शहरं
Join us  
Trending Stories
1
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
2
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
3
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं
4
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, बॉर्डरवर रांगा...
5
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
6
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली
7
सोलापूर डॉक्टर आत्महत्या: कॉल रेकार्डमधील माहितीमध्ये नवा पुरावा आढळणार?
8
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
9
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
10
पती झाला हैवान! बहिणीच्या लग्नासाठी भावाने घर विकलं, हुंड्यासाठी सासरच्यांनी तिलाच मारलं
11
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
12
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
13
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
14
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
15
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
16
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
17
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
18
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
19
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
20
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर

नागपुरात पाच वर्षात आगीसह दुर्घटनात ४२८ जणांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2018 21:23 IST

अग्निशमन विभागाला मागील पाच वर्षात तीन हजारांवर इमरजन्सी कॉल्स प्राप्त झाले. यात शहरात आगी, विहीर व तलावातील दुर्घटनांचा समावेश असून ४२८ लोकांचे बळी गेले. मृतात १०४ महिला ३२४ पुरुषांचा समावेश आहे.

ठळक मुद्देवर्षभरात आगीमुळे ४१.२४ कोटींचे नुकसान : १४६.९४ कोटींची मालमत्ता वाचविली

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : अग्निशमन विभागाला मागील पाच वर्षात तीन हजारांवर इमरजन्सी कॉल्स प्राप्त झाले. यात शहरात आगी, विहीर व तलावातील दुर्घटनांचा समावेश असून ४२८ लोकांचे बळी गेले. मृतात १०४ महिला ३२४ पुरुषांचा समावेश आहे.गेल्या वर्षभरात नागपूर शहरात लहानमोठ्या १३६० तर शहराबाहेर ४४ आगीच्या घटना घडल्या. शहरातील आगीच्या घटनात १८ कोटी ५७ लाख ३५ हजारांचे नुकसान झाले. तर ग्रामीण भागातील आगीच्या घटनात २२ कोटी ६७ लाख २१ हजार १५० रुपयांचे नुकसान झाले. अग्निशमन विभागाच्या जवानांना शहर व ग्र्रामीण भागात आगीपासून १४६ कोटी ९४ लाखांची मालमत्ता आगीपासून वाचविण्यात यश आल्याची माहिती अग्निशमन विभागाचे प्रमुख राजेंद्र उचके यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली.१४ एप्रिलला अग्निशमन सेवा दिवसाला देशभरात अग्निशमन विभागातील शहिदांना श्रद्धांजली अर्पण केली जाते. यानिमित्ताने महापालिका मुख्यालयात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. तसेच १४ ते २० एप्रिल या कालावधीत अग्निशमन सप्ताह पाळला जाणार आहे. असल्याची माहिती उचके यांनी दिली.३१७३ दूषित विहिरींचा उपसाअग्निशमन विभागाच्या जवानांना गेल्या वर्षभरात शहरातील ३१७३ दूषित पाणी असलेल्या विहिरींचा उपसा केला. यात महापालिकेला प्राप्त झालेल्या अर्जानुसार २९७७ तर शुल्क आकारून १९६ विहिरीतील पाण्याचा उपसा करून नागरिकांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली.जीएसटी व नोटाबंदीचा फटकानोटाबंदी व जीएसटीमुळे अग्निशमन विभागाच्या उत्पन्नावर परिणाम झाला. ४ ते ५ कोटींचे उत्पन्न गेल्या वर्षात १.७४ कोटींवर आले आहे. इमारतीसाठी नाहरकत प्रमाणपत्र, खासगी विहिरींची सफाई, पाणीपुरवठा अशा माध्यमातून विभागाला उत्पन्न प्राप्त होते.आठ स्टेशन अन् १५६ कर्मचारीमहापालिकेच्या अग्निशमन विभागाच्या मुख्यालयासह आठ स्टेशन कार्यरत आहेत. परंतु विभागात विविध पदावर १५६ कर्मचारी कार्यरत आहेत. कर्मचाऱ्यांची पदे मोठ्या प्रमाणात रिक्त असल्याने विभागाच्या कामकाजावर परिणाम झाला आहे. विभागात २१ फायर टेंडर, २ वॉटर टेंडर, ४२ मीटर उंच टर्न टेबल लॅडर, हायड्रोलिक प्लॅटफॉर्म, फोम टेंडर, इमरजन्सी टेंडर, यासह विविध वाहनांचा ताफा विभागाकडे आहे. मात्र मनुष्यबळाची कमतरता असल्याने विभागाला अडचणींचा सामना करावा लागतो.जनजागृती व मॉक ड्रीलप्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन कक्षातर्फे अग्निसुरक्षा अभियानांतर्गत १ एप्रिल २०१७ ते ३१ मार्च २०१८ या कालावधीत ८१ उपक्रम राबविण्यात आले. यात शाळा, महाविद्यालय, रुग्णालय इमारती, शासकीय व निमशासकीय इमारती आदी ठिकाणी जनजागृती व मॉक ड्रील करण्यात आली. प्रशिक्षणात २१ हजार ११२ नागरिक व विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.पाच वर्षांत ४,५९८ घटनागेल्या पाच वर्षांत शहर व ग्रामीण भागात ४,५९८ आगीच्या घटना घडल्या. यात २०१३-१४ या वर्षात ७१४, २०१४-१५ या वर्षात ८३४, २०१५-१६ या वर्षात ९२२, २०१६-१७ या वर्षात ११२४ तर २०१७-१८ या वर्षात १३६० आगीच्या घटना घडल्याची माहिती राजेंद्र उचके यांनी दिली.

टॅग्स :fireआगNagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिका