शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

उन्हाळ्यात ३८० समर स्पेशल ट्रेन; गेल्या वर्षीच्या तुलनेत ३२ जास्त गाड्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2023 21:27 IST

Nagpur News विविध रेल्वेगाड्यात प्रवाशांची होत असलेली गर्दी लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाने देशभरातील विविध प्रांतात एकूण ३८० समर स्पेशल (उन्हाळी विशेष रेल्वे) गाड्या चालविण्यात येणार असल्याचे म्हटले आहे.

नागपूर : विविध रेल्वेगाड्यात प्रवाशांची होत असलेली गर्दी लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाने देशभरातील विविध प्रांतात एकूण ३८० समर स्पेशल (उन्हाळी विशेष रेल्वे) गाड्या चालविण्यात येणार असल्याचे म्हटले आहे. स्थानिक अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार, या ३८० रेल्वेगाड्या जून अखेरपर्यंत देशातील विविध रेल्वे मार्गावर एकूण ६,३६९ फेऱ्या लावणार (धावणार) आहे.

गेल्या वर्षी उन्हाळ्यात ३४८ रेल्वेगाड्या चालविण्यात आल्या होत्या आणि या गाड्यांनी ४,५९९ फेऱ्या लावल्या होत्या. यावर्षी ३२ रेल्वेगाड्या १७७० फेऱ्या जास्त लावणार आहेत.उन्हाळा संपायला अजून जवळपास २० ते २५ दिवस शिल्लक आहेत. सध्याच्या स्थितीत रेल्वेच्या प्रत्येक गाडीत प्रवाशांची मोठी गर्दी झाली आहे. त्यात विविध मार्गावर रेल्वेस्थानक तसेच रेल्वेलाईनसह विविध विकास कामं सुरू असल्याने ठिकठिकाणच्या मार्गावर अनेक गाड्या तासं-न-तास उशिरा धावत आहे. त्यामुळे प्रवाशांची मोठी कुचंबना होत आहे. प्रवाशांचा रोष लक्षात घेता रेल्वे प्रशासनाने गेल्या वर्षीच्या तुलनेत ३२ रेल्वेगाड्या जास्त चालविण्याचे जाहिर केले आहे. या विशेष रेल्वे गाड्यांमुळे महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगाना, ओडीशा, पश्चिम बंगाल, बिहार, उत्तर प्रदेश, दिल्ली सोबत कनेक्टिव्हिटी वाढेल तसेच या राज्यातील प्रवाशांना त्याचा अधिक फायदा होणार असल्याचा दावा केला आहे.

नागपुरातून चार गाड्या

विशेष म्हणजे, नागपूर ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते नागपूर या दोन गाड्या, तर अजनी (नागपूर) ते पूणे आणि पुणे ते नागपूर या दोन अशा एकूण चार रेल्वेगाड्या समर स्पेशल म्हणून मार्च २०२३ पासून मे २०२३ पर्यंतच्या दोन महिन्याच्या कालावधीत रेल्वे प्रशासनाने सुरू केल्या आहेत. मुंबईला जाणारी गाडी ३ जूनपर्यंत तर, पुण्याच्या प्रवासाला असलेली गाडी १५ जूनपर्यंत धावणार आहे.

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वे