शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
2
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
3
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
4
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
5
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
6
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
7
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
8
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
9
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
10
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
11
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
12
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
13
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
14
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
15
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
16
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
17
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
18
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
19
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
20
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले

साखर व्यवसायाच्या नावावर ४० कोटीने फसविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2021 11:23 IST

Nagpur News साखरेच्या व्यवसायात गुंतवणूक केल्यास भरपूर नफा मिळवून देतो, असे आमिष दाखवून व्यापाऱ्यांना ४० कोटी रुपयांचा चुना लावणाऱ्या टोळीविरोधात आर्थिक शाखेत गुन्ह्याची नोंद झाली आहे.

ठळक मुद्देइतवारीतील अनेक व्यापाऱ्यांना गंडविले आर्थिक गुन्हे शाखेत तक्रार

 

जगदीश जोशी

 लोकमत न्यूज नेटवर्क  

नागपूर : साखरेच्या व्यवसायात गुंतवणूक केल्यास भरपूर नफा मिळवून देतो, असे आमिष दाखवून व्यापाऱ्यांना ४० कोटी रुपयांचा चुना लावणाऱ्या टोळीविरोधात आर्थिक शाखेत गुन्ह्याची नोंद झाली आहे. पोलिसांनी साखरेच्या दलालाला अटक केली आहे. तक्रारीच्या सव्वा वर्षानंतर गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

गांधीबाग निवासी ६२ वर्षीय दिलीप जैन धान्याचे व्यापारी आहे. २०१९ मध्ये आरोपी अमर खनवानी, पंकज सोमय्या, तुलसीदास सोमय्या व उमाकांत ऊर्फ उमेश सोमय्या जैन त्यांच्याकडे आले. त्यांनी स्वत:ला सोलापूरच्या गोकुल शुगर इंडस्ट्रीजचे सुपर स्टॉकिस्ट सांगून आमच्यासोबत व्यवसाय केल्यास भरपूर लाभ होईल, असे सांगितले. त्यांनी सांगितले की, गोकुल शुगर इंडस्ट्रीजमधून कमी किमतीत साखरेचा पुरवठा होतो, साखर विकून भरपूर नफा मिळू शकतो. जैन यांनी डिसेंबर २०१९ मध्ये अमर खनवानी यांच्यासोबत ५० ते १०० टन साखरेचा व्यवहार केला. ज्यात त्यांना नफाही झाला. त्यामुळे जैन यांचा आरोपीवर विश्वास निर्माण झाला. ते खनवानी व सोमय्या यांच्या सांगण्यानुसार साखर खरेदी करू लागले. सोमय्या यांचे बाजारपेठेत नाव असल्याने जैन यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला.

खनवानी याने जैन यांची साखर एका मोठ्या ब्रॅण्डच्या डेअरी कंपनीला विकल्याचे सांगितले. जैन यांनी जेव्हा त्या कंपनीकडे विचारणा केली तेव्हा कळले की, खनवानी यानेही त्या कंपनीकडून साखर खरेदीसाठी पैसे घेतल्याचे लक्षात आले. जैन यांनी अमर खनवानी, सोमय्या परिवार व गोकुल शुगर इंडस्ट्रीजचे व्यवस्थापकीय संचालक दत्ता शिंदे यांनी सांगितल्यानुसार साखर खरेदी करण्यासाठी ४ कोटी ११ लाख रुपये गुंतविले होते. मार्च २०२० मध्ये लॉकडाऊन लागल्यानंतर आरोपी जैन यांना साखरेचा पुरवठा करण्यास अथवा पैसे परत करण्यास टोलवाटोलवी करीत होते. जैन यांच्याबरोबरच इतवारी व पूर्व नागपुरातील अनेक व्यापाऱ्यांनी आरोपींनी सांगितल्यानुसार गुंतवणूक केली होती. आरोपींनी व्यापाऱ्यांकडून ४० ते ५० कोटी रुपये गोळा केल्याची माहिती आहे. यासंदर्भात जैन यांनी २०२० मध्ये आर्थिक शाखेकडे तक्रार केली होती. परंतु, पोलिसांनी चौकशी फार गांभीर्याने केली नाही. त्यामुळे दोन आरोपींनी न्यायालयातून जामीन मिळविला. जैन यांनी पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांच्याकडे घटनेची तक्रार केली. त्यानंतर फसवणुकीचा गुन्हा दाखल करून आरोपी अमर खनवानी यांना अटक केली.

- आरोपींकडून धमकी, आत्महत्येचे नाटक

या फसवणुकीचा भंडाफोड झाल्यानंतर आरोपींनी पीडित व्यापाऱ्यावर दबाव निर्माण केला. एका आरोपीने आत्महत्येचे नाटक करून रुग्णालयात भरती झाला. तो पीडित व्यापाऱ्यालाच आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्या प्रकरणात धमकी देऊ लागला. या प्रकरणात ज्या व्यापाऱ्यांनी रोख रक्कम दिली, त्यांनी चुप्पी साधल्याने सव्वा वर्षापूर्वी पोलीस या प्रकरणात गुन्हा दाखल करू शकले नाही.

- २० ते २५ व्यापाऱ्यांना लावला चुना

सूत्रांच्या माहितीनुसार २० ते २५ व्यापाऱ्यांना आरोपींनी चुना लावला आहे. सव्वा वर्षानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केल्यानंतर व्यापारी तक्रार करण्यास पुढे येत नाही. यातील काही व्यापाऱ्यांना मूळ रक्कम मिळाली आहे. एका व्यापाऱ्याने गुंतवणुकीच्या बदल्यात संपत्तीचा व्यवहार केला आहे. गुन्हा दाखल केल्यानंतर पोलिसांनी अमर खनवानी याला अटक केली आहे. अन्य आरोपींबाबत पोलिसांची भूमिका शिथिल दिसते आहे.

टॅग्स :fraudधोकेबाजी