शहरं
Join us  
Trending Stories
1
माल चाहिए क्या? ...वाला? विचारल्यानंतर ' ठेवून घ्या' असे खेवलकर यांनी दिले होते होकारार्थी उत्तर
2
IND vs ENG : 'ती' साथ देणार अशा परिस्थितीत त्यानं विश्रांती घेतली; सोशल मीडियावर बुमराह झाला ट्रोल
3
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी भाजपची रणनीती! माजी खासदार-आमदारांवर सोपवली मोठी जबाबदारी
4
आमदाराच्या कारची दुचाकीला धडक, रेल्वे पुलावरून खाली कोसळून तरुणाचा मृत्यू, मृत तरुण भाजपा नेत्याचा भाऊ  
5
कृषीखातं पुन्हा धनंजय मुंडेंकडे? सह्याद्री अतिथीगृहावर भेटीगाठींना वेग!
6
निवडणूक जिंकणं कठीण की पत्नीचं मन? राघव चड्डांनी दिलं असं उत्तर, परिणीतीही झाली अवाक्
7
बांगलादेशी मॉडेलला भारतात अटक! पोलिसांनी राहत्या घरावर टाकली धाड अन् आत जे सापडलं...
8
Nashik Dengue News: नाशकात डेंग्यूचा उद्रेक! एका महिन्यात रुग्णांची संख्या तिप्पट, कारण काय?
9
महादेव मुंडे हत्या प्रकरणाचा तपास एसआयटीकडे; कुटुंबाच्या भेटीनंतर मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले आदेश
10
अशी ही 'अदलाबदली'! कोकाटेंचा 'पत्ता' कापणार नाहीत, पण खातं बदलणार; दत्तात्रय भरणे होणार कृषिमंत्री - सूत्र
11
'भारताची अर्थव्यवस्था मृतावस्थेत', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेला राहुल गांधींचे समर्थन, म्हणाले...
12
भयंकर! एम्समधील नर्सच्या दोन मुलांना घरात घुसून जिवंत जाळले, आईचा आक्रोश
13
चीनने पाकिस्तानला भेट दिली रस्त्यावरून धावणारी मेट्रो, रुळांची गरजच नाही, अशी आहेत आणखी वैशिष्ट्ये
14
IND vs ENG : कमनशिबी कॅप्टन! किंग कोहलीनंतर टीम इंडियातील प्रिन्स शुबमन गिलवर आली ही वेळ
15
भारताचा विकास रोखण्याचा प्रयत्न; ट्रम्प यांनी भारतीय कंपन्यांवर लादलेल्या निर्बंधांमुळे इराण संतापला
16
अर्ध वर्षं संपलं, पण अर्धं तर बाकी आहे! 'या' सवयी बदला- डिसेंबर २०२५ पर्यंत बदलेल जगणं
17
'आयुष्मान भारत योजना फसवी' मुंबईतील महिलेची सरकारी योजनेवर टीका, सांगितला धक्कादायक अनुभव
18
लोकमत इम्पॅक्ट: गणेश मंडळांना मोठा दिलासा, मंडपासाठीच्या खड्ड्यांचा दंड १५ हजारावरुन २ हजारावर  
19
मालेगाव बॉम्ब स्फोट: "तपास यंत्रणा शंकेपलीकडे आरोप सिद्ध करू शकत नसतील, तर..."; खासदार देसाई काय बोलले?
20
August Horoscope 2025: ऑगस्टमध्ये 'या' ६ राशींच्या वाट्याला येणार राजसी थाट; बाकी राशींचे काय?

उन्हाळ्यात ३८० समर स्पेशल ट्रेन; गेल्या वर्षीच्या तुलनेत ३२ जास्त गाड्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2023 21:27 IST

Nagpur News विविध रेल्वेगाड्यात प्रवाशांची होत असलेली गर्दी लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाने देशभरातील विविध प्रांतात एकूण ३८० समर स्पेशल (उन्हाळी विशेष रेल्वे) गाड्या चालविण्यात येणार असल्याचे म्हटले आहे.

नागपूर : विविध रेल्वेगाड्यात प्रवाशांची होत असलेली गर्दी लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाने देशभरातील विविध प्रांतात एकूण ३८० समर स्पेशल (उन्हाळी विशेष रेल्वे) गाड्या चालविण्यात येणार असल्याचे म्हटले आहे. स्थानिक अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार, या ३८० रेल्वेगाड्या जून अखेरपर्यंत देशातील विविध रेल्वे मार्गावर एकूण ६,३६९ फेऱ्या लावणार (धावणार) आहे.

गेल्या वर्षी उन्हाळ्यात ३४८ रेल्वेगाड्या चालविण्यात आल्या होत्या आणि या गाड्यांनी ४,५९९ फेऱ्या लावल्या होत्या. यावर्षी ३२ रेल्वेगाड्या १७७० फेऱ्या जास्त लावणार आहेत.उन्हाळा संपायला अजून जवळपास २० ते २५ दिवस शिल्लक आहेत. सध्याच्या स्थितीत रेल्वेच्या प्रत्येक गाडीत प्रवाशांची मोठी गर्दी झाली आहे. त्यात विविध मार्गावर रेल्वेस्थानक तसेच रेल्वेलाईनसह विविध विकास कामं सुरू असल्याने ठिकठिकाणच्या मार्गावर अनेक गाड्या तासं-न-तास उशिरा धावत आहे. त्यामुळे प्रवाशांची मोठी कुचंबना होत आहे. प्रवाशांचा रोष लक्षात घेता रेल्वे प्रशासनाने गेल्या वर्षीच्या तुलनेत ३२ रेल्वेगाड्या जास्त चालविण्याचे जाहिर केले आहे. या विशेष रेल्वे गाड्यांमुळे महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगाना, ओडीशा, पश्चिम बंगाल, बिहार, उत्तर प्रदेश, दिल्ली सोबत कनेक्टिव्हिटी वाढेल तसेच या राज्यातील प्रवाशांना त्याचा अधिक फायदा होणार असल्याचा दावा केला आहे.

नागपुरातून चार गाड्या

विशेष म्हणजे, नागपूर ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते नागपूर या दोन गाड्या, तर अजनी (नागपूर) ते पूणे आणि पुणे ते नागपूर या दोन अशा एकूण चार रेल्वेगाड्या समर स्पेशल म्हणून मार्च २०२३ पासून मे २०२३ पर्यंतच्या दोन महिन्याच्या कालावधीत रेल्वे प्रशासनाने सुरू केल्या आहेत. मुंबईला जाणारी गाडी ३ जूनपर्यंत तर, पुण्याच्या प्रवासाला असलेली गाडी १५ जूनपर्यंत धावणार आहे.

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वे