शहरं
Join us  
Trending Stories
1
ICC Womens World Cup 2025 : टीम इंडियाची विजयी सलामी! दीप्ती-अमनजोतसह राणाचा अष्टपैलू बाणा
2
"हमासकडे शेवटचे ३-४ दिवस शिल्लक, जर त्यांनी ऐकलं नाही तर..."; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट धमकी
3
World Cup की सौंदर्य स्पर्धा... 'या' ८ महिला क्रिकेटर्सना बघून म्हणाल- हिरोईन दिसते हिरोईन!
4
धनगर आरक्षणासाठी तरूणाने स्वतःची कार जाळून केला सरकारचा तीव्र निषेध; जालना तालुक्यातील घटना
5
शिर्डीत ५६ भिक्षेकरी पोलिसांच्या ताब्यात; महाराष्ट्रासह ७ राज्यांतील भिक्षेकऱ्यांचा समावेश
6
आमची ट्रॉफी, मेडल्स आम्हाला परत द्या... BCCI चा मोहसीन नक्वी यांना इशारा, ACC बैठकीत राडा
7
ग्राहक न्यायालयाच्या लाचखाेर लिपिकास एक वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा; ठाण्यातील प्रकरण
8
कापूस खरेदीस ‘पणन’ला परवानगी; लवकरच सीसीआयसोबत करार; आर्थिक मदतीची मागणी
9
मोहसीन नक्वी यांनी अखेर टीम इंडियापुढे गुडघे टेकले... भारताचा मोठा विजय! बैठकीत काय घडलं?
10
'मला मंगळसूत्र चोर म्हणता, कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं ते सांगा'; पडळकरांची जयंत पाटील यांच्यावर टीका
11
ऑक्टोबर महिन्यात पाऊस आणखी झोडपणार, हवामान खात्याने दिली धडकी भरवणारी माहिती 
12
‘राहुल गांधींना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्यास कठोर शिक्षा करा, त्यांच्या सुरक्षेत वाढ करा’, काँग्रेसचं लोकसभा अध्यक्षांना पत्र  
13
ट्रम्प यांच्या निर्णयाचा भारताला फायदा; अमेरिकन कंपन्या भारतात शिफ्ट होण्याच्या तयारीत
14
ठाकरे बंधूंच्या युतीसंदर्भात संजय राऊतांचं सूचक विधान, दसऱ्याला...! स्पष्टच बोलले
15
पहलगाम हल्ल्यानंतर १६० दिवसांनी काश्मीरमधील 'ही' १२ पर्यटनस्थळे पुन्हा पर्यटकांसाठी खुली
16
सचिन तेंडुलकरसारखी मॅचविनर खेळी करून रायगड जिल्हयात पक्षाला बळ देऊ- सुनिल तटकरे
17
नागपूरमधील प्रकल्प इतर राज्यांकडे वळण्याच्या प्रयत्नात ? ८८४४ कोटींचे प्रकल्प जमिनीअभावी अडकले !
18
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
19
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?
20
भरधाव कारचा भीषण अपघातात! अनेक वेळा उलटल्यानं चुराडा, तरुणीही दूर फेकली गेली; बघा VIDEO

३० कैदी नागपूर मध्यवर्ती कारागृहातून बाहेर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2020 07:00 IST

सात वर्षांपर्यंत शिक्षा सुनावण्यात आल्यामुळे कारागृहात बंद असलेल्या कैद्यांच्या सुटकेचा मार्ग अखेर मोकळा झाला. राज्य शासनाने शनिवारी सायंकाळी राज्य कारागृह प्रशासनाला दिलेल्या निर्देशांनुसार ठिकठिकाणच्या हजारो बंदिवानांना कारागृहातून जामिनावर सोडण्याची प्रक्रिया सुरू केली.

ठळक मुद्देकोरोनाचा धोका असल्याने सध्या आॅटो, बसेस उपलब्ध नाही. त्यामुळे स्थानिक कैद्यांना शहर पोलीस आणि बाहेरच्या कैद्यांना ग्रामीण पोलिसांच्या मदतीने त्यांच्या गावात नेऊन सोडणार असल्याचेही अधीक्षक कुमरे यांनी स्पष्ट केले.

नरेश डोंगरेलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सात वर्षांपर्यंत शिक्षा सुनावण्यात आल्यामुळे कारागृहात बंद असलेल्या कैद्यांच्या सुटकेचा मार्ग अखेर मोकळा झाला. राज्य शासनाने शनिवारी सायंकाळी राज्य कारागृह प्रशासनाला दिलेल्या निर्देशांनुसार ठिकठिकाणच्या हजारो बंदिवानांना कारागृहातून जामिनावर सोडण्याची प्रक्रिया सुरू केली. या पार्श्वभूमीवर नागपूर मध्यवर्ती कारागृहात बंदिस्त असलेल्या आणि चांगले वर्तन असलेल्या ३० कैद्यांना क्रमश: जामिनावर सोडण्याची प्रक्रिया रविवारी रात्रीपर्यंत सुरू होती.कोरोना कारागृहात शिरू नये म्हणून विविध उपाययोजना करण्यात आल्या होत्या. न्यायालयाने ठरवून दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वानुसार ठिकठिकाणी कमिट्या तयार झाल्या. सात वर्षापर्यंतची शिक्षा ज्या गुन्ह्यात आहे, अशा गुन्ह्यातील न्यायाधीन बंदिवानांना कारागृहातून जामिनावर सोडण्याचा निर्णय या समितीने घ्यावयाचा होता. त्यानुसार, राज्यातील हजारो कैद्यांना जामिनावर सोडण्यात आले. दुसऱ्या निर्णयानुसार ज्या कैद्यांना सात वर्षापर्यंत शिक्षा ठोठावण्यात आली आणि ज्यांचे वर्तन चांगले आहे, ते सुधारण्याच्या मार्गावर आहे, अशा कैद्यांनाही कारागृहातून जामिनावर सोडण्यासाठी निर्णय घेण्याचे आदेश होते. त्यानुसार प्रत्येक कारागृह प्रशासनाकडून चांगल्या वर्तन असलेल्या कैद्यांची यादी तयार करण्यात आली होती. मात्र, कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत असल्याने तो रोखण्यासाठी करण्यात येणाºया उपाययोजनांच्या गडबडीत राज्य सरकार आणि प्रशासन गुंतून पडले होते. त्यामुळे हा निर्णय रखडला होता. शनिवारी सायंकाळी या संबंधाने राज्य सरकारने कारागृह प्रशासनाला संबंधित कैद्यांना सोडण्याविषयीचे आदेश जारी केले. त्यानुसार, रविवारी दुपारपासून वेगवेगळ्या कारागृहात कैद्यांना सोडण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली.९ महिलांसह २५९ कैद्यांना लाभनागपूरच्या मध्यवर्ती कारागृहात बंदिस्त असलेल्या कैद्यांपैकी २५९ कैद्यांना या निर्णयाचा लाभ मिळणार आहे. त्यात नऊ महिला कैद्यांचाही समावेश आहे. कारागृहात राहून ज्यांनी आपले वर्तन चांगले ठेवले, वेळोवेळी नियमांचे पालन केले, तसेच फरलो आणि पॅरोलवर गेल्यानंतर नियोजित तारखेला बिनचूकपणे जे कैदी कारागृहात परत आले, अशांनाच या निर्णयाचा लाभ मिळणार असल्याची माहिती कारागृहाचे अधीक्षक अनुपकुमार कुमरे यांनी ‘लोकमत'ला दिली. 

 

टॅग्स :jailतुरुंग