शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
2
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
3
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
4
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
5
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
6
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
7
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
8
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
9
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
10
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
11
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
12
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट
13
IND vs ENG: गिल-राहुलची फलंदाजी अन् स्टोक्सची तंदुरूस्ती... 'या' ५ गोष्टी ठरवतील चौथ्या कसोटीचा निकाल
14
चातुर्मासातील पहिली श्रावण विनायक चतुर्थी: गणपती होईल प्रसन्न, कसे कराल व्रतपूजन? शुभच घडेल
15
पहिला श्रावणी सोमवार: ‘असे’ करा शिवपूजन, कोणती शिवामूठ वाहावी? पाहा, महत्त्व अन् मान्यता
16
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोना महामारीचा मेंदूवर भयंकर परिणाम, संसर्ग झाला नसला तरी...
17
प्राडाच्या वादानंतर कोल्हापुरी चप्पलांना QR कोड! संघटनेने का घेतला असा निर्णय? जाणून घ्या कोल्हापुरीचा इतिहास!
18
Pune Rave Party: "तुमच्या तर दिव्याखालीच अंधार"; चित्रा वाघांनी सुप्रिया सुळे, रोहिणी खडसेंना सुनावले
19
"पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विष्णूचे ११ वे अवतार, डोनाल्ड ट्रम्प त्यांना..."; भाजपा नेत्याचा मोठा दावा
20
आजारी लेकीला रुग्णालयात घेऊन चाललेले वडील, BMW ची धडक; मन हेलावून टाकणारी घटना

नागपूर जिल्ह्यातील ३१.६६ टक्के पेरण्या आटोपल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2019 10:23 IST

जिल्ह्यात शेतकऱ्यांनी पेरणीला सुरुवात केली असून, आठवडाभरात ३१.६६ टक्के क्षेत्रावर पेरण्या झाल्याची आकडेवारी कृषी विभागाने सादर केली आहे.

ठळक मुद्देकापसाची पेरणी सर्वाधिकधानाच्या रोवणीला अद्यापही पावसाची प्रतीक्षा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : संपूर्ण जून महिना कोरडा गेल्यामुळे जिल्ह्यातील पेरण्या खोळबंल्या होत्या. जुलै महिना लागताच पावसाने जिल्ह्यात दमदार हजेरी लावली. पण अद्यापही पाऊस सरासरीपेक्षा ११ टक्के कमी पडला असला तरी, जिल्ह्यात शेतकऱ्यांनी पेरणीला सुरुवात केली असून, आठवडाभरात ३१.६६ टक्के क्षेत्रावर पेरण्या झाल्याची आकडेवारी कृषी विभागाने सादर केली आहे.जिल्ह्यात खरिपाचे नियोजन ५ लाख ७ हजार ६०० हेक्टरवर करण्यात आले आहे. यंदा जिल्ह्यात सर्वाधिक कापसाचे नियोजित क्षेत्र २ लाख २५ हजार हेक्टर आहे. तर सोयाबिनचे १ लाख हेक्टर व भाताचे ९४ हजार २०० हेक्टर इतके असे क्षेत्र आहे. यंदा पावसाचे आगमन उशिरा झाले. मागीलवर्षी काही शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागली होती. यातून धडा घेत शेतकºयांनी यंदा सावध भूमिका घेतली.पावसाचा अंदाज घेऊनच शेतकºयांनी पेरण्या केल्याने दुबार पेरणीची शक्यता कमी असल्याचे कृषी विभागाचे म्हणणे आहे. ४ जुलैपर्यंत जिल्ह्यात सरासरी साधारणत: २२४.९१ मि.मी. मीटर पाऊस पडत असतो. मात्र, यंदा १ जून ते ४ जुलैपर्यंत केवळ २००.२९ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. तो सरासरीपेक्षा ११ टक्क्यांनी कमी आहे.

पीकनिहाय पेरण्याआजवर जिल्ह्यात सर्वसाधारण क्षेत्राच्या ३१.६६ टक्के म्हणजेच १ लाख ५१ हजार ५६७ हेक्टरवर खरीपाच्या पेरण्या झाल्या आहेत. कापसाची १ लाख ९ हजार ४७२ हेक्टरवर पेरणी झाली आहे. तर सोयाबीन २३ हजार ६५३ हेक्टर, भुईमूग ५७ हेक्टरवर, तूर १७ हजार ८६४ हेक्टर, मूग २६ हेक्टर, उडीद ३० हेक्टर, ज्वारी १७६ हेक्टर आणि मक्याची पेरणी ३१४ हेक्टरवर झाली आहे. पाऊस सातत्याने बरसल्यास उर्वरित पेरण्या येत्या काही दिवसांत पूर्ण होतील, असा दावा कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी केला आहे

धानाची रोवणी पंधरवड्यानंतरजिल्ह्यात यंदा धानाचे ९४ हजार २०० हेक्टर एवढे नियोजित क्षेत्र आहे. जिल्ह्यातील मौदा, रामटेक, पारशिवनी, कामठी, कुही, उमरेड व भिवापूर या तालुक्यांमध्ये भाताची रोवणी केली जाते. मात्र, सध्या धानाची रोवणी करण्यायोग्य पाऊस झाला नसल्याने शेतकरी शेतात पºहे टाकण्याचे काम करीत आहे. त्यामुळे भात रोवणी ही पुढील पंधरवड्यानंतरच जिल्ह्यात सुरू होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

टॅग्स :agricultureशेती