शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
9
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
10
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
11
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
12
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
13
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
14
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
15
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
16
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
17
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
18
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
19
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
20
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार

२०५० पर्यंत भारतातील ४० कोटी महिलांना ‘ॲनिमिया’! - डॉ. श्रीनाथ रेड्डी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2022 13:38 IST

‘अकादमी ऑफ मेडिकल सायन्सेस’ (एएमएस) व ‘डायबेटिक असोसिएशन ऑफ इंडिया’ (डीएआय) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यशाळेत ते बोलत होते.

ठळक मुद्देहवामान बदलाचा आरोग्यावर कोविडपेक्षाही वाईट परिणाम

नागपूर : हवामानातील बदल म्हणजे केवळ हिमनदी वितळणे आणि समुद्राची पातळी वाढणे एवढेच नाही, तर सार्वजनिक आरोग्यावर त्याचा प्रचंड वाईट परिणाम होतो. २०५० पर्यंत भारतातील सुमारे ४० कोटी महिला व १० कोटी मुलांना शरीरात हिमोग्लोबिनचा कमतरतेमुळे ‘ॲनिमिया’ होण्याचा धोका राहील. कोविडपेक्षाही वाईट परिणाम होतील, असे धक्कादायक वक्तव्य पद्मभूषण व ‘पब्लिक हेल्थ फाऊंडेशन’चे अध्यक्ष डॉ. के. श्रीनाथ रेड्डी यांनी येथे केले.

‘अकादमी ऑफ मेडिकल सायन्सेस’ (एएमएस) व ‘डायबेटिक असोसिएशन ऑफ इंडिया’ (डीएआय) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यशाळेत ते बोलत होते. मंचावर डॉ. शरद पेंडसे, डॉ. जय देशमुख, ‘एएमएस’चे अध्यक्ष डॉ. रवींद्र सरनाईक, डॉ. राजू खंडेलवाल, ‘डीएआय’चे अध्यक्ष डॉ. प्राजक्ता देशमुख, डॉ. नैनेश पटेल, डॉ. प्रशांत जोशी व डॉ. पीयूष खेरडे उपस्थित होते.

हवामान बदलाच्या परिणामांबाबत जागरूक होणे गरजेचे

डॉ. रेड्डी म्हणाले, हवामान बदलाच्या वास्तविक परिणामांबद्दल प्रत्येकाने जागरूक होणे गरजेचे आहे. डॉक्टरांनी यासाठी पुढाकार घ्यायला हवा. दुष्परिणाम इतक्या सहजासहजी थांबवणे शक्य नाही. झाडे लावणे आणि पाण्याची बचत करणे पुरेसे नाही. बदलता काळ कसा अंगीकारायचा हे देखील शिकले पाहिजे.

नागपूरसह दोन शहरांसाठी ‘हीट ॲक्शन प्लॅन’

पब्लिक हेल्थ फाउंडेशन ऑफ इंडिया’ने (पीएचएफआय) नागपूरसह अहमदाबाद, भुवनेश्वरसारख्या शहरांसाठी ‘हीट ॲक्शन प्लॅन’ तयार केला आहे. या योजनेचे स्थानिक प्रशासनाकडून योग्य पालन होणे गरजेचे आहे. विशेषत: उष्णतेपासून बचाव करण्यासाठी निवारे, पाण्याच्या सोयी उभ्या करायला हव्यात. ड्युटी तासही बदलायला हवे. शिवाय खासगी वाहने कमी करण्यासाठी सार्वजनिक वाहतूक मजबूत करणे, अधिकाधिक झाडे लावणे आदी उपायांची गरज असल्याचे डॉ. रेड्डी म्हणाले.

आता कोरोनाची प्राणघातक लाट नसणार

एका प्रश्नाच्या उत्तरात डॉ. रेड्डी म्हणाले, कोरोना प्रतिबंधक लसीकरण व वाढलेल्या रोग प्रतिकारशक्तीमुळे नजीकच्या काळात कोरोनाची चौथी लाट येईल, पण ती प्राणघातक नसणार. कोरोनामुळे भारतात झालेल्या मृत्यूची संख्या उपलब्ध माहितीपेक्षा अधिक असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने जाहीर केले आहे; परंतु भारतातील २०२१ मधील कोरोना मृत्यूची अद्ययावत माहिती पुढे आलेली नाही. आली तरी त्यात फारसा फरक असेल असे वाटत नाही.

टॅग्स :Healthआरोग्यAnemiaअ‍ॅनिमियाdoctorडॉक्टर