शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
2
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
3
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
4
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
5
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
6
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
7
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
8
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
9
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
10
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
11
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
12
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
13
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
14
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
15
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
16
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
17
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
18
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
19
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
20
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
Daily Top 2Weekly Top 5

३० कैदी नागपूर मध्यवर्ती कारागृहातून बाहेर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2020 07:00 IST

सात वर्षांपर्यंत शिक्षा सुनावण्यात आल्यामुळे कारागृहात बंद असलेल्या कैद्यांच्या सुटकेचा मार्ग अखेर मोकळा झाला. राज्य शासनाने शनिवारी सायंकाळी राज्य कारागृह प्रशासनाला दिलेल्या निर्देशांनुसार ठिकठिकाणच्या हजारो बंदिवानांना कारागृहातून जामिनावर सोडण्याची प्रक्रिया सुरू केली.

ठळक मुद्देकोरोनाचा धोका असल्याने सध्या आॅटो, बसेस उपलब्ध नाही. त्यामुळे स्थानिक कैद्यांना शहर पोलीस आणि बाहेरच्या कैद्यांना ग्रामीण पोलिसांच्या मदतीने त्यांच्या गावात नेऊन सोडणार असल्याचेही अधीक्षक कुमरे यांनी स्पष्ट केले.

नरेश डोंगरेलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सात वर्षांपर्यंत शिक्षा सुनावण्यात आल्यामुळे कारागृहात बंद असलेल्या कैद्यांच्या सुटकेचा मार्ग अखेर मोकळा झाला. राज्य शासनाने शनिवारी सायंकाळी राज्य कारागृह प्रशासनाला दिलेल्या निर्देशांनुसार ठिकठिकाणच्या हजारो बंदिवानांना कारागृहातून जामिनावर सोडण्याची प्रक्रिया सुरू केली. या पार्श्वभूमीवर नागपूर मध्यवर्ती कारागृहात बंदिस्त असलेल्या आणि चांगले वर्तन असलेल्या ३० कैद्यांना क्रमश: जामिनावर सोडण्याची प्रक्रिया रविवारी रात्रीपर्यंत सुरू होती.कोरोना कारागृहात शिरू नये म्हणून विविध उपाययोजना करण्यात आल्या होत्या. न्यायालयाने ठरवून दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वानुसार ठिकठिकाणी कमिट्या तयार झाल्या. सात वर्षापर्यंतची शिक्षा ज्या गुन्ह्यात आहे, अशा गुन्ह्यातील न्यायाधीन बंदिवानांना कारागृहातून जामिनावर सोडण्याचा निर्णय या समितीने घ्यावयाचा होता. त्यानुसार, राज्यातील हजारो कैद्यांना जामिनावर सोडण्यात आले. दुसऱ्या निर्णयानुसार ज्या कैद्यांना सात वर्षापर्यंत शिक्षा ठोठावण्यात आली आणि ज्यांचे वर्तन चांगले आहे, ते सुधारण्याच्या मार्गावर आहे, अशा कैद्यांनाही कारागृहातून जामिनावर सोडण्यासाठी निर्णय घेण्याचे आदेश होते. त्यानुसार प्रत्येक कारागृह प्रशासनाकडून चांगल्या वर्तन असलेल्या कैद्यांची यादी तयार करण्यात आली होती. मात्र, कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत असल्याने तो रोखण्यासाठी करण्यात येणाºया उपाययोजनांच्या गडबडीत राज्य सरकार आणि प्रशासन गुंतून पडले होते. त्यामुळे हा निर्णय रखडला होता. शनिवारी सायंकाळी या संबंधाने राज्य सरकारने कारागृह प्रशासनाला संबंधित कैद्यांना सोडण्याविषयीचे आदेश जारी केले. त्यानुसार, रविवारी दुपारपासून वेगवेगळ्या कारागृहात कैद्यांना सोडण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली.९ महिलांसह २५९ कैद्यांना लाभनागपूरच्या मध्यवर्ती कारागृहात बंदिस्त असलेल्या कैद्यांपैकी २५९ कैद्यांना या निर्णयाचा लाभ मिळणार आहे. त्यात नऊ महिला कैद्यांचाही समावेश आहे. कारागृहात राहून ज्यांनी आपले वर्तन चांगले ठेवले, वेळोवेळी नियमांचे पालन केले, तसेच फरलो आणि पॅरोलवर गेल्यानंतर नियोजित तारखेला बिनचूकपणे जे कैदी कारागृहात परत आले, अशांनाच या निर्णयाचा लाभ मिळणार असल्याची माहिती कारागृहाचे अधीक्षक अनुपकुमार कुमरे यांनी ‘लोकमत'ला दिली. 

 

टॅग्स :jailतुरुंग