शहरं
Join us  
Trending Stories
1
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
2
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
4
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
5
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
6
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
7
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
8
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
9
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
10
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
11
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
12
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
13
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
14
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
15
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
16
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
17
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
18
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."
19
नवरात्रीचा मुहूर्त? पंतप्रधान मोदी नव्या ठिकाणाहून कामकाज पाहणार; PMOचा पत्ता बदलणार
20
प्रसिद्धीचा मुद्दा, अजितदादांचा फडणवीसांकडे रोख;  म्हणाले, “जाहिरात करावी तर देवाभाऊंसारखी”

३२ वर्षे होऊनही सावित्रींच्या लेकींना मिळतो १ रुपयाच उपस्थिती भत्ता! पुरोगामी महाराष्ट्रात अशीही थट्टा

By गणेश हुड | Updated: December 7, 2023 17:02 IST

विद्यार्थीनींना उपस्थित  दिवसाकरिता प्रतिदिन १ रूपया  दैनिक भत्ता देण्याबाबतचा निर्णय राज्य शासनाच्या शिक्षण विभागाने १० जानेवारी १९९२ रोजी घेतला होता. मागील ३२ वर्षात यात छदामही वाढविलेला नाही.

नागपूर : मुलींची शाळेतील उपस्थिती  वाढावी यासाठी ३२ वर्षापूर्वी राज्य शासनाच्या शिक्षण  विभागाने  शाळेत उपस्थित विद्यार्थीनींना प्रतिदिन १ रुपया दैनिक भत्ता  सुरू केला होता. मात्र ३२ वर्षात भत्त्यात एक पैशाचीही वाढ झालेली नाही. मुलींना शिक्षण मिळावे, यासाठी महात्मा ज्योतिबा फुले  व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी चळवळ उभारली आणि मुलींना शिक्षणाचा हक्क मिळवून दिला. त्याच पुरोगामी म्हणवणाऱ्या महाराष्ट्रात राज्याच्या शिक्षण विभागाकडून सावित्रीच्या लेकींची  ही एक प्रकारे थट्टाच आहे.

राज्यात आर्थिक दुर्बल घटक, आदिवासी क्षेत्राबाहेरील अनुसूचित जाती जमाती, भटक्या जमाती अशा प्रवर्गातील  दारिद्रय रेषेखालील कुटूंबातील सावित्रीच्या लेकींना नियमित शाळेत येण्याची आवड निर्माण व्हावी, त्यांची गळती थांबावी यासाठी तीन दशकांपासून राज्य सरकारतर्फे प्रतिदिन एक रुपया प्रोत्साहन भत्ता दिला जातो. इयत्ता १ली ते ४ थी च्या विद्यार्थीनींची  शाळेतील उपस्थिती ७५ टक्केपेक्षा अधिक असेल अशा विद्यार्थीनींना उपस्थित  दिवसाकरिता प्रतिदिन १ रूपया  दैनिक भत्ता देण्याबाबतचा निर्णय राज्य शासनाच्या शिक्षण विभागाने १० जानेवारी १९९२ रोजी घेतला होता. मागील ३२ वर्षात यात छदामही वाढविलेला नाही.

मिळतात २२०  रुपये अन् बचत खात्यासाठी लागतात १००० रुपये

या योजनेअंतर्गत फार तर या विद्यार्थीनींना वर्षाला २०० ते २२०  रूपये मिळतात. परंतू विद्यार्थ्यांना कोणताही आर्थिक लाभ डीबीटी अंतर्गत देणे बंधनकारक असताना त्यांना राष्ट्रीयकृत बँकेत १ हजाररूपये गुंतवून बचत खाते काढणे अनिवार्य आहे. म्हणजे ४ वर्षात मिळणारा भत्ता फक्त बँकेचे बचत खाते उघडण्यातच खर्च होतो. त्यात या खात्यावर नियमित व्यवहार होत नसल्याने बँकेकडून शुल्ककपात करतात. ही तर शासनाची संवेदनशुन्यता.

३२  वर्षात महागाई वाढली. त्याप्रमाणात अधिकारी  कर्मचारी व लोकप्रतिधींच्या वेतन व भत्त्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली , परंतू ३२ वर्षात गरिब विद्यार्थीनींच्या भत्त्यात एका छदामाची वाढ केली नाही. ही  विद्यार्थीनींची थट्टाच म्हणावी लागेल. शासनाने या भत्त्यात वाढ करून प्रतिदिन २० रुपये एवढा भत्ता लागू करावा, असं जिल्हाध्यक्ष महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती नागपूरचे लीलाधर ठाकरे म्हणाले. 

टॅग्स :nagpurनागपूर