शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या अनुभवाचा राज्याला काय उपयोग? कुंडमाळा पूल दुर्घटनेवरुन राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल
2
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
3
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
4
१०-१५ हजारांत संसाराचा गाडा हाकायचा कसा? राज्यातील शिक्षणसेवकांचा सवाल
5
₹१७०० घेऊन गाझियाबादवरून अमेरिकेला पोहोचले; आज झुकरबर्ग, सुंदर पिचाईंपेक्षाही अधिक आहे सॅलरी
6
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?
7
तेजीसह शेअर बाजाराच्या कामकाजाला सुरुवात, Sensex ८१,१०० च्या वर; Nifty मध्येही तेजी, 'हे' स्टॉक्स वधारले
8
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
9
लॅम्बोर्गिनी चलायी जाने हो...; राम कपूरने घरी आणली लक्झरियस कार, कोटींमध्ये आहे किंमत
10
लाईक्स आणि फॉलोअर्ससाठी आम्हाला त्रास का देता? विमानातल्या व्हायरल फोटोशी इन्फ्लुएन्सरकडून छेडछाड, कुटुंबियांचा संताप
11
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
12
आजचा अग्रलेख: मध्य पूर्वेत पुन्हा आगडोंब!
13
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचं झालं पॅचअप? या पोस्टनंतर चर्चेला उधाण
14
तुलाच पत्नी बनवेन! तरुणाने मृत प्रेयसीसोबत लग्न करून पूर्ण केलं वचन, नातेवाईक भावूक  
15
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
16
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता
17
इस्रायल आणि इराणचे एकमेकांवरील हल्ले सुरूच, आतापर्यंत दोन्ही देशांचे किती नुकसान? जाणून घ्या
18
Kedarnath helicopter crash: पत्नीच्या ‘बर्थडे’साठी गेलेले यवतमाळचे कुटुंब केदारनाथला हेलिकॉप्टर अपघातात ठार
19
Pune Maval bridge collapses: कुंडमळाचा ३५ वर्षे जुना पूल कोसळला, इंद्रायणीत अनेक पर्यटक वाहून गेले, ५२ जणांना वाचविले 
20
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू

आयसीयूतील ४० टक्के मृत्यू ‘सेप्सिस’मुळे; अँटिबायोटिक्सचा वापर वैद्यकीय सल्ल्यानेच करावा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2022 21:21 IST

Nagpur News अतिदक्षता विभाग म्हणजे ‘आयसीयू’मध्ये होणाऱ्या एकूण मृत्यूपैकी ३० ते ४० टक्के मृत्यू हे ‘सेप्सिस’मुळे होतात, अशी माहिती मुंबईच्या टाटा मेमोरियल हॉस्पिटलच्या अतिदक्षता औषधोपचार विभागाचे प्रमुख प्रा. डॉ. अतुल कुळकर्णी यांनी दिली.

ठळक मुद्दे इंटरनॅशल क्रिटिकल केअर अपडेट परिषदेला सुरुवात

नागपूर : कुठल्याही इन्फेक्शनला शरीराचा तीव्र प्रतिसाद म्हणजे ‘सेप्सिस’. ही एक गंभीर परिस्थिती असून, यावर योग्य वेळेत उपचार न मिळाल्यास ‘टिश्यू’ला हानी पोहोचून विविध अवयव निकामी होण्याचा धोका निर्माण होतो. अतिदक्षता विभाग म्हणजे ‘आयसीयू’मध्ये होणाऱ्या एकूण मृत्यूपैकी ३० ते ४० टक्के मृत्यू हे ‘सेप्सिस’मुळे होतात, अशी माहिती मुंबईच्या टाटा मेमोरियल हॉस्पिटलच्या अतिदक्षता औषधोपचार (क्रिटिकल केअर मेडिसिन) विभागाचे विभाप्रमुख प्रा. डॉ. अतुल कुळकर्णी यांनी दिली.

‘इंडियन सोसायटी ऑफ क्रिटिकल केअर मेडिसिन’द्वारे (आयएससीसीएम) दुसऱ्या ‘इंटरनॅशनल क्रिटिकल केअर अपडेट’चे आयोजन नागपुरातील एका खासगी हॉटेलमध्ये करण्यात आले होते, यावेळी ते तज्ज्ञ वक्ता म्हणून बोलत होते. परिषदेचे अध्यक्ष डॉ. निर्मल जयस्वाल, ‘आयएससीसीएम’ नागपूर शाखेचे अध्यक्ष डॉ. कमल भूतडा, सचिव डॉ. अनंतसिंह राजपूत, डॉ. अनिल जवाहराणी, डॉ. स्वप्ना खानझोडे, डॉ. चेतन शर्मा, डॉ. पारस झुणके आदी उपस्थित होते. ‘सेप्सिस सिन्ड्रोम’चे महत्त्वाचे कारण कुठल्याही वैद्यकीय सल्ल्याशिवाय अँन्टिबायोटिक्सचे सेवन हे होय. त्यामुळे स्वत:हून अँन्टिबायोटिक्स घेण्याऐवजी तज्ज्ञ वैद्यकीय सल्ला घ्यावा, असे आवाहनही डॉ. कुलकर्णी यांनी केले.

-इन्फेक्शनमुळे सेप्सिस होण्याचा धोका

कुठल्याही प्रकारचे इन्फेक्शन झाल्यास सेप्सिस होण्याचा धोका संभवतो. विशेषत: जे रुग्ण ६५ वर्षांवरील आहेत, ज्यांना मधुमेह, फुप्फुसांचे आजार, कर्करोग आणि मूत्रपिंडाच्या विकारांसारखे दीर्घकालीन आजार झाले, ज्यांची रोगप्रतिकार क्षमता कमी आहे त्यांना सेप्सिसची जोखीम अधिक असल्याचे डॉ. कुलकर्णी म्हणाले.

-मेंदूवर दीर्घकालीन प्रभाव पडू शकतो

डॉ. निर्मल जयस्वाल म्हणाले, जर तीव्र सेप्सिसमधून रुग्ण बरा झाला तरी सेप्सिसमुळे ज्या आंतरिक अवयवांवर आणि टिश्यूंवर आघात झालेला असतो, त्या रुग्णांना बरे होण्यास काही आठवडे अथवा महिने लागू शकतात. ज्यांना तीव्र सेप्सिस अथवा सेप्टिक शॉकला सामोरे जावे लागले, त्यांच्या मेंदूवर दीर्घकालीन प्रभाव पडू शकतो.

-अल्ट्रासाउंड तंत्रज्ञानाचा वापर शिकणे गरजेचे

गुडवाव येथील लिव्हर ट्रान्सप्लांट आयसीयूचे संचालक डॉ. दीपक गोविल म्हणाले की, अल्ट्रासाउंड तंत्रज्ञानाच्या माध्यमाने गंभीर रुग्णांच्या आजाराचे निदान झाल्यास त्वरित औषधोपचाराची दिशा ठरविता येणे शक्य आहे. यामुळे ‘आयसीयू’मधील डॉक्टरांनी (इंटेंसिव्हिस्ट) अल्ट्रासाउंड तंत्रज्ञानाचा वापर शिकणे गरजेचे आहे. रुग्णांचा जीव वाचविणे अधिक शक्य होते.

टॅग्स :Healthआरोग्य