शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

नागपूर जिल्ह्यातील ८० टक्के पिकांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2019 11:12 IST

पावसाची दडी, मध्यंतरी कोसळलेला संततधार पाऊस व प्रतिकूल वातावरणातून वाचलेली नागपूर जिल्ह्यातील कपाशी, सोयाबीन, धान व इतर खरीप पिके परतीच्या पावसाने उद्ध्वस्त केली आहेत.

ठळक मुद्देपरतीच्या पावसाचा फटकाबोंडामधील सरकीसह सोयाबीन अंकुरले

सुनील चरपे।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सुरुवातीला पावसाची दडी, मध्यंतरी कोसळलेला संततधार पाऊस व प्रतिकूल वातावरणातून वाचलेली नागपूर जिल्ह्यातील कपाशी, सोयाबीन, धान व इतर खरीप पिके परतीच्या पावसाने उद्ध्वस्त केली आहेत. सततचा पाऊस आणि वातावरणातील दमटपणा यामुळे कपाशीची बोंडे सडली असून, आत असलेल्या कापसातील सरकी व शेंगांमधील सोयाबीनचे दाणे अंकुरले आहे. धानाची पिके शेतातच लोळली असून, त्याच्या लोंब्यामधील धान भरण्याची शक्यता मावळली आहे. शिवाय, उभ्या असलेल्या धानाच्या पिकावर मोठ्या प्रमाणात करपा या बुरशीजन्य रोगाचा आणि तुडतुड्यांचाही प्रादुर्भाव झाला आहे. या पावसामुळे जिल्ह्यातील ८० टक्के पिकांचे नुकसान झाल्याची माहिती कृषी व महसूल विभागातील अधिकाऱ्यांनी खासगीतबोलताना दिली.चालू खरीप हंगामात जिल्ह्यात अंदाजे २ लाख ५० हजार हेक्टरमध्ये कपाशीची लागवड, किमान एक लाख हेक्टरमध्ये सोयाबीनची पेरणी आणि जवळपास ९२४ हेक्टरमध्ये धानाची रोवणी करण्यात आली. सुरुवातीला पावसाने दडी मारल्याने पेरणी व रोवणीला आधीच विलंब झाला होता. त्यातच मध्यंतरी संततधार पाऊस बरसला. या काळात ढगाळ व दमट वातावरणामुळे एकीकडे सूर्यप्रकाशाअभावी पिकांची वाढ खुंटली होती तर दुसरीकडे विविध रोग व किडींचा प्रादुर्भाव झाला होता. पावसाने सवड देताच शेतकऱ्यांनी ही संपूर्ण पिके योग्य आंतरमशागत, खतांचे डोज, कीटकनाशके व मायक्रोन्यूट्रियन्टची फवारणी करून वाचविली. त्यामुळे त्यांचा उत्पादनखर्चही वाढला होता.चार दिवसांपासून कोसळत असलेल्या पावसाच्या सरींमुळे कापणीला आलेले व कापणी केलेले सोयाबीन भिजले. त्यातच बुरशीमुळे शेंगा काळवंडल्या असून, शेंगांमधील दाणेही अंकुरले. कपाशीची बोंडं सडल्याने तसेच फुलोर गळाल्याने महत्त्वाचे पहिले दोन वेचे हातातून गेले. बोंड दाबल्यावर त्यातून पाणी बाहेर येण्याची तसेच आतील सरकी अंकुरण्याची ही अलीकडच्या काळातील पहिलीच वेळ असल्याची माहिती काही वयोवृद्ध व अनुभवी शेतकºयांनी दिली. मौदा, रामटेक व कामठी तालुक्यातील लोंब्यावर व गर्भार अवस्थेतील धानाचे पीक लोळले आहे. त्यामुळे त्यातील धान भरणार नाही. शिवाय, मौदा तालुक्यातील धानाच्या पिकावर करपा व तुडतुड्यांचाही प्रादुर्भाव झाला आहे. परिणामी, या सर्व पिकांची प्रत खालावल्याने त्यांना बाजारात कवडीमोल भावाने विकावे लागणार आहे. नुकसानग्रस्त भागाचे सर्वेक्षण व पंचनामे करण्याची मागणी केली जात असली तरी प्रशासनाने ही प्रक्रिया अद्यापही सुरू केली नाही.हमीभाव व खरेदी केंद्रेकेंद्र शासनाने कापसाचा हमीभाव प्रति क्विंटल ५,५५० रुपये (लांब धागा) व ५,२५५ रुपये (मध्यम धागा), सोयाबीन (पिवळी) ३,७१० रुपये, धान १,८१५ रुपये (सर्वसाधारण), १,८३५ रुपये (ग्रेड ए), मूग ७,०५० रुपये, उडीद ५,७०० रुपये जाहीर केले आहे. सध्या खुल्या बाजारात चांगल्या प्रतिच्या सोयाबीनला प्रति क्विंटल २,२२० ते २,७०० रुपये भाव मिळत आहे. कापसाचा उत्पादनखर्च किमान ७,२५० रुपये प्रति क्विंटल असताना हमीभाव मात्र कमी जाहीर करण्यात आला. राज्यात कापसाच्या खरेदीला अद्याप सुरुवात झाली नसली तरी बुºहाणपूर (मध्य प्रदेश) येथे कापसाला ३,७१० ते ४००० रुपये आणि पंजाब व हरियाणामध्ये ४,९०० ते ५,१०० रुपये भाव मिळत आहे. ही स्थिती मूग व उडिदाची आहे. शेतमालाचे खुल्या बाजारातील भाव हमीभावापेक्षा कमी असल्याने शासनाने हमीभाव खरेदी केंद्र सुरू करणे गरजेचे आहे. अद्याप कुठेही खरेदी केंद्र सुरू करण्यात न आल्याने शेतकरी अडचणीत सापडले आहेत.शेतकरी दुहेरी संकटातपावसामुळे पिके खराब झाल्याने शेतकरी आधीच संकटात सापडले आहेत. त्यातच शेतमालाला खुल्या बाजारात कमी भाव मिळत आहे. शेतकºयांना सोयाबीन (चांगल्या प्रतिचे) किमान ५०० ते १००० रुपये, उडीद व मूग ५०० ते ७०० रुपये आणि कापूस १,५०० ते २,००० रुपये कमी भावाने विकावे लागत आहे.४प्रतिकूल वातावरणामुळे बहुतांश पिकांचा उत्पादनखर्च वाढला आहे. पावसामुळे प्रतवारी खालावलेला शेतमाल कवडीमोल भावाने विकावा लागणार आहे. खुल्या बाजारात मिळणारा कमी भाव व वाढता उत्पादनखर्च लक्षात घेता, यावर्षी शेतकरी दुहेरी आर्थिक संकटात सापडले आहेत.

टॅग्स :agricultureशेती