शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशात माणसांची किंमत नाही, रेल्वेमंत्र्यांनी तिथं जाऊन ..."; मुंबई लोकल दुर्घटनेवर राज ठाकरे संतापले
2
२४ तासांत असे काय घडले की सोनम लगेच सरेंडर करायला आली? तिच्या साथीदारांची एक चूक...
3
सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
4
Vat Purnima 2025: कशी करावी वटपौर्णिमेच्या पूजेची तयारी? जाणून घ्या साहित्य, विधी आणि शुभ मुहूर्त!
5
राजा रघुवंशी हत्येप्रकरणात नवा ट्विस्ट...! सोनमचा मोठा दावा, स्वतःला सांगतेय निर्दोष; अशी पोहोचली गाझीपूरला
6
मुंब्रा ट्रेन अपघातावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले- "रोज सकाळी हजारो प्रवासी..."
7
Viral Video : मुलीला इम्प्रेस करायला गेला अन् पचका झाला! तरुणाचा व्हिडीओ बघून तुम्हीही म्हणाल अरेरे..
8
३००० गाड्या वाहून नेणाऱ्या जहाजाला भीषण आग! ७५० इलेक्ट्रिक कार धोक्यात; आगीचं नेमकं कारण काय?
9
Sonam Raghuvanshi : नेपाळला पळून जाण्याचा होता सोनमचा प्लॅन?, कोणीही ओळखू नये म्हणून 'अशी' लढवली शक्कल
10
ज्योतिष्याची 'ती' भविष्यवाणी खरी ठरली; राजा-सोनम लग्नाआधी अन् नंतर काय घडले?
11
"मोदी सरकार उत्सव करत असताना लोक रेल्वेतून पडून मेली" मुंब्रातील घटनेवरून राहुल गांधी बरसले
12
'छावा'नंतर महाराष्ट्रातील 'या' तमाशा कलावंतावर लक्ष्मण उतेकर बनवणार सिनेमा? श्रद्धा कपूर साकारणार भूमिका
13
Vat Purnima 2025 Wishes: वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा! जोडीदाराला पाठवा आणि स्टेटसला ठेवा 'हे' प्रेमळ संदेश
14
Mumbra Train Accident: लोकल ट्रेनमधून पडले, किडे-मुंग्यांसारखा गेला जीव, मृत्यू झालेले कोण? नावे आली समोर
15
'रेल्वे मंत्री आहेत की रील मंत्री?' मुंबई रेल्वे दुर्घटनेवरून आदित्य ठाकरेंची केंद्रावर टीका
16
मुंबईला जाणाऱ्या मालवाहू जहाजात स्फोट, ५० कंटेनर समुद्रात पडले; ४ कर्मचारी बेपत्ता
17
ना युक्रेन, ना ब्रिटन, 'हा' देश रशियाचा शत्रू नंबर वन; हिटलरशी आहे थेट कनेक्शन, कारण...
18
भारताच्या कंपन्यांवर टाळं लावण्याच्या प्रयत्नात पाकिस्तानचा मित्र चीन! आपली काय आहे तयारी?
19
परप्रातांमधून मुंबईत आदळणारे लोंढेच जबाबदार; मुंबईत मुंब्रा घटनेवरून राज ठाकरेंचा संताप
20
Sonam Raghuvanshi : राजा रघुवंशीची हत्या करणारे हेच ते; आरोपींचे फोटो आले समोर, सोनमसोबत रचला भयंकर कट

कोरोना लॉकडाऊन; मलेशियात अडकले नागपूरचे ३७ विद्यार्थी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2020 20:28 IST

नागपूरच्या तिरपुडे कॉलेज ऑफ हॉटेल मॅनेजमेन्टचे विद्यार्थी केके कॅरिअर सोल्युशन्स या कन्स्टलटन्सिमार्फत मलेशियात सहा महिन्याच्या विशेष प्रशिक्षणासाठी २९ फेब्रुवारीला मलेशियात पोहोचले.

ठळक मुद्देहॉटेल मॅनेजमेन्टची ट्रेनिंग रखडली पीएमओ, सीएमओकडे मदतीची विनंती

प्रवीण खापरे /लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोरोनाच्या प्रकोपामुळे सारे जगच स्तब्ध झाले आहे. प्रत्येक देश आपापल्या समस्या निस्तारण्यात व्यस्त आहे आणि नागरिकांना सुरक्षित ठेवण्याचे युद्धपातळीवर प्रयत्न करत आहेत. भारतही आपल्या नागरिकांना जगाच्या कानाकोपऱ्यातून धुंडाळून मायदेशी परत आणत आहे. आतापर्यंट चिन, इटली आणि अन्य देशांत अडकलेल्या नागरिकांना यशस्वरित्या परत आणले गेले आहे. त्याच पार्श्वभूमीवर शिक्षणाच्या निमित्ताने मलेशियात गेलेले नागपूरचे ३७ विद्यार्थी भारत सरकार व महाराष्ट्र शासनाकडे चातकासारखे डोळे लावून बसले आहेत.साधारणत: नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये कोरोनाचा पहिला रुग्ण चीनच्या वुहानमध्ये आढळला आणि म्हणता म्हणता चार महिन्यात या विषाणूने अवघ्या जगाला विळखा घातला आहे. जगभरात दहा लाखाच्या वर नागरिक या विषाणूने बाधित झाले असून, ७० हजाराच्या जवळपास रुग्ण दगावलेही आहेत. भारतातही कोरोना बाधितांचा व मृतांचा आकडा वाढत आहे. याच भयावह स्थितीत नागपुरातून मलेशियाम हॉटेल मॅनेजमेण्टच्या विशेष प्रशिक्षणासाठी गेलेले विद्यार्थी येणारा प्रत्येक दिवस काढत आहेत. नागपूरच्या तिरपुडे कॉलेज ऑफ हॉटेल मॅनेजमेन्टचे विद्यार्थी केके कॅरिअर सोल्युशन्स या कन्स्टलटन्सिमार्फत मलेशियात सहा महिन्याच्या विशेष प्रशिक्षणासाठी २९ फेब्रुवारीला मलेशियात पोहोचले. तोवर सबंध जगभरात कोरोनाने थैमान घातला होता. तेथे पोहोचताच प्रशिक्षणाचे सत्र सुरू होणार तोच मलेशियात आणीबाणीची परिस्थिती निर्माण झाली. मलेशिया हे जगभरात पर्यटनासाठी ओळखले जाते. येथे जगभरातून लाखोच्या संख्येने पर्यटक येत असतात. त्यामुळे, येथे संसर्गाचा धोका मोठा होता. त्याच कारणाने नागरिकांना वाचविण्यासाठी इतर देशांप्रमाणेच १८ मार्च पासून ‘लॉकडाऊन’ पुकारण्यात आला. त्यामुळे इतर औद्योगिक, व्यावसायिक क्षेत्रासोबतच सर्व शैक्षणिक क्षेत्र कुलुपबंद करण्यात आले. याच लॉकडाऊनमध्ये नागपूरचे हे विद्यार्थी इपोह आणि पेनॉन्ग आईजलॅण्ड येथे वेगवेगळ्या फ्लॅटमध्ये अडकले आहेत. हे सर्व विद्यार्थी दहा-दहाच्या संख्येत वेगवेगळ्या फ्लॅटमध्ये एकत्र राहत आहेत. अशा स्थितीत त्यांना दैनिक गरजांची पुर्तता करण्यासाठीही भांडावे लागत आहे. लॉकडाऊनमुळे कुणालाच बाहेर पडता येत नाही आणि गरजेच्या वस्तू घेण्यासाठी एकालाच बाहेर पडावे लागत आहे. शिवाय वस्तू घेण्यासाठी फार लांबचा प्रवासही करावा लागत असल्याने, चिंतेत भर पडत आहे. विशेष म्हणजे हे सगळे विद्यार्थी शिक्षण आणि इतर निवडक खर्च घेऊन मलेशियात दाखल झाले होते. आता तो पैसाही संपत आल्याने पुढचे दिवस कसे निघतील आणि लॉकडाऊन आणखी वाढण्याची शक्यता असल्याने येणारे संकट कसे निस्तरावे असा प्रश्न त्यांच्यापुढे निर्माण झाला आहे. याबाबत या विद्यार्थ्यांनी पंतप्रधान कार्यालय (पीएमओ) आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री कार्यालय (सीएमओ) शी संकेतस्थळावरून मदतीची याचना केली आहे. शिवाय एक व्हीडीओ बनवून तो सर्वत्र प्रसारितही करण्यात आला आहे. मात्र, अद्याप कोणतेही उत्तर मिळाले नसल्याने, हे विद्यार्थी घाबलेल्या अवस्थेत आहेत. या विद्यार्थ्यांची सुखरूप सुटका होण्यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडून विशेष प्रयत्न होण्याची भावनाही विद्यार्थ्यांनी व्यक्त केली आहे.इथे आम्ही सगळेच बेवारस!- आम्ही आता सगळेच विवंचनेत आहोत. बाहेर पडता येत नाही. गरजेचे साहित्य घेण्यासाठी एकालाच बाहेर पडावे लागते आणि तेही फार लांब आहे. या सगळ्या महामारित कुणाला आरोग्याची समस्या झाली तर आमच्याकडे लक्ष देणारे कुणीच नाही. आमचे येथे कुणीच नाही. आम्ही सगळेच बेवारस आहोत. ज्या प्रमाणे भारत सरकारने इटली, चिन येथून आपले नागरिक विशेष विमाननाने आणले तशीच मदत आम्हालाही हवी आहे. येथील लॉकडाऊन आणखी किती दिवस वाढणार, याची माहिती नाही. अशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आम्हाला मदत करावी, अशी भावना विद्यार्थ्यांपैकी एक राज मौर्य याने व्यक्त केली आहे.

टॅग्स :Studentविद्यार्थी