शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
2
राहुल गांधींच्या सुरक्षेत मोठी चूक; तरुण Kiss घेऊन पळाला, व्हिडिओ व्हायरल...
3
"वडिलांच्या नवीन मर्सिडीजवर विपिनची नजर, ६० लाखांची मागणी", निक्कीच्या भावाने मांडली व्यथा
4
बायकोला जिवंत जाळल्याचा आरोप असलेल्या पतीची पहिली प्रतिक्रिया, पत्नीच्या हत्येमागील कारण काय सांगितले?
5
पहिल्यांदाच मिझोरममध्ये पोहोचली रेल्वे; १४२ पूल अन् ४८ बोगद्यांद्वारे तयार झाला मार्ग...
6
निवृत्तीनंतर चेतेश्वर पुजाराला BCCI किती पेन्शन देणार? निवृत्त वेतनासाठी कोणतं सूत्र वापरतात?
7
खुशखबर...! पुढच्याच महिन्यात मारुती नवी धाकड SUV आणणार; क्रेटा, सेल्टोसला थेट टक्कर देणार, किंमतही असणार या सर्वांपेक्षा कमी!
8
ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही रशियाचे युक्रेनवरील हल्ले सुरूच, दोन गावांवरही कब्जा!
9
नेतन्याहू यांचा 'कंट्रोल गाझा' प्लॅन सुरू! इस्रायली हल्ल्यात ६३ जणांचा मृत्यू; पुढे काय होणार?
10
गर्भवती पत्नीची निर्घृण हत्या, मृतदेहाचे तुकडे करून पतीने लपवले; धक्कादायक घटनेने परिसर हादरला!
11
"रोज म्हणतात व्होट चोरी... व्होट चोरी..., यांचं डोकं चोरी झालंय!" देवेंद्र फडणवीस यांचा विरोधकांवर हल्लाबोल; स्पष्टच बोलले
12
३० वर्षीय पत्नीने प्रियकरासोबत रचला कट, ६० वर्षीय पतीला जंगलात नेऊन आवळला गळा
13
घसा खूपच खवखवतोय अन् खोकलाही जाता जाईना... 'या' ६ गोष्टी आहेत रामबाण उपाय
14
'कर्नाटक-महाराष्ट्रात मतचोरी; बिहारमध्ये होऊ देणार नाही', राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर निशाणा
15
५,००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल लखपती? जाणून घ्या १५ वर्षांत किती परतावा मिळेल
16
"मर्यादेत राहा...!"; आशिया कपमध्ये भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी वसीम अक्रमचा इशारा, नेमकं काय म्हणाला?
17
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी ६८ अर्ज; अनेक खासदारांच्या बनावट स्वाक्षरी केल्याचे उघड
18
सोहम बांदेकरसोबत लग्नाच्या चर्चांनंतर अभिनेत्री पूजाने पहिल्यांदाच शेअर केली स्टोरी, म्हणाली...
19
८व्या वेतन आयोगात बँक कर्मचाऱ्यांचे पगारही वाढतील का? कधी होणार लागू? मोठी अपडेट समोर
20
Sara Ali Khan : जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन! सारा अली खानने फक्त 'या' २ गोष्टी सोडून कमी केलं ४५ किलो वजन

२४ तासात ४ हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2021 04:08 IST

काटोल/उमरेड/बुटीबोरी : नागपूर जिल्ह्यात गत २४ तासात हत्येच्या चार घटना घडल्या आहेत. यात उमरेड आणि काटोलमध्ये क्षुल्लक कारणातून झालेल्या ...

काटोल/उमरेड/बुटीबोरी : नागपूर जिल्ह्यात गत २४ तासात हत्येच्या चार घटना घडल्या आहेत. यात उमरेड आणि काटोलमध्ये क्षुल्लक कारणातून झालेल्या वादात दोन युवकांचा बळी गेला. यासोबतच बुटीबोरी परिसरातील बोरखेडी फाटक आणि मौदा पोलीस स्टेशन हद्दीतील सावळी फाटा येथे अनोळखी इसमाचा मृतदेह आढळून आला आहे. या दोघांचीही हत्या झाल्याचे पोलिसांच्या प्राथमिक चौकशीतून निष्पन्न झाले आहे.

काटोल शहरातील अर्जुननगर परिसरात बुधवारी दुपारी १.३० वाजताच्या सुमारास नीतेश ऊर्फ गिरीश लीलाधर गजबे (२१) या युवकाची हत्या करण्यात आली. या घटनेनंतर मारेकरी करण गवळी व अर्जुन माटे पसार झाले. करण आणि अर्जुन हे नागपूर येथे राहणारे आहेत. त्यांचे नीतेशशी संबंध असल्याने काही कार्यक्रमानिमित्त ते काटोल येथे आले होते. ३० मार्च रोजी त्यांच्यात वाद झाला होता. याचा वचपा काढण्यासाठी दोन्ही आरोपींनी नीतेशला बुधवारी (दि.३१) रोजी दुपारी १.३० वाजताच्या सुमारास त्याच्या घरासमोरील रस्त्यावर गाठत चाकूने भोसकले. स्थानिकांनी आरडाओरड केल्यानंतर मारेकरी घटनास्थळावरून पसार झाले. काटोल पोलीस फरार आरोपींचा शोध घेत आहेत.

उमरेड कावरापेठ येथील अक्की बारसमोर जुन्या क्षुल्लक भांडणाच्या कारणावरून मंगळवारी(दि.३०)रोजी रात्री ८.४५ वाजता दोघांनी एका तरुणाचा गेम केला. संदीप ऊर्फ संजय ईस्तारी खवास (३८, रा. कावरापेठ, उमरेड) असे मृताचे नाव आहे. याप्रकरणी महादेव बाळकृष्ण मोहीनकर (२४, रा. कावरापेठ, उमरेड) आणि त्याचा मामेभाऊ विजय रवींद्र डहारे (२३, नागोबा चौक, कुही) या दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. मृत संजय खवास हा एका कारखान्यात कामगार होता. आरोपी महादेव मोहीनकर हा सुद्धा मोलमजुरी करतो. मृत संजय खवास आणि कावरापेठ येथील किशोर धोटे यांचे कौटुंबिक संबंध होते.

तिसरी घटना बोरखेडी फाटक परिसरात उजेडात आली. येथे अज्ञात आरोपीने एका अनोळखी व्यक्तीची दगडाने ठेचून हत्या केल्याचे बुधवारी (दि. ३१) सकाळी १० वाजताच्या सुमारास उघडकीस आले. अशोक विठ्ठल वंजारी (४३, रा. वॉर्ड क्र. ४, इंदिरानगर, बुटीबोरी) यांचा चुलत भाऊ सुरेश वंजारी हे बोरखेडी फाटक परिसरातील रेल्वे पुलाखाली साचलेल्या पाण्यात बैलांना पाणी पाजायला गेले असता, त्यांना एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडून असल्याचे आढळले. त्यांनी लगेच याबाबत अशोक वंजारींना सांगून पोलिसांना सूचना दिली. घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र चौहान, ठाणेदार ओमप्रकाश कोकाटे, एपीआय सतीश सोनटक्के यांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. मृत व्यक्ती अंदाजे ३० ते ३५ वर्षे वयोगटातील होता.

चौथी घटना मौदा पोलीस स्टेशन हद्दीतील सावळी फाटा उजेडात आली. येथे अज्ञात आरोपीने अनोळखी व्यक्तीची हत्या करून पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह जमिनीत पुरला. पोलिसांच्या माहितीनुसार गुणाकर कवडूजी इंगोले (५२, रा. सावळी, ता. कामठी) यांना सावळी फाटा परिसरात दुर्गंधी आल्याने त्यांनी याबाबत मौदा पोलिसांना सूचना दिली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून पाहणी केली असता, अंदाजे ३० ते ३५ वयोगटातील अनोळखी व्यक्तीचा मृतदेह जमिनीत पुरल्याचे आढळून आले. याप्रकरणी मौदा पोलिसांनी भादंवि कलम ३०२, २०१ अन्वये गुन्हा नोंदविला आहे.