शहरं
Join us  
Trending Stories
1
चंद्रपूर: 'फादर्स डे'च्या दिवशी पाच मुले झाली पोरकी! दोन रानटी हत्तीनी सोंडेने आपटून एकाला केले ठार
2
Kedarnath Helicopter Crash : चारधाम यात्रेची हेलिकॉप्टर सेवा स्थगित; गौरीकुंडमधील दुर्घटनेनंतर नवा आदेश
3
मोठी बातमी: पुणे पोलिसांनी केलेल्या गोळीबारात कुख्यात गुन्हेगार ठार; सोलापूर जिल्ह्यातील घटना
4
मोठा दिलासा! आधार मोफत अपडेट करण्याची शेवटची संधी? UIDAI ने तारीख बदलली!
5
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
6
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सात जणांचा मृत्यू, महाराष्ट्रातील भाविकांचा समावेश
7
सुनेची काळजी घेण्यासाठी निघालेल्या यास्मिन; तीन दिवस प्रवास पुढे ढकलला, विमान अपघातात मृत्यू
8
Navi Mumbai: नवी मुंबई विमानतळावर लँडिंग करण्याआधी वैमानिकांसमोर २२५ अडथळे!
9
वाशिमच्या मेडशी बायपासवर भीषण अपघात; दोन ठार, एक जखमी, दोघे थोडक्यात बचावले
10
लव जिहादच्या आरोपावर आमिर खानने दिलं उत्तर, म्हणाला, "माझ्या दोन्ही बहिणी अन् मुलीने..."
11
इस्रायलचा इराणवर 'वार'! तेहरानमधील संरक्षण मंत्रालयाची इमारत, अणु मुख्यालय उद्ध्वस्त
12
Thane: मुंब्रा-शीळ भागात आणखी ८ इमारती जमीनदोस्त!
13
हायकू हायकू हायकू... म्हणजेच...; पुस्तकाच्या जन्माची गोष्ट!
14
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
15
"मी एकावेळी ४-४ सिनेमे केले नाही...", दीपिकाच्या ८ तास शिफ्ट मागणीवर काजोलची प्रतिक्रिया
16
Maharashtra Govt: महावितरणची सौरऊर्जेत ३० हजार कोटींची गुंतवणूक!
17
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
18
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
19
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
20
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक

उन्हाळ्यात ३८० समर स्पेशल ट्रेन; गेल्या वर्षीच्या तुलनेत ३२ जास्त गाड्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2023 21:27 IST

Nagpur News विविध रेल्वेगाड्यात प्रवाशांची होत असलेली गर्दी लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाने देशभरातील विविध प्रांतात एकूण ३८० समर स्पेशल (उन्हाळी विशेष रेल्वे) गाड्या चालविण्यात येणार असल्याचे म्हटले आहे.

नागपूर : विविध रेल्वेगाड्यात प्रवाशांची होत असलेली गर्दी लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाने देशभरातील विविध प्रांतात एकूण ३८० समर स्पेशल (उन्हाळी विशेष रेल्वे) गाड्या चालविण्यात येणार असल्याचे म्हटले आहे. स्थानिक अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार, या ३८० रेल्वेगाड्या जून अखेरपर्यंत देशातील विविध रेल्वे मार्गावर एकूण ६,३६९ फेऱ्या लावणार (धावणार) आहे.

गेल्या वर्षी उन्हाळ्यात ३४८ रेल्वेगाड्या चालविण्यात आल्या होत्या आणि या गाड्यांनी ४,५९९ फेऱ्या लावल्या होत्या. यावर्षी ३२ रेल्वेगाड्या १७७० फेऱ्या जास्त लावणार आहेत.उन्हाळा संपायला अजून जवळपास २० ते २५ दिवस शिल्लक आहेत. सध्याच्या स्थितीत रेल्वेच्या प्रत्येक गाडीत प्रवाशांची मोठी गर्दी झाली आहे. त्यात विविध मार्गावर रेल्वेस्थानक तसेच रेल्वेलाईनसह विविध विकास कामं सुरू असल्याने ठिकठिकाणच्या मार्गावर अनेक गाड्या तासं-न-तास उशिरा धावत आहे. त्यामुळे प्रवाशांची मोठी कुचंबना होत आहे. प्रवाशांचा रोष लक्षात घेता रेल्वे प्रशासनाने गेल्या वर्षीच्या तुलनेत ३२ रेल्वेगाड्या जास्त चालविण्याचे जाहिर केले आहे. या विशेष रेल्वे गाड्यांमुळे महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगाना, ओडीशा, पश्चिम बंगाल, बिहार, उत्तर प्रदेश, दिल्ली सोबत कनेक्टिव्हिटी वाढेल तसेच या राज्यातील प्रवाशांना त्याचा अधिक फायदा होणार असल्याचा दावा केला आहे.

नागपुरातून चार गाड्या

विशेष म्हणजे, नागपूर ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते नागपूर या दोन गाड्या, तर अजनी (नागपूर) ते पूणे आणि पुणे ते नागपूर या दोन अशा एकूण चार रेल्वेगाड्या समर स्पेशल म्हणून मार्च २०२३ पासून मे २०२३ पर्यंतच्या दोन महिन्याच्या कालावधीत रेल्वे प्रशासनाने सुरू केल्या आहेत. मुंबईला जाणारी गाडी ३ जूनपर्यंत तर, पुण्याच्या प्रवासाला असलेली गाडी १५ जूनपर्यंत धावणार आहे.

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वे