शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

नागपूर जिल्ह्यातील ३८ ग्रामपंचायतींनी केला १०.२६ लाखाचा वीज भरणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2018 22:36 IST

पथदिव्यांच्या वीजबिलांची थकबाकी असलेल्या ग्रामपंचायींसह सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांनी त्यांच्या स्वनिधीतून अथवा १४ व्या वित्त आयोग किंवा इतर निधीतून या थकबाकीचा भरणा करण्याच्या सूचना महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागातर्फे राज्यभरातील सर्व जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांना करण्यात आल्या होत्या, त्यास प्रतिसाद देत जिल्ह्यातील ३८ ग्रामपंचायतींनी १० लाख २६ हजाराचा भरणा करीत होणारी गैरसोय टाळली आहे.

ठळक मुद्देपथदिव्यांचे थकीत वीजबिल : आवाहनाला प्रतिसाद

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : पथदिव्यांच्या वीजबिलांची थकबाकी असलेल्या ग्रामपंचायींसह सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांनी त्यांच्या स्वनिधीतून अथवा १४ व्या वित्त आयोग किंवा इतर निधीतून या थकबाकीचा भरणा करण्याच्या सूचना महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागातर्फे राज्यभरातील सर्व जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांना करण्यात आल्या होत्या, त्यास प्रतिसाद देत जिल्ह्यातील ३८ ग्रामपंचायतींनी १० लाख २६ हजाराचा भरणा करीत होणारी गैरसोय टाळली आहे.ग्रामविकास विभागातर्फे २८ फेब्रुवारी २०१८ रोजी राज्यातील सर्व जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांना अति-तात्काळ असा शेरा असलेल्या पत्रात सदर सूचना करण्यात आली होती. संपूर्ण राज्यात ग्रामपंचायत आणि नगर पंचायतींकडे पथदिव्यांच्या वीजबिलापोटी मोठ्या प्रमाणात थकबाकी असून ही थकबाकी वसूल करण्यासाठी महावितरण कधीही या पथदिव्यांच्या वीजपुरवठा खंडित करु शकते, अशी शक्यता वर्तविली होती, यामुळे होणारी गैरसोय टाळण्यासाठी सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांनी त्यांच्या स्वनिधीतून अथवा १४ व्या वित्त आयोग किंवा इतर निधीतून या थकबाकीचा भरणा करण्याच्या सूचना या पत्रात करण्यात आल्या होत्या. या पत्राला सकारात्मक प्रतिसाद देत नागपूर जिल्ह्यातील ३८ ग्रामपंचायतींनी १० लाख २६ हजाराचा भरणा करीत होणारी गैरसोय टाळली आहे. यात मौदा विभागातील सर्वाधिक ग्रामपंचायतींचा समावेश आहेग्रामविकास विभागापाठोपाठ सावनेर पंचायत समितीनेही सावनेर तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतींना पत्र देत ग्रामपंचायत हद्दीतील सर्व पथदिव्यांवरील पथदिव्यांच्या वीजबिलापोटी असलेल्या थकबाकीचा भरणा येत्या दोन दिवसात करून त्याचा अहवाल व वीज देयके येत्या २३ मार्च रोजी होणाऱ्या बैठकीत सादर करण्याच्या सूचना केल्या आहेत. थकबाकीचा भरणा न झाल्याने महावितरणने वीजपुरवठा खंडित केल्यास त्याची संपूर्ण जवाबदारी संबंधित ग्रामपंचायतीच्या सचिवांची राहील, असेही या पत्रात स्पष्ट केले आहे.

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतmahavitaranमहावितरण