शहरं
Join us  
Trending Stories
1
BCCIचे अध्यक्ष बदलताच आगरकरच्या निवड समितीत मोठा बदल, दोन स्टार क्रिकेटर बनले 'सिलेक्टर्स'
2
OBC आंदोलने, पण कुठेत नाना पटोले; पदावरून दूर केल्याचा मूक निषेध की नव्या योजनेची तयारी? 
3
राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अपरिमित नुकसान, शरद पवार यांनी सरकारकडे केल्या पाच मागण्या
4
भारतावर राज्य करण्याचं स्वप्न, ५० लाख हल्लेखोरांची फौज, शेजारील देशात आखला जातोय भयानक कट 
5
“मातोश्रीवर हल्ल्याचा आणि राज ठाकरेंना मारायचा कट होता”; प्रदीप शर्मांनी सांगितला 'एन्काउंटर'चा थरार
6
IND vs PAK: पाकिस्तानची रडारड सुरूच! FINALआधी PCBची अर्शदीप सिंगबाबत ICCकडे तक्रार, कारण...
7
भीषण! रशियाचा युक्रेनवर मोठा हवाई हल्ला; ५९५ ड्रोन, ४८ क्षेपणास्त्रे डागली, इमारती उद्ध्वस्त
8
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर ठोस निर्णय घ्या, विशेष अधिवेशन बोलवा; जयंत पाटलांची सरकारकडे मागणी
9
तुमचा गॅस एजन्सीवाला चांगली सेवा देत नाही? मोबाईल सिमप्रमाणे आता LPG गॅस कंपनी बदला
10
“नवी मुंबईत सत्ता हे आनंद दिघेंचे स्वप्न, महायुतीचे आम्ही पाहू, तुम्ही फक्त...”: एकनाथ शिंदे
11
गर्दीवर दगडफेक, पोलिसांकडून लाठीमार, करूरमधील चेंगराचेंगरीबाबत विजयच्या पक्षाला वेगळाच संशय, केली अशी मागणी 
12
“आज-उद्याचा दिवस चिंताजनक, सरकार-प्रशासन अलर्ट”; CM फडणवीसांचे आढावा घेत महत्त्वाचे निर्देश
13
Triptii Dimri : "आयुष्यात रोमान्स करण्यासाठी..."; करोडपती बिझनेसमनच्या प्रेमात आहे अभिनेत्री, गुपचूप करतेय डेट?
14
आशिया कप २०२५ फायनल: क्रिकेटचा थरार, प्राईज मनी ५० टक्क्यांनी वाढविला, भारताला मिळणार एवढे कोटी...
15
हृदयद्रावक! फ्लॅटमध्ये आग, अभिनेत्रीच्या दोन्ही मुलांचा गुदमरून मृत्यू; बाल कलाकाराने गमावला जीव
16
दुर्गा पूजा ते दिवाळी! ऑक्टोबरमध्ये बँकांना २१ दिवस सुट्टी! 'ही' यादी तपासूनच कामाचे नियोजन करा
17
मराठवाडा, सोलापूर येथील परिस्थिती कायम; धरणांतील विसर्ग वाढला, हजारो नागरिक सुरक्षितस्थळी
18
Tamilnadu Stampede : “आता कोणाला नवरदेव बनवू?”, चेंगराचेंगरीत लेकाचा मृत्यू; आईचा टाहो, पुढच्या महिन्यांत होतं लग्न
19
"सरकार मायबाप… आता कसं जगायचं?", अतिवृष्टीने हिरवी स्वप्नं चुराडली; राहेरीतील शेतकऱ्यांचा हंबरडा
20
प्रणितकडे इशारा करत वरुण धवन म्हणाला, 'इसने मेरा भी मजाक उडाया है!', कॉमेडियन म्हणतो...

३२ लाखांच्या कचराकुंड्या अडगळीत

By admin | Updated: September 28, 2016 03:23 IST

विरोधकांच्या विरोधाला न जुमानता अध्यक्षांनी ३२ लाख रुपयांच्या कचराकुंड्या परस्पर खरेदी केल्या होत्या.

जि.प.त झाला होता वाद : तर कशी होणार स्वच्छता मोहीम ?नागपूर : विरोधकांच्या विरोधाला न जुमानता अध्यक्षांनी ३२ लाख रुपयांच्या कचराकुंड्या परस्पर खरेदी केल्या होत्या. त्यामुळे विरोधकांनी कचराकुंडी खरेदीत अध्यक्षांनी भ्रष्टाचार केल्याचा आरोप केला होता. जि.प.ची सर्वसाधारण सभाही कचराकुंडीमुळे वादग्रस्त ठरली होती. अशातही अध्यक्षांनी कचराकुंड्या खरेदी केल्या. मात्र या कचराकुंड्या अद्यापही उपयोगात आल्या नाही. पंचायत समित्यांमध्ये या कचराकुंड्या अडगळीत पडल्या आहेत. नागपूर जिल्हा परिषदेने १४ व्या वित्त आयोगाच्या निधीच्या व्याजातून ३२ लाख रुपयांच्या कचराकुंड्या खरेदी केल्या होत्या. लोकसेवेच्या कामासाठी या निधीचे सर्व सदस्यांना समप्रमाणात वाटप व्हावे अशी सदस्यांची मागणी होती. परंतु अध्यक्षांनी कचराकुंडी खरेदीचा विषय सभेत चर्चेत न आणता, परस्पर कचराकुंडीची खरेदी केली होती. त्यामुळे विरोधकांनी अध्यक्षांना कचराकुंडीवरून चांगलेच धारेवर धरले होते. अध्यक्षांनी विरोधकांना न जुमानता कचराकुंडी खरेदीला परस्पर मंजुरी देऊन ३२ लाखाच्या कचराकुंड्या खरेदी केल्या होत्या. या कचराकुंड्या पंचायत समिती स्तरावरून ग्रामपंचायतींना वाटप करण्यात येणार होत्या. कचराकुंडीच्या खरेदीला जवळपास चार महिन्यांचा कालावधी लोटला आहे. परंतु अनेक पंचायत समितींमध्ये या कचराकुंड्या अद्यापही पडून आहे. पंचायत समितीच्या स्तरावरून या कचराकुंड्या ग्रामपंचायतीला वाटप झालेल्या नाही. यासंदर्भात जि.प.च्या अध्यक्ष निशा सावरकर यांना विचारणा केली असता त्या म्हणाल्या की प्रत्येक सदस्यांना पाच कचराकुंड्या देण्यात येणार होत्या. सदस्यांची तर त्यापेक्षाही अधिक कचराकुंड्यांची मागणी होती. तरीही कचराकुंड्या कशा काय पंचायत समितीत अद्यापही पडून आहे, याची दखल नक्कीच घेण्यात येईल. स्थायी समितीच्या बैठकीत याचा आढावा घेण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)