शहरं
Join us  
Trending Stories
1
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
2
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
3
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
4
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
5
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
6
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
7
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
8
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
9
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
10
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
11
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
12
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
13
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
14
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
15
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
16
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
17
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले
18
भारतीय संघात निवड होताच वैभव सूर्यवंशीचा रणजी सामन्यात धमाका! पण विक्रमी शतक थोडक्यात हुकलं
19
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
20
लठ्ठ लोकांसाठी आनंदाची बातमी! हृदयरोगाचा धोका कमी, समोर आला हैराण करणारा स्टडी रिपोर्ट

२०५० पर्यंत भारतातील ४० कोटी महिलांना ‘ॲनिमिया’! - डॉ. श्रीनाथ रेड्डी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2022 13:38 IST

‘अकादमी ऑफ मेडिकल सायन्सेस’ (एएमएस) व ‘डायबेटिक असोसिएशन ऑफ इंडिया’ (डीएआय) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यशाळेत ते बोलत होते.

ठळक मुद्देहवामान बदलाचा आरोग्यावर कोविडपेक्षाही वाईट परिणाम

नागपूर : हवामानातील बदल म्हणजे केवळ हिमनदी वितळणे आणि समुद्राची पातळी वाढणे एवढेच नाही, तर सार्वजनिक आरोग्यावर त्याचा प्रचंड वाईट परिणाम होतो. २०५० पर्यंत भारतातील सुमारे ४० कोटी महिला व १० कोटी मुलांना शरीरात हिमोग्लोबिनचा कमतरतेमुळे ‘ॲनिमिया’ होण्याचा धोका राहील. कोविडपेक्षाही वाईट परिणाम होतील, असे धक्कादायक वक्तव्य पद्मभूषण व ‘पब्लिक हेल्थ फाऊंडेशन’चे अध्यक्ष डॉ. के. श्रीनाथ रेड्डी यांनी येथे केले.

‘अकादमी ऑफ मेडिकल सायन्सेस’ (एएमएस) व ‘डायबेटिक असोसिएशन ऑफ इंडिया’ (डीएआय) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यशाळेत ते बोलत होते. मंचावर डॉ. शरद पेंडसे, डॉ. जय देशमुख, ‘एएमएस’चे अध्यक्ष डॉ. रवींद्र सरनाईक, डॉ. राजू खंडेलवाल, ‘डीएआय’चे अध्यक्ष डॉ. प्राजक्ता देशमुख, डॉ. नैनेश पटेल, डॉ. प्रशांत जोशी व डॉ. पीयूष खेरडे उपस्थित होते.

हवामान बदलाच्या परिणामांबाबत जागरूक होणे गरजेचे

डॉ. रेड्डी म्हणाले, हवामान बदलाच्या वास्तविक परिणामांबद्दल प्रत्येकाने जागरूक होणे गरजेचे आहे. डॉक्टरांनी यासाठी पुढाकार घ्यायला हवा. दुष्परिणाम इतक्या सहजासहजी थांबवणे शक्य नाही. झाडे लावणे आणि पाण्याची बचत करणे पुरेसे नाही. बदलता काळ कसा अंगीकारायचा हे देखील शिकले पाहिजे.

नागपूरसह दोन शहरांसाठी ‘हीट ॲक्शन प्लॅन’

पब्लिक हेल्थ फाउंडेशन ऑफ इंडिया’ने (पीएचएफआय) नागपूरसह अहमदाबाद, भुवनेश्वरसारख्या शहरांसाठी ‘हीट ॲक्शन प्लॅन’ तयार केला आहे. या योजनेचे स्थानिक प्रशासनाकडून योग्य पालन होणे गरजेचे आहे. विशेषत: उष्णतेपासून बचाव करण्यासाठी निवारे, पाण्याच्या सोयी उभ्या करायला हव्यात. ड्युटी तासही बदलायला हवे. शिवाय खासगी वाहने कमी करण्यासाठी सार्वजनिक वाहतूक मजबूत करणे, अधिकाधिक झाडे लावणे आदी उपायांची गरज असल्याचे डॉ. रेड्डी म्हणाले.

आता कोरोनाची प्राणघातक लाट नसणार

एका प्रश्नाच्या उत्तरात डॉ. रेड्डी म्हणाले, कोरोना प्रतिबंधक लसीकरण व वाढलेल्या रोग प्रतिकारशक्तीमुळे नजीकच्या काळात कोरोनाची चौथी लाट येईल, पण ती प्राणघातक नसणार. कोरोनामुळे भारतात झालेल्या मृत्यूची संख्या उपलब्ध माहितीपेक्षा अधिक असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने जाहीर केले आहे; परंतु भारतातील २०२१ मधील कोरोना मृत्यूची अद्ययावत माहिती पुढे आलेली नाही. आली तरी त्यात फारसा फरक असेल असे वाटत नाही.

टॅग्स :Healthआरोग्यAnemiaअ‍ॅनिमियाdoctorडॉक्टर