शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

१४ महिन्यांच्या भ्रमंतीत ३,०१७ किमीचा प्रवास : ‘त्या’ वाघाची रेडिओ कॉलर वनविभागाने काढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2020 21:53 IST

मागील १४ महिन्यात तब्बल ३,०१७ किलोमीटरचा प्रवास करून आपल्या अधिवासासाठी ज्ञानगंगा अभयारण्याचे क्षेत्र निवडणाऱ्या सी-१ या वाघाचे रेडिओ कॉलर वन विभागाने काढले आहे.

ठळक मुद्देज्ञानगंगा अभयारण्यात बस्तान : यापुढे कॅमेरा ट्रॅपने ठेवणार नजर

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मागील १४ महिन्यात तब्बल ३,०१७ किलोमीटरचा प्रवास करून आपल्या अधिवासासाठी ज्ञानगंगा अभयारण्याचे क्षेत्र निवडणाऱ्या सी-१ या वाघाचे रेडिओ कॉलर वन विभागाने काढले आहे. आता त्याचे अधिवास क्षेत्र निश्चित झाल्याने यापुढे त्याच्यावर कॅमेरा ट्रॅपने नजर ठेवली जाणार आहे.टिपेश्वर अभयारण्यातील सी-१ या वयात आलेल्या वाघाला फेब्रुवारी-२०१९ मध्ये रेडिओ कॉलर लावण्यात आले होते. तेव्हा तो टिपेश्वर अभयारण्यात होता. त्यानंतर जून -२०२० पर्यंत तो याच परिसरात होता. मात्र त्यानंतर त्याने स्वतंत्र अधिवासाचा शोध घेणे सुरू केले. आदिलाबाद, महाबळेश्वर, पुन्हा आदिलाबाद, पैनगंगा, इसापूर, वाशीम असा १४ महिन्याच्या काळात ३,०१७ किलोमीटर भ्रमंती करून आता तो ज्ञानगंगा अभयारण्यात स्थिरावला आहे.व्याघ्र अभ्यासकांच्या मते, त्याने हे क्षेत्र आपल्या सुरक्षित अधिवासासाठी निवडले आहे. या वाघाला रेडिओ कॉलर लावण्यात आले होते तेव्हा तो लहान होता, तसेच त्याचा अधिवास निश्चित व्हायचा होता. आता तो मोठा झाला असून अधिवासही निश्चित झाला आहे. यासंदर्भात प्रधान मुख्य संरक्षक (वन्यजीव) नितीन काकोडकर यांनी बुधवारी दुपारी माध्यमांसाठी एक व्हिडिओ संदेश जारी केला असून, त्यात या वाघाला लावलेले कॉलर काढल्याची माहिती दिली आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, वर्षभरापूर्वी त्याला लावलेल्या रेडिओ कॉलरची बॅटरीही आता संपण्याच्या बेतात आली होती. तसेच मानेभोवती लावलेले रेडिओ कॉलर वाढत्या वयात घट्ट होऊन भविष्यात त्याच्या मानेला इजा होण्याची शक्यता होती. त्यामुळे २८ मार्चला रिमोटच्या साह्याने त्याला लावलेले कॉलर काढण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.तब्बल १४ महिने ३,०१७ किलोमीटर फिरून एखाद्या वाघाने आपला अधिवास निश्चित करणे ही निसर्गाच्या दृष्टीने महत्त्वाची घटना आहे. या निमित्ताने आम्हा सर्वांसाठीच ही नवीन माहिती मिळाली आहे. नितीन काकोडकर, प्रधान मुख्य संरक्षक (वन्यजीव)अशा काढतात रेडिओ कॉलरवाघाला रेडिओ कॉलर लावताना पकडून व बेशुद्ध करून तो लावला जातो. मात्र काढताना त्याला पकडण्याची गरज नसते. वाघापासून १०० मीटर अंतरावर थांबून रिमोटच्या साह्याने ती काढली जाते. रिमोटची कळ दाबताच त्याच्या गळ्यातील पट्टा (कॉलर) निसटून खाली पडतो.

टॅग्स :Tigerवाघforest departmentवनविभाग