शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

१४ महिन्यांच्या भ्रमंतीत ३,०१७ किमीचा प्रवास : ‘त्या’ वाघाची रेडिओ कॉलर वनविभागाने काढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2020 21:53 IST

मागील १४ महिन्यात तब्बल ३,०१७ किलोमीटरचा प्रवास करून आपल्या अधिवासासाठी ज्ञानगंगा अभयारण्याचे क्षेत्र निवडणाऱ्या सी-१ या वाघाचे रेडिओ कॉलर वन विभागाने काढले आहे.

ठळक मुद्देज्ञानगंगा अभयारण्यात बस्तान : यापुढे कॅमेरा ट्रॅपने ठेवणार नजर

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मागील १४ महिन्यात तब्बल ३,०१७ किलोमीटरचा प्रवास करून आपल्या अधिवासासाठी ज्ञानगंगा अभयारण्याचे क्षेत्र निवडणाऱ्या सी-१ या वाघाचे रेडिओ कॉलर वन विभागाने काढले आहे. आता त्याचे अधिवास क्षेत्र निश्चित झाल्याने यापुढे त्याच्यावर कॅमेरा ट्रॅपने नजर ठेवली जाणार आहे.टिपेश्वर अभयारण्यातील सी-१ या वयात आलेल्या वाघाला फेब्रुवारी-२०१९ मध्ये रेडिओ कॉलर लावण्यात आले होते. तेव्हा तो टिपेश्वर अभयारण्यात होता. त्यानंतर जून -२०२० पर्यंत तो याच परिसरात होता. मात्र त्यानंतर त्याने स्वतंत्र अधिवासाचा शोध घेणे सुरू केले. आदिलाबाद, महाबळेश्वर, पुन्हा आदिलाबाद, पैनगंगा, इसापूर, वाशीम असा १४ महिन्याच्या काळात ३,०१७ किलोमीटर भ्रमंती करून आता तो ज्ञानगंगा अभयारण्यात स्थिरावला आहे.व्याघ्र अभ्यासकांच्या मते, त्याने हे क्षेत्र आपल्या सुरक्षित अधिवासासाठी निवडले आहे. या वाघाला रेडिओ कॉलर लावण्यात आले होते तेव्हा तो लहान होता, तसेच त्याचा अधिवास निश्चित व्हायचा होता. आता तो मोठा झाला असून अधिवासही निश्चित झाला आहे. यासंदर्भात प्रधान मुख्य संरक्षक (वन्यजीव) नितीन काकोडकर यांनी बुधवारी दुपारी माध्यमांसाठी एक व्हिडिओ संदेश जारी केला असून, त्यात या वाघाला लावलेले कॉलर काढल्याची माहिती दिली आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, वर्षभरापूर्वी त्याला लावलेल्या रेडिओ कॉलरची बॅटरीही आता संपण्याच्या बेतात आली होती. तसेच मानेभोवती लावलेले रेडिओ कॉलर वाढत्या वयात घट्ट होऊन भविष्यात त्याच्या मानेला इजा होण्याची शक्यता होती. त्यामुळे २८ मार्चला रिमोटच्या साह्याने त्याला लावलेले कॉलर काढण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.तब्बल १४ महिने ३,०१७ किलोमीटर फिरून एखाद्या वाघाने आपला अधिवास निश्चित करणे ही निसर्गाच्या दृष्टीने महत्त्वाची घटना आहे. या निमित्ताने आम्हा सर्वांसाठीच ही नवीन माहिती मिळाली आहे. नितीन काकोडकर, प्रधान मुख्य संरक्षक (वन्यजीव)अशा काढतात रेडिओ कॉलरवाघाला रेडिओ कॉलर लावताना पकडून व बेशुद्ध करून तो लावला जातो. मात्र काढताना त्याला पकडण्याची गरज नसते. वाघापासून १०० मीटर अंतरावर थांबून रिमोटच्या साह्याने ती काढली जाते. रिमोटची कळ दाबताच त्याच्या गळ्यातील पट्टा (कॉलर) निसटून खाली पडतो.

टॅग्स :Tigerवाघforest departmentवनविभाग