शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीत काँग्रेस-राजदला किती जागा मिळणार?; PM नरेंद्र मोदींची 'भविष्यवाणी'
2
विदर्भाला बसला ‘माेंथा’ चक्रीवादळाचा फटका ! पुढचे तीन दिवस अवकाळीचे संकट ; नोव्हेंबरपर्यंत जोर राहणार कायम?
3
शिवरायांच्या गडकिल्ल्यांवर मोदींच्या नावाने उघडणार 'नमो पर्यटन केंद्र'; राज ठाकरेंचा तीव्र विरोध
4
महाराष्ट्रातला मोर्चा दणदणीत झाला पाहिजे, राज ठाकरेंचं आवाहन; मतचोरीवरून मेळाव्यात केले सादरीकरण
5
सरन्यायाधीश गवई यांच्यानंतर पुढचे सरन्यायाधीश कोण असतील? सरकारने केली मोठी घोषणा
6
Bihar Election: नितीश कुमारी की, तेजस्वी यादव, बिहारमध्ये कोणाचे सरकार येणार? फलोदी सट्टा बाजाराचा कौल काय?
7
सुटकेचा थरार! ओलीस ठेवलेल्या मुलांना सोडवण्यासाठी पोलिसांचा गोळीबार; आरोपी रोहित आर्यचा मृत्यू
8
"माजी मंत्री दीपक केसरकर यांनी पवईतील किडनॅपरबाबत दिली अशी माहिती, म्हणाले, मी स्वत:…’’  
9
IND vs AUS : ऑस्ट्रेलिया ऑलआउट! पण फायनलसाठी टीम इंडियासमोर सेट केलं ३३९ धावांचं टार्गेट
10
Kawasaki: कावासाकी व्हर्सिस-एक्स ३०० भारतात लॉन्च; केटीएम, रॉयल एनफील्डच्या 'या' बाईकशी स्पर्धा!
11
मुंबईत अपहरणाचा थरार: पोलिसांची एकीकडे आरोपीशी चर्चा, दुसरीकडे बाथरूमच्या खिडकीतून एन्ट्री
12
UFO संशोधन की आणखी काही, अमेरिकेच्या हवाई दलाच्या तळावर तीन संशोधकांचा मृत्यू , कारण गूढच राहिले
13
मंदिरांच्या भिंतीवर आय लव्ह मोहम्मद लिहिणारे हिंदू तरुण, पोलिसांनी ठोकल्या बेड्या; नावे आली समोर
14
IPL 2026: रोहित शर्मा KKRच्या वाटेवर? Mumbai Indiansची खास पोस्ट चर्चेत, नेमकं काय घडतंय?
15
"...पेक्षाही अधिक धाडस त्या महिलेत होतं"; इंदिरा गांधींचा उल्लेख करत राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल
16
Crime: पतीच्या मृत्युनंतर पुन्हा पडली प्रेमात; ४० लाखांच्या विम्यासाठी एकुलत्या एक मुलाला संपवलं!
17
Phoebe Litchfield Fastest Century : फीबीचा 'ट्रॅविस हेड पॅटर्न'; विक्रमी शतकानंतर अतरंगी फटका मारताना फसली!
18
बिहारमध्ये प्रचारादरम्यान वाद, गोळीबारात प्रशांत किशोर यांच्या पक्षाच्या नेत्याचा मृत्यू  
19
नगराध्यक्ष निवडणुकीसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा पहिला उमेदवार घोषित, दोन नावे होती चर्चेत 
20
बीचवर स्टंट करणे तरुणाच्या अंगलट; 60 लाखांची मर्सिडीज समुद्रात अडकली, पाहा Video...

३०रुपये रोजंदारीवर घर चालते का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2018 00:01 IST

राष्ट्रीय शालेय पोषण आहार (शापोआ) योजनेंतर्गत ‘शापोआ’ कर्मचाऱ्यांना दर महिन्याला केवळ हजार रुपये मानधन म्हणजे साधारण ३० रुपये रोज मिळतो. एवढ्या कमी पैशात घर चालते का, हा प्रश्न राज्य शालेय पोषण आहार कर्मचारी युनियनच्या महिलांनी उपस्थित करून मानधन वाढीला घेऊन मंगळवारी विधिमंडळावर मोर्चा काढून नारेबाजी करीत लक्ष वेधले.

ठळक मुद्देशालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांचा प्रश्न : विधिमंडळावर रेटून धरल्या मागण्या

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राष्ट्रीय शालेय पोषण आहार (शापोआ) योजनेंतर्गत ‘शापोआ’ कर्मचाऱ्यांना दर महिन्याला केवळ हजार रुपये मानधन म्हणजे साधारण ३० रुपये रोज मिळतो. एवढ्या कमी पैशात घर चालते का, हा प्रश्न राज्य शालेय पोषण आहार कर्मचारी युनियनच्या महिलांनी उपस्थित करून मानधन वाढीला घेऊन मंगळवारी विधिमंडळावर मोर्चा काढून नारेबाजी करीत लक्ष वेधले.या मोर्चाचे नेतृत्व श्याम काळे, विनोद झोडगे, मुगाजी बुरुड, दिलीप उटाणे, बी.के. जाधव, दिवांकर नागपुरे, माधुरी क्षीरसागर, शिवकुमार गणवीर आदींनी केले.शालेय पोषण आहार कर्मचारी गेल्या १४ ते १५ वर्षांपासून ग्रामीण व नगरपरिषदांच्या शाळांमध्ये शालेय पोषण आहार शिजविण्याचे काम करीत आहेत. या कामासोबतच कर्मचाºयांना शाळा उघडणे, शाळेची देखरेख करणे, स्वच्छता राखणे, जेवणानंतर विद्यार्थ्यांचे ताट धुण्यापासून ते अनेकवेळा शौचालयही साफ करावे लागते. एवढे काम करूनही हाती केवळ महिन्याकाठी हजार रुपये पडतात. विशेष म्हणजे, शासनाने दोनदा आहार खर्चाच्या निधीमध्ये वाढ केली, परंतु स्वयंपाकी महिलांचे मानधन वाढविले नाही. याचा विरोध म्हणून महाराष्ट्र राज्य शालेय पोषण आहार कर्मचारी युनियनच्यावतीने (आयटक) विधिमंडळावर मोर्चा काढला. मोर्चाच्या शिष्टमंडळाचे म्हणणे आहे की, २०१६ मध्ये पाच हजार मानधन वाढीच्या प्रस्तावाला घेऊन शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी बैठक घेतली. परंतु निर्णय होऊ शकला नाही. ‘शापोआ’ कर्मचाऱ्यांना पाँडेचेरी राज्यात १४ हजार, केरळमध्ये १० हजार तर तामिळनाडूमध्ये ७ हजार ७०० रुपये मानधन दिले जाते. परंतु महाराष्ट्रातच स्वयंपाकी कर्मचाऱ्यांशी भेदभाव केला जात आहे.शालेय पोषण आहार  कर्मचाऱ्यांचे मानधन वाढवून सेवेत कायम करा, कर्मचाऱ्यांना १८ हजार रुपये वेतनश्रेणी द्या, नियमित वेळेत, महिन्याच्या पाच तारखेच्या आत मानधन द्या, कर्मचाऱ्यांना कमी करणाऱ्या शाळा व्यवस्थापन समिती मुख्यध्यापकांविरुद्ध कारवाई करा आदी मागण्या या मोर्चाच्या वतीने करण्यात आल्या.

टॅग्स :Nagpur Monsoon Session 2018नागपूर पावसाळी अधिवेशन २०१८Morchaमोर्चा