शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

३० कैदी नागपूर मध्यवर्ती कारागृहातून बाहेर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2020 07:00 IST

सात वर्षांपर्यंत शिक्षा सुनावण्यात आल्यामुळे कारागृहात बंद असलेल्या कैद्यांच्या सुटकेचा मार्ग अखेर मोकळा झाला. राज्य शासनाने शनिवारी सायंकाळी राज्य कारागृह प्रशासनाला दिलेल्या निर्देशांनुसार ठिकठिकाणच्या हजारो बंदिवानांना कारागृहातून जामिनावर सोडण्याची प्रक्रिया सुरू केली.

ठळक मुद्देकोरोनाचा धोका असल्याने सध्या आॅटो, बसेस उपलब्ध नाही. त्यामुळे स्थानिक कैद्यांना शहर पोलीस आणि बाहेरच्या कैद्यांना ग्रामीण पोलिसांच्या मदतीने त्यांच्या गावात नेऊन सोडणार असल्याचेही अधीक्षक कुमरे यांनी स्पष्ट केले.

नरेश डोंगरेलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सात वर्षांपर्यंत शिक्षा सुनावण्यात आल्यामुळे कारागृहात बंद असलेल्या कैद्यांच्या सुटकेचा मार्ग अखेर मोकळा झाला. राज्य शासनाने शनिवारी सायंकाळी राज्य कारागृह प्रशासनाला दिलेल्या निर्देशांनुसार ठिकठिकाणच्या हजारो बंदिवानांना कारागृहातून जामिनावर सोडण्याची प्रक्रिया सुरू केली. या पार्श्वभूमीवर नागपूर मध्यवर्ती कारागृहात बंदिस्त असलेल्या आणि चांगले वर्तन असलेल्या ३० कैद्यांना क्रमश: जामिनावर सोडण्याची प्रक्रिया रविवारी रात्रीपर्यंत सुरू होती.कोरोना कारागृहात शिरू नये म्हणून विविध उपाययोजना करण्यात आल्या होत्या. न्यायालयाने ठरवून दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वानुसार ठिकठिकाणी कमिट्या तयार झाल्या. सात वर्षापर्यंतची शिक्षा ज्या गुन्ह्यात आहे, अशा गुन्ह्यातील न्यायाधीन बंदिवानांना कारागृहातून जामिनावर सोडण्याचा निर्णय या समितीने घ्यावयाचा होता. त्यानुसार, राज्यातील हजारो कैद्यांना जामिनावर सोडण्यात आले. दुसऱ्या निर्णयानुसार ज्या कैद्यांना सात वर्षापर्यंत शिक्षा ठोठावण्यात आली आणि ज्यांचे वर्तन चांगले आहे, ते सुधारण्याच्या मार्गावर आहे, अशा कैद्यांनाही कारागृहातून जामिनावर सोडण्यासाठी निर्णय घेण्याचे आदेश होते. त्यानुसार प्रत्येक कारागृह प्रशासनाकडून चांगल्या वर्तन असलेल्या कैद्यांची यादी तयार करण्यात आली होती. मात्र, कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत असल्याने तो रोखण्यासाठी करण्यात येणाºया उपाययोजनांच्या गडबडीत राज्य सरकार आणि प्रशासन गुंतून पडले होते. त्यामुळे हा निर्णय रखडला होता. शनिवारी सायंकाळी या संबंधाने राज्य सरकारने कारागृह प्रशासनाला संबंधित कैद्यांना सोडण्याविषयीचे आदेश जारी केले. त्यानुसार, रविवारी दुपारपासून वेगवेगळ्या कारागृहात कैद्यांना सोडण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली.९ महिलांसह २५९ कैद्यांना लाभनागपूरच्या मध्यवर्ती कारागृहात बंदिस्त असलेल्या कैद्यांपैकी २५९ कैद्यांना या निर्णयाचा लाभ मिळणार आहे. त्यात नऊ महिला कैद्यांचाही समावेश आहे. कारागृहात राहून ज्यांनी आपले वर्तन चांगले ठेवले, वेळोवेळी नियमांचे पालन केले, तसेच फरलो आणि पॅरोलवर गेल्यानंतर नियोजित तारखेला बिनचूकपणे जे कैदी कारागृहात परत आले, अशांनाच या निर्णयाचा लाभ मिळणार असल्याची माहिती कारागृहाचे अधीक्षक अनुपकुमार कुमरे यांनी ‘लोकमत'ला दिली. 

 

टॅग्स :jailतुरुंग