शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
5
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
6
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
7
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
8
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
9
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
10
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
11
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
12
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
13
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
14
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
15
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
16
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
17
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
18
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
19
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
20
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!

आयसीयूतील ४० टक्के मृत्यू ‘सेप्सिस’मुळे; अँटिबायोटिक्सचा वापर वैद्यकीय सल्ल्यानेच करावा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2022 21:21 IST

Nagpur News अतिदक्षता विभाग म्हणजे ‘आयसीयू’मध्ये होणाऱ्या एकूण मृत्यूपैकी ३० ते ४० टक्के मृत्यू हे ‘सेप्सिस’मुळे होतात, अशी माहिती मुंबईच्या टाटा मेमोरियल हॉस्पिटलच्या अतिदक्षता औषधोपचार विभागाचे प्रमुख प्रा. डॉ. अतुल कुळकर्णी यांनी दिली.

ठळक मुद्दे इंटरनॅशल क्रिटिकल केअर अपडेट परिषदेला सुरुवात

नागपूर : कुठल्याही इन्फेक्शनला शरीराचा तीव्र प्रतिसाद म्हणजे ‘सेप्सिस’. ही एक गंभीर परिस्थिती असून, यावर योग्य वेळेत उपचार न मिळाल्यास ‘टिश्यू’ला हानी पोहोचून विविध अवयव निकामी होण्याचा धोका निर्माण होतो. अतिदक्षता विभाग म्हणजे ‘आयसीयू’मध्ये होणाऱ्या एकूण मृत्यूपैकी ३० ते ४० टक्के मृत्यू हे ‘सेप्सिस’मुळे होतात, अशी माहिती मुंबईच्या टाटा मेमोरियल हॉस्पिटलच्या अतिदक्षता औषधोपचार (क्रिटिकल केअर मेडिसिन) विभागाचे विभाप्रमुख प्रा. डॉ. अतुल कुळकर्णी यांनी दिली.

‘इंडियन सोसायटी ऑफ क्रिटिकल केअर मेडिसिन’द्वारे (आयएससीसीएम) दुसऱ्या ‘इंटरनॅशनल क्रिटिकल केअर अपडेट’चे आयोजन नागपुरातील एका खासगी हॉटेलमध्ये करण्यात आले होते, यावेळी ते तज्ज्ञ वक्ता म्हणून बोलत होते. परिषदेचे अध्यक्ष डॉ. निर्मल जयस्वाल, ‘आयएससीसीएम’ नागपूर शाखेचे अध्यक्ष डॉ. कमल भूतडा, सचिव डॉ. अनंतसिंह राजपूत, डॉ. अनिल जवाहराणी, डॉ. स्वप्ना खानझोडे, डॉ. चेतन शर्मा, डॉ. पारस झुणके आदी उपस्थित होते. ‘सेप्सिस सिन्ड्रोम’चे महत्त्वाचे कारण कुठल्याही वैद्यकीय सल्ल्याशिवाय अँन्टिबायोटिक्सचे सेवन हे होय. त्यामुळे स्वत:हून अँन्टिबायोटिक्स घेण्याऐवजी तज्ज्ञ वैद्यकीय सल्ला घ्यावा, असे आवाहनही डॉ. कुलकर्णी यांनी केले.

-इन्फेक्शनमुळे सेप्सिस होण्याचा धोका

कुठल्याही प्रकारचे इन्फेक्शन झाल्यास सेप्सिस होण्याचा धोका संभवतो. विशेषत: जे रुग्ण ६५ वर्षांवरील आहेत, ज्यांना मधुमेह, फुप्फुसांचे आजार, कर्करोग आणि मूत्रपिंडाच्या विकारांसारखे दीर्घकालीन आजार झाले, ज्यांची रोगप्रतिकार क्षमता कमी आहे त्यांना सेप्सिसची जोखीम अधिक असल्याचे डॉ. कुलकर्णी म्हणाले.

-मेंदूवर दीर्घकालीन प्रभाव पडू शकतो

डॉ. निर्मल जयस्वाल म्हणाले, जर तीव्र सेप्सिसमधून रुग्ण बरा झाला तरी सेप्सिसमुळे ज्या आंतरिक अवयवांवर आणि टिश्यूंवर आघात झालेला असतो, त्या रुग्णांना बरे होण्यास काही आठवडे अथवा महिने लागू शकतात. ज्यांना तीव्र सेप्सिस अथवा सेप्टिक शॉकला सामोरे जावे लागले, त्यांच्या मेंदूवर दीर्घकालीन प्रभाव पडू शकतो.

-अल्ट्रासाउंड तंत्रज्ञानाचा वापर शिकणे गरजेचे

गुडवाव येथील लिव्हर ट्रान्सप्लांट आयसीयूचे संचालक डॉ. दीपक गोविल म्हणाले की, अल्ट्रासाउंड तंत्रज्ञानाच्या माध्यमाने गंभीर रुग्णांच्या आजाराचे निदान झाल्यास त्वरित औषधोपचाराची दिशा ठरविता येणे शक्य आहे. यामुळे ‘आयसीयू’मधील डॉक्टरांनी (इंटेंसिव्हिस्ट) अल्ट्रासाउंड तंत्रज्ञानाचा वापर शिकणे गरजेचे आहे. रुग्णांचा जीव वाचविणे अधिक शक्य होते.

टॅग्स :Healthआरोग्य