांना झालेल्या नुकसानीसंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मदत जाहीर केली होती. त्यानुसार शासनाकडून तीन हप्त्यात मदत प्राप्त झाली होती. ती महसूल विभागातर्फे शेतकऱ्यांना जिल्हानिहाय वाटप करण्यात येऊन प्रत्यक्ष वितरित करण्यात आली. तसेच तिसऱ्या टप्प्यातील मदतीचे वाटपसुद्धा सुरू आहे.कापूस पिकावरील बोंडअळी व धानपिकावर झालेल्या तुडतुडा किडीच्या नुकसानीसंदर्भात झालेल्या नुकसानीच्या सर्वेक्षणानुसार जिल्हानिहाय शासनाकडे ५३७ कोटी ६६ लाख २० हजार रुपयांची मागणी करण्यात आली होती. त्यानुसार संपूर्ण निधी प्राप्त झाला आहे आणि त्यानुसार मदतीचे वाटप अंतिम टप्प्यात असून आतापर्यंत ८० टक्क्यांपेक्षा जास्त शेतकऱ्यांना मदतीचे वाटप पूर्ण झाले आहे.शेतकऱ्यांना झालेल्या नुकसानीपोटी मदतीसाठी नागपूर जिल्ह्यातील ८५ हजार २६० शेतकऱ्यांना ४६ कोटी ८३ लक्ष रुपयांचे वाटप पूर्ण झाले आहे. वर्धा जिल्ह्यातील १ लाख ४४ हजार १४९ शेतकऱ्यांना १०२ कोटी ५२ लाख रुपयांचे वाटप पूर्ण झाले आहे. गोंदिया जिल्ह्यातील १ लाख ४२४ शेतकऱ्यांना ३७ कोटी २७ लक्ष ७६ हजार, चंद्रपूर जिल्ह्यातील ८६ हजार ३६५ शेतकऱ्यांना १४९ कोटी ९७ लक्ष ७८ हजार, भंडारा जिल्ह्यातील ६३ हजार ५४७ शेतकरी सभासदांना ६५ कोटी ४३ लक्ष ९५ हजार तर गडचिरोली जिल्ह्यातील १९ हजार ९७० शेतकरी सभासदांना ३२ कोटी ७ लक्ष रुपयांचे वाटप पूर्ण झाले आहे.

टॅग्स :Farmerशेतकरीcottonकापूस