शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

२०५० पर्यंत भारतातील ४० कोटी महिलांना ‘ॲनिमिया’! - डॉ. श्रीनाथ रेड्डी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2022 13:38 IST

‘अकादमी ऑफ मेडिकल सायन्सेस’ (एएमएस) व ‘डायबेटिक असोसिएशन ऑफ इंडिया’ (डीएआय) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यशाळेत ते बोलत होते.

ठळक मुद्देहवामान बदलाचा आरोग्यावर कोविडपेक्षाही वाईट परिणाम

नागपूर : हवामानातील बदल म्हणजे केवळ हिमनदी वितळणे आणि समुद्राची पातळी वाढणे एवढेच नाही, तर सार्वजनिक आरोग्यावर त्याचा प्रचंड वाईट परिणाम होतो. २०५० पर्यंत भारतातील सुमारे ४० कोटी महिला व १० कोटी मुलांना शरीरात हिमोग्लोबिनचा कमतरतेमुळे ‘ॲनिमिया’ होण्याचा धोका राहील. कोविडपेक्षाही वाईट परिणाम होतील, असे धक्कादायक वक्तव्य पद्मभूषण व ‘पब्लिक हेल्थ फाऊंडेशन’चे अध्यक्ष डॉ. के. श्रीनाथ रेड्डी यांनी येथे केले.

‘अकादमी ऑफ मेडिकल सायन्सेस’ (एएमएस) व ‘डायबेटिक असोसिएशन ऑफ इंडिया’ (डीएआय) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यशाळेत ते बोलत होते. मंचावर डॉ. शरद पेंडसे, डॉ. जय देशमुख, ‘एएमएस’चे अध्यक्ष डॉ. रवींद्र सरनाईक, डॉ. राजू खंडेलवाल, ‘डीएआय’चे अध्यक्ष डॉ. प्राजक्ता देशमुख, डॉ. नैनेश पटेल, डॉ. प्रशांत जोशी व डॉ. पीयूष खेरडे उपस्थित होते.

हवामान बदलाच्या परिणामांबाबत जागरूक होणे गरजेचे

डॉ. रेड्डी म्हणाले, हवामान बदलाच्या वास्तविक परिणामांबद्दल प्रत्येकाने जागरूक होणे गरजेचे आहे. डॉक्टरांनी यासाठी पुढाकार घ्यायला हवा. दुष्परिणाम इतक्या सहजासहजी थांबवणे शक्य नाही. झाडे लावणे आणि पाण्याची बचत करणे पुरेसे नाही. बदलता काळ कसा अंगीकारायचा हे देखील शिकले पाहिजे.

नागपूरसह दोन शहरांसाठी ‘हीट ॲक्शन प्लॅन’

पब्लिक हेल्थ फाउंडेशन ऑफ इंडिया’ने (पीएचएफआय) नागपूरसह अहमदाबाद, भुवनेश्वरसारख्या शहरांसाठी ‘हीट ॲक्शन प्लॅन’ तयार केला आहे. या योजनेचे स्थानिक प्रशासनाकडून योग्य पालन होणे गरजेचे आहे. विशेषत: उष्णतेपासून बचाव करण्यासाठी निवारे, पाण्याच्या सोयी उभ्या करायला हव्यात. ड्युटी तासही बदलायला हवे. शिवाय खासगी वाहने कमी करण्यासाठी सार्वजनिक वाहतूक मजबूत करणे, अधिकाधिक झाडे लावणे आदी उपायांची गरज असल्याचे डॉ. रेड्डी म्हणाले.

आता कोरोनाची प्राणघातक लाट नसणार

एका प्रश्नाच्या उत्तरात डॉ. रेड्डी म्हणाले, कोरोना प्रतिबंधक लसीकरण व वाढलेल्या रोग प्रतिकारशक्तीमुळे नजीकच्या काळात कोरोनाची चौथी लाट येईल, पण ती प्राणघातक नसणार. कोरोनामुळे भारतात झालेल्या मृत्यूची संख्या उपलब्ध माहितीपेक्षा अधिक असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने जाहीर केले आहे; परंतु भारतातील २०२१ मधील कोरोना मृत्यूची अद्ययावत माहिती पुढे आलेली नाही. आली तरी त्यात फारसा फरक असेल असे वाटत नाही.

टॅग्स :Healthआरोग्यAnemiaअ‍ॅनिमियाdoctorडॉक्टर