शहरं
Join us  
Trending Stories
1
Kalyan Building Collapses: कल्याण दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांसाठी राज्य सरकारची मोठी घोषणा
2
पाकिस्तानने असीम मुनीरचे केले प्रमोशन, लष्करात फील्ड मार्शल रँक किती महत्त्वाची?
3
'मीर जाफर vs एक बिर्याणी देशावर भारी'; भाजप-काँग्रेसमध्ये पोस्टर वॉर! का वाढला वाद?
4
१७ वर्षीय आयुष म्हात्रेनं २०० च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या धावा; पण फिफ्टी आड आला माफाका
5
सातारा: जेवणाचा डब्बाच डोक्यात मारला, प्रेमसंबंधास अडथळा ठरत असल्याने तरुणाचा खून
6
क्षुल्लक मुद्द्याला जास्त महत्व देऊ नका, हे प्रकरण इथेच थांबवा; सरन्यायाधीश गवई यांचे आवाहन
7
पाकिस्तानची पोलखोल करण्यासाठी भारताचे शिष्टमंडळ तयार; कोण कुठे जाणार? पाहा...
8
Viral Video: आधी देवाला हात जोडले, नंतर मंदिरातील दानपेटी नेली चोरून
9
पाकिस्तानी लष्करप्रमुख असीम मुनीरचे प्रमोशन; पराभूत जनरलला सरकारने बनवले 'फील्ड मार्शल'
10
छगन भुजबळांच्या मंत्रिमंडळात एन्ट्रीने नाशिकचा दबदबा, पण पालकमंत्रिपदाचा पेचही वाढला?
11
IPL 2025: आता पाऊस पडल्यानंतरही सामने रद्द होणार नाहीत, आयपीएलमध्ये नवा नियम लागू!
12
"पती नेत्यांना पुरवतो २० वर्षांच्या मुली, मला…’’, महिलेच्या आरोपांनी या राज्यातील राजकारण तापले   
13
Thane: कल्याणमध्ये चार मजली इमारतीत स्लॅब कोसळून भयंकर दुर्घटना, चार जणांचा मृत्यू 
14
ठरलं ! जगातील सर्वात मोठ्या स्टेडियमवर रंगणार IPL फायनल; या मैदानात होणार प्लेऑफ्सचे २ सामने
15
पाकिस्तानने आपल्याच नागरिकांवर केला ड्रोन हल्ला, चार मुलांचा मृत्यू
16
"सरन्यायाधीश गवई यांच्या महाराष्ट्र दौऱ्यात प्रोटोकॉलचा भंग करणाऱ्यांवर करावाई करा’’, काँग्रेसचं राष्ट्रपतींना पत्र  
17
पहलगाम हल्ल्यानंतर भारतासमोर नवे आव्हान; दहशतवाद्यांकडून इंडियन आर्मी युनिफॉर्मचा वापर
18
"...तेव्हाच आम्ही हस्तक्षेप करू’’, वक्फ सुधारणा कायद्यावरील सुनावणीवेळी सरन्यायाधीशांनी केलं स्पष्ट 
19
'ऑपरेशन सिंदूर’ला छोटीशी लढाई म्हणत मल्लिकार्जुन खर्गेंचा मोदींना सवाल, म्हणाले...   
20
"हे खूपच धक्कादायक..."; मॉर्फ केलेले फोटो, खोट्या बातम्या पाहून प्रिती झिंटा भडकली, म्हणाली...

४ हजारावर परवाने, आरसींना वाहन चालकांची प्रतीक्षा

By admin | Updated: April 29, 2016 02:56 IST

अपुरा पत्ता किंवा वाहनधारक हजर नसल्याच्या कारणाने प्रादेशिक परिवहन कार्यालय, (आरटीओ) नागपूर ग्रामीणमध्ये तब्बल चार हजारावर वाहन परवाने ..

आरटीओ ग्रामीण : सात दिवसांत पत्त्याचा पुरावा सादर करावा लागणारनागपूर : अपुरा पत्ता किंवा वाहनधारक हजर नसल्याच्या कारणाने प्रादेशिक परिवहन कार्यालय, (आरटीओ) नागपूर ग्रामीणमध्ये तब्बल चार हजारावर वाहन परवाने व नोंदणी पुस्तके (आरसी) पडून आहेत. याला आरटीओ कार्यालयाने गंभीरतेने घेतले असून सात दिवसांच्या आत संबंधित चालकांनी पत्त्याचा पुरावा सादर न केल्यास संबंधित दस्तावेज नष्ट करण्याचा निर्णय घेतला आहे.पूर्वी कोणताही पत्ता देऊन लायसन्स काढले जात असे. अनेक परदेशी नागरिकांनीही बनावट कागदपत्रांच्या आधारे लायसन्स मिळवल्याच्या तक्रारी समोर आल्या. ही बाब राष्ट्रीय सुरक्षेसाठी धोकादायक असल्याने केंद्र शासनाने लायसन्स व आरसी बुक घरपोच देण्याची योजना आखली. राज्यात सप्टेंबर २०११ मध्ये घरपोच लायसन्सची योजना सुरू झाली. या निर्णयाचे राज्यभरात स्वागतही झाले. घरपोच लायसन्स मिळणार असल्यामुळे ‘आरटीओह्ण कार्यालयाच्या चकरा माराव्या लागणार नाहीत या विचाराने नागरिकही आनंदित होते. योजनेत नागरिकांकडून ५० रुपये डाक खर्च वसूल करण्यात आला. घरपोच कागदपत्रे मिळणार असल्याने कुणीच याला विरोधही दर्शविला नाही. मात्र, महिन्याभरातच या योजनेचा फज्जा उडाला. पैसे भरूनही डाक विभागाकडून कागदपत्रे मिळत नसल्याच्या तक्रारी येऊ लागल्या. तब्बल एक ते दोन महिन्यांचा कालावधी लागत असल्यामुळे नागरिक हैराण झाले होते. दरम्यान तत्कालीन परिवहन आयुक्त सेठी यांनी पाच दिवसांत वाहन परवाना उमेदवाराला न मिळाल्यास टपाल कार्यालयावर दंड आकारण्याचा निर्णय घेतला. यामुळे मधल्या काळात अनेकांना वेळेवर परवाना किंवा आरसी बुक मिळत होते. परंतु अनेक वाहनधारक घराचा योग्य पत्ता देत नसल्याने तर काही जण घरी हजर राहत नसल्याने हे दस्तावेज आरटीओ कार्यालयात परत आले. याची संख्या चार हजारावर सांगितली जात आहे. ग्रामीण आरटीओचे प्रादेशिक परिवहन अधिकारी शरद जिचकार यांनी याला गंभीरतेने घेऊन ज्यांना वाहन परवाना किंवा आरसी बुक मिळाले नाही त्यांनी कार्यालयात आपल्या पत्त्याचे दस्तावेज सात दिवसांत सादर करण्याचे आवाहन केले आहे. असे न झाल्यास त्यांना संबंधित दस्तावेज मिळणार नाही. उलट ते नष्ट करण्यात येईल, असा निर्णय घेतल्याचे कळविले आहे. (प्रतिनिधी)