शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
2
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
3
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
4
Anil Ambani: अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या, समन नंतर आता लुकआऊट सर्क्युलर जारी
5
भारतात पहिल्यांदा पार पडली 'लॅप्रोस्कोपिक' शस्त्रक्रिया; 'श्री' नावाच्या कासवाला मिळाली संजीवनी
6
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
7
पत्नीला संपवलं अन् हॉस्पिटलमध्ये जाऊन म्हणाला साप चावला; दिव्यांग मुलींनी केली पित्याची पोलखोल 
8
निर्जन रस्ता, अर्धवट जळालेला मृतदेह अन् रहस्यमय गुंता...; १३ वर्षीय मुलाच्या हत्येमागे ट्विस्ट काय?
9
शतांक विपरीत राजयोग: ९ राशींना वक्री शनिचे वरदान, सुबत्ता भरभराट; भरघोस लाभ, शुभ कल्याण होईल!
10
RSS प्रमुख मोहन भागवत यांना पकडा, माजी ATS अधिकाऱ्याचा हा दावा विशेष कोर्टाने फेटाळला
11
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१४,८८८ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
12
"हा पुरस्कार मी...", राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर शाहरुख खानची पोस्ट, पण फ्रॅक्चर हात पाहून चाहते चिंतेत
13
जम्मू-काश्मीर: कुलगाममध्ये चकमक, सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला केले ठार
14
भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही? डोनाल्ड ट्रम्प यांच्या चेहऱ्यावर उमटले हास्य! म्हणाले...
15
बिहारमध्ये ६५ लाख मतदार वगळले; नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत घटली
16
कोल्हापुरात हायकोर्टाचे १८ ऑगस्टपासून ‘सर्किट बेंच’; ४० वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश
17
मालेगाव स्फोटप्रकरणी सिमीच्या अँगलने तपास व्हायला हवा होता; विशेष न्यायालयाने केले स्पष्ट
18
‘एफ-३५’ फायटर खरेदी प्रस्ताव रोखला; भारताचे अमेरिकेला प्रत्युत्तर, लोकसभेत सरकारची माहिती
19
आठवडाभर लांबले; भारतावरील २५ टक्के टॅरिफची अंमलबजावणी ७ ऑगस्टपासून, पाकचा कर घटवला
20
आक्रमक खासदारांना रोखण्यासाठी थेट कमांडो; लोकशाही इतिहासातील हा एक काळा दिवस: काँग्रेस

आयसीयूतील ४० टक्के मृत्यू ‘सेप्सिस’मुळे; अँटिबायोटिक्सचा वापर वैद्यकीय सल्ल्यानेच करावा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2022 21:21 IST

Nagpur News अतिदक्षता विभाग म्हणजे ‘आयसीयू’मध्ये होणाऱ्या एकूण मृत्यूपैकी ३० ते ४० टक्के मृत्यू हे ‘सेप्सिस’मुळे होतात, अशी माहिती मुंबईच्या टाटा मेमोरियल हॉस्पिटलच्या अतिदक्षता औषधोपचार विभागाचे प्रमुख प्रा. डॉ. अतुल कुळकर्णी यांनी दिली.

ठळक मुद्दे इंटरनॅशल क्रिटिकल केअर अपडेट परिषदेला सुरुवात

नागपूर : कुठल्याही इन्फेक्शनला शरीराचा तीव्र प्रतिसाद म्हणजे ‘सेप्सिस’. ही एक गंभीर परिस्थिती असून, यावर योग्य वेळेत उपचार न मिळाल्यास ‘टिश्यू’ला हानी पोहोचून विविध अवयव निकामी होण्याचा धोका निर्माण होतो. अतिदक्षता विभाग म्हणजे ‘आयसीयू’मध्ये होणाऱ्या एकूण मृत्यूपैकी ३० ते ४० टक्के मृत्यू हे ‘सेप्सिस’मुळे होतात, अशी माहिती मुंबईच्या टाटा मेमोरियल हॉस्पिटलच्या अतिदक्षता औषधोपचार (क्रिटिकल केअर मेडिसिन) विभागाचे विभाप्रमुख प्रा. डॉ. अतुल कुळकर्णी यांनी दिली.

‘इंडियन सोसायटी ऑफ क्रिटिकल केअर मेडिसिन’द्वारे (आयएससीसीएम) दुसऱ्या ‘इंटरनॅशनल क्रिटिकल केअर अपडेट’चे आयोजन नागपुरातील एका खासगी हॉटेलमध्ये करण्यात आले होते, यावेळी ते तज्ज्ञ वक्ता म्हणून बोलत होते. परिषदेचे अध्यक्ष डॉ. निर्मल जयस्वाल, ‘आयएससीसीएम’ नागपूर शाखेचे अध्यक्ष डॉ. कमल भूतडा, सचिव डॉ. अनंतसिंह राजपूत, डॉ. अनिल जवाहराणी, डॉ. स्वप्ना खानझोडे, डॉ. चेतन शर्मा, डॉ. पारस झुणके आदी उपस्थित होते. ‘सेप्सिस सिन्ड्रोम’चे महत्त्वाचे कारण कुठल्याही वैद्यकीय सल्ल्याशिवाय अँन्टिबायोटिक्सचे सेवन हे होय. त्यामुळे स्वत:हून अँन्टिबायोटिक्स घेण्याऐवजी तज्ज्ञ वैद्यकीय सल्ला घ्यावा, असे आवाहनही डॉ. कुलकर्णी यांनी केले.

-इन्फेक्शनमुळे सेप्सिस होण्याचा धोका

कुठल्याही प्रकारचे इन्फेक्शन झाल्यास सेप्सिस होण्याचा धोका संभवतो. विशेषत: जे रुग्ण ६५ वर्षांवरील आहेत, ज्यांना मधुमेह, फुप्फुसांचे आजार, कर्करोग आणि मूत्रपिंडाच्या विकारांसारखे दीर्घकालीन आजार झाले, ज्यांची रोगप्रतिकार क्षमता कमी आहे त्यांना सेप्सिसची जोखीम अधिक असल्याचे डॉ. कुलकर्णी म्हणाले.

-मेंदूवर दीर्घकालीन प्रभाव पडू शकतो

डॉ. निर्मल जयस्वाल म्हणाले, जर तीव्र सेप्सिसमधून रुग्ण बरा झाला तरी सेप्सिसमुळे ज्या आंतरिक अवयवांवर आणि टिश्यूंवर आघात झालेला असतो, त्या रुग्णांना बरे होण्यास काही आठवडे अथवा महिने लागू शकतात. ज्यांना तीव्र सेप्सिस अथवा सेप्टिक शॉकला सामोरे जावे लागले, त्यांच्या मेंदूवर दीर्घकालीन प्रभाव पडू शकतो.

-अल्ट्रासाउंड तंत्रज्ञानाचा वापर शिकणे गरजेचे

गुडवाव येथील लिव्हर ट्रान्सप्लांट आयसीयूचे संचालक डॉ. दीपक गोविल म्हणाले की, अल्ट्रासाउंड तंत्रज्ञानाच्या माध्यमाने गंभीर रुग्णांच्या आजाराचे निदान झाल्यास त्वरित औषधोपचाराची दिशा ठरविता येणे शक्य आहे. यामुळे ‘आयसीयू’मधील डॉक्टरांनी (इंटेंसिव्हिस्ट) अल्ट्रासाउंड तंत्रज्ञानाचा वापर शिकणे गरजेचे आहे. रुग्णांचा जीव वाचविणे अधिक शक्य होते.

टॅग्स :Healthआरोग्य