शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर जिल्ह्यातील ३१.६६ टक्के पेरण्या आटोपल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2019 10:23 IST

जिल्ह्यात शेतकऱ्यांनी पेरणीला सुरुवात केली असून, आठवडाभरात ३१.६६ टक्के क्षेत्रावर पेरण्या झाल्याची आकडेवारी कृषी विभागाने सादर केली आहे.

ठळक मुद्देकापसाची पेरणी सर्वाधिकधानाच्या रोवणीला अद्यापही पावसाची प्रतीक्षा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : संपूर्ण जून महिना कोरडा गेल्यामुळे जिल्ह्यातील पेरण्या खोळबंल्या होत्या. जुलै महिना लागताच पावसाने जिल्ह्यात दमदार हजेरी लावली. पण अद्यापही पाऊस सरासरीपेक्षा ११ टक्के कमी पडला असला तरी, जिल्ह्यात शेतकऱ्यांनी पेरणीला सुरुवात केली असून, आठवडाभरात ३१.६६ टक्के क्षेत्रावर पेरण्या झाल्याची आकडेवारी कृषी विभागाने सादर केली आहे.जिल्ह्यात खरिपाचे नियोजन ५ लाख ७ हजार ६०० हेक्टरवर करण्यात आले आहे. यंदा जिल्ह्यात सर्वाधिक कापसाचे नियोजित क्षेत्र २ लाख २५ हजार हेक्टर आहे. तर सोयाबिनचे १ लाख हेक्टर व भाताचे ९४ हजार २०० हेक्टर इतके असे क्षेत्र आहे. यंदा पावसाचे आगमन उशिरा झाले. मागीलवर्षी काही शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागली होती. यातून धडा घेत शेतकºयांनी यंदा सावध भूमिका घेतली.पावसाचा अंदाज घेऊनच शेतकºयांनी पेरण्या केल्याने दुबार पेरणीची शक्यता कमी असल्याचे कृषी विभागाचे म्हणणे आहे. ४ जुलैपर्यंत जिल्ह्यात सरासरी साधारणत: २२४.९१ मि.मी. मीटर पाऊस पडत असतो. मात्र, यंदा १ जून ते ४ जुलैपर्यंत केवळ २००.२९ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. तो सरासरीपेक्षा ११ टक्क्यांनी कमी आहे.

पीकनिहाय पेरण्याआजवर जिल्ह्यात सर्वसाधारण क्षेत्राच्या ३१.६६ टक्के म्हणजेच १ लाख ५१ हजार ५६७ हेक्टरवर खरीपाच्या पेरण्या झाल्या आहेत. कापसाची १ लाख ९ हजार ४७२ हेक्टरवर पेरणी झाली आहे. तर सोयाबीन २३ हजार ६५३ हेक्टर, भुईमूग ५७ हेक्टरवर, तूर १७ हजार ८६४ हेक्टर, मूग २६ हेक्टर, उडीद ३० हेक्टर, ज्वारी १७६ हेक्टर आणि मक्याची पेरणी ३१४ हेक्टरवर झाली आहे. पाऊस सातत्याने बरसल्यास उर्वरित पेरण्या येत्या काही दिवसांत पूर्ण होतील, असा दावा कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी केला आहे

धानाची रोवणी पंधरवड्यानंतरजिल्ह्यात यंदा धानाचे ९४ हजार २०० हेक्टर एवढे नियोजित क्षेत्र आहे. जिल्ह्यातील मौदा, रामटेक, पारशिवनी, कामठी, कुही, उमरेड व भिवापूर या तालुक्यांमध्ये भाताची रोवणी केली जाते. मात्र, सध्या धानाची रोवणी करण्यायोग्य पाऊस झाला नसल्याने शेतकरी शेतात पºहे टाकण्याचे काम करीत आहे. त्यामुळे भात रोवणी ही पुढील पंधरवड्यानंतरच जिल्ह्यात सुरू होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

टॅग्स :agricultureशेती