शहरं
Join us  
Trending Stories
1
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
2
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
3
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
4
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
5
मुंबई, पुणेच नाही...! छोट्या शहरांतही विवाहबाह्य संबंध वाढू लागले, ही पाच कारणे हादरवून टाकतील...
6
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
7
BEL-बजाज फायनान्ससह 'या' शेअर्समध्ये तेजी! पण, टाटांच्या कंपनीचा स्टॉक आपटला, कुठे किती वाढ?
8
Pitru Paksha 2025: घरात पितरांचे फोटो आहेत, पण दिशा चुकीची असेल तर कसा जाईल वास्तुदोष?
9
मोठी बातमी! 'ती' खुर्ची कुणासाठी राखीव? राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या...
10
सिंह दरबार जाळून टाकला, आता कुठे बसणार नेपाळच्या नव्या पंतप्रधान? Gen-Z शोधताहेत नवी जागा!
11
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
12
२४-२२ कॅरेट सोडा, १८ कॅरेट सोन्याला सर्वाधिक मागणी! दागिन्यांसाठी सर्वोत्तम का मानले जाते?
13
नेपाळच्या लष्कर प्रमुखांनी भारतात प्रशिक्षण घेतले, देशाला एकसंघ ठेवण्याची आता त्यांच्यावर जबाबदारी
14
जबरदस्त कॅमेरा आणि दमदार बॅटरी, किंमत १० हजारांहून कमी; नव्या 5G फोनची सर्वत्र चर्चा!
15
“PM मोदींच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त ७५ ST बसस्थानकावर मोफत वाचनालय सुरू करणार”: सरनाईक
16
पृथ्वीवर ९ दिवस फिरत होत्या अज्ञात लहरी...; ग्रीनलँडची २०२३ ची ती घटना अन्...
17
भारतात पारडे पालटले! इन्स्टाने रील्समध्ये युट्यूबला मागे टाकले; मेटाने काय ट्रेडिंग असते ते जाहीर केले
18
२१ लाख लोक रस्त्यावर, आतापर्यंत ९०० जणांचा मृत्यू! पाकिस्तानात पुराचं थैमान 
19
वेफर्स अन् भुजिया बनवणारी कंपनीत हिस्सेदारीसाठी चुरस; पेप्सिको, आयटीसीसह अनेक कंपन्या शर्यतीत
20
शेअर बाजारातील नुकसानीपासून वाचण्याचा सॉलिड फंडा, नितीन कामथ यांनी सांगितली भन्नाट ट्रिक

विदर्भात स्वाईन फ्लूचे ३६१ रुग्ण : मृत्यूचा आकडा गेला ३९ वर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2019 00:34 IST

जानेवारी ते आतापर्यंत विदर्भात स्वाईन फ्लूचे ३६१ रुग्ण आढळून आले असून, मृत्यूचा आकडा ३९ वर गेला आहे.

ठळक मुद्दे नागपूर जिल्ह्यात २४८ रुग्णांची नोंद

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : जानेवारी ते आतापर्यंत विदर्भात स्वाईन फ्लूचे ३६१ रुग्ण आढळून आले असून, मृत्यूचा आकडा ३९ वर गेला आहे. विशेष म्हणजे, सर्वाधिक रुग्णांची नोंद नागपूर जिल्ह्यात झाली आहे. रुग्णांची संख्या २४८ वर पोहचली आहे. सध्या ढगाळ वातावरण असल्याने लोकांना सतर्क राहण्याचे व सर्दी, घशात खवखव आणि ताप असल्यास तत्काळ डॉक्टरांचा सल्ला घेण्याचे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.बदलत्या वातावरणाचा परिणाम शरीरावर होऊ लागला आहे. सर्दी, खोकला व तापाच्या रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. हीच लक्षणे स्वाईन फ्लूची आहेत. परंतु अनेक जण याला सुरुवातीलाच गंभीरतेने घेत नाही. जेव्हा आजाराची गुंतागुंत वाढते तेव्हाच रुग्ण डॉक्टरांकडे जातात. सध्या स्वाईन फ्लूचा जोर कमी असला तरी पाऊस लांबणार असल्याने सतर्क राहण्याचा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे.उपलब्ध माहितीनुसार, १ जानेवारी ते २० ऑगस्ट २०१९ पर्यंत नागपूर शहरात २२४, ग्रामीणमध्ये २४, वर्धा जिल्ह्यात पाच, गोंदिया जिल्हात पाच, भंडारा जिल्ह्यात चार, गडचिरोली जिल्ह्यात तीन, चंद्रपूर जिल्ह्यात १०, अमरावती जिल्ह्यात ३०, अकोला जिल्ह्यात चार, यवतमाळ जिल्ह्यात तीन, बुलडाणा जिल्ह्यात एका रुग्णाची नोंद झाली आहे. उल्लेखनीय म्हणजे, इतर राज्यातून नागपुरात उपचार घेतलेल्या रुग्णांची संख्या ४२ आहे. यात मध्य प्रदेशातील ४०, पश्चिम बंगालमधील एक व दिल्ली येथील एक रुग्ण आहे. जुलै महिन्यात एकाही रुग्णाची नोंद झालेली नाही. ऑगस्ट महिन्यात नागपुरात एका रुग्णाची नोंद झाली आहे. वातावरणातील बदलांमुळे स्वाईन फ्लू वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे.नागपूर जिल्ह्यात २५ मृत्यूगेल्या आठ महिन्यात नागपूर जिल्ह्यात स्वाईन फ्लूने २५ बळी घेतले आहे. यात नागपूर शहरातील २० तर ग्रामीण भागातील पाच आहेत. भंडारा जिल्ह्यात एक, चंद्रपूर जिल्ह्यात चार, अमरावती जिल्ह्यात सहा, यवतमाळ जिल्ह्यात एक, अकोल जिल्ह्यात एक, मुंबई जिल्ह्यात एक अशी एकूण ३९ मृत्यूची नोंद झाली आहे.

टॅग्स :Medicalवैद्यकीयDeathमृत्यू