शहरं
Join us  
Trending Stories
1
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
2
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
3
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
4
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
5
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...
6
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
7
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
8
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
9
"एनआरसी सारखे षड्‍यंत्र..."; बिहारमधील मतदार यादीवरून ममता बॅनर्जी यांचा निवडणूक आयोगाला टोला
10
'अमेरिकेच्या थोबाडीत मारली...', युद्धविराम जाहीर केल्यानंतर खामेनी यांनी केला विजयाचा दावा
11
..त्यामुळे हिंदी सक्तीचे नकोच; राज्य शासनाने हट्ट सोडावा, शरद पवार यांचा सल्ला 
12
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
13
इतिहास घडला! 'ड्रॅगन'मधून शुभांशु शुक्ला आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पोहोचले, १४ दिवस करणार संशोधन
14
"हिंदी कुठल्याही भाषेची शत्रू नाही..."; भाषावादावर पुन्हा एकदा अमित शाह स्पष्ट बोलले
15
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
16
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
17
२८ जुलैपर्यंत मंगळ राहु-केतु अशुभ योग: ८ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; शुभ-कल्याणाचा काळ!
18
दोन दिग्गज एकत्र आले; अदानी-अंबानी यांच्यात मोठा करार, 'या' क्षेत्रात क्रांती घडणार...
19
"राज्यात मराठीच सक्तीची, पण..."; त्रिभाषा सूत्रावरून भाजपाने स्पष्ट केली भूमिका
20
काँग्रेस नेते शशी थरुर अचानक रशिया दौऱ्यावर; रशियन परराष्ट्र मंत्र्यांची घेतली भेट, कारण काय?

बालसुधार गृहातून ३० मुले पळाली

By admin | Updated: April 25, 2016 02:33 IST

जरीपटक्यातील बाल सुधार गृहाच्या सुरक्षा रक्षक आणि कर्मचाऱ्यांना मारहाण करून ३० मुले पळून गेली.

कर्मचाऱ्यांच्या डोळ्यात तिखट फेकले; मारहाणही केलीनागपूर : जरीपटक्यातील बाल सुधार गृहाच्या सुरक्षा रक्षक आणि कर्मचाऱ्यांना मारहाण करून ३० मुले पळून गेली. पळून गेलेल्यात अनेक गंभीर गुन्ह्यांमध्ये ताब्यात घेतलेल्या अल्पवयीन आरोपींचाही समावेश आहे. रविवारी रात्री ९ च्या सुमारास ही घटना घडली. त्यामुळे प्रशासनात प्रचंड खळबळ निर्माण झाली आहे.जरीपटक्यातील पाटणकर चौकात हे शासकीय बाल सुधार गृह आहे. तेथे अनाथ, पोलिसांना सापडलेली तसेच विविध गुन्ह्याच्या आरोपात पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या विधी संघर्षग्रस्त (अल्पवयीन) मुलांना ठेवले जाते. सकाळी आणि रात्री जेवणाच्या वेळी त्यांना पुरती मोकळीक मिळते. रविवारी रात्री ८.३० ते ९ च्या सुमारास जेवणाची तयारी सुरू असताना त्यांना नेहमीप्रमाणे एकत्रित करण्यात आले. यावेळी बाल सुधार गृहात सुरक्षा रक्षकासह मोजकेच कर्मचारी होते. ही संधी साधून काही मुलांनी त्यांच्या डोळ्यात मिरची पावडर फेकली आणि काहींनी कर्मचाऱ्यांना बेदम चोप देत सुधार गृहातून पलायन केले. तब्बल ३० मुले सुधार गृहातून पळाल्याने हादरलेल्या कर्मचाऱ्यांनी सुधार गृहाच्या व्यवस्थापकांना कळविले. त्यांनी जरीपटका पोलिसांना माहिती दिली. जरीपटका पोलिसांनी वायरलेसवरून शहरातील सर्व ठाण्यांना माहिती देऊन संशयास्पद अवस्थेत दिसणाऱ्या मुलांना पकडण्याबाबत सूचना दिल्या. त्यानंतर हादरलेल्या शहर पोलीस यंत्रणेने विविध भागात कसून तपास सुरू केला. जागोजागी नाकाबंदी केली. (प्रतिनिधी)अनेक जण चड्डी-बनियानवर पळालेल्या मुलांमध्ये खून, सामूहिक बलात्कार, जबरी चोरी अशा गंभीर गुन्ह्यात पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या आणि सुधार गृहात ठेवलेल्या काही बाल आरोपींचाही समावेश आहे. जेवणाच्या वेळी अनेक मुले चड्डी किंवा बरमुडा अन् बनियानवर असतात. तशाच अवस्थेत त्यांनी येथून पळ काढला. त्यांना शोधण्याचे काम पोलीस करीत होते. ९ परतले, १० पकडलेपळून गेलेल्यांपैकी काही वेळेतच ९ मुले स्वत:हून सुधार गृहात परतली तर, १० मुलांना वेगवेगळ्या भागात पकडण्यात आले. ११ जणांचा जागोजागी शोध घेतला जात होता. विशेष म्हणजे, काही दिवसांपूर्वी अशाच पद्धतीने कर्मचाऱ्यांना मारहाण करून गिट्टीखदानमधील एका सुधार गृहातून काही मुले पळून गेली होती. त्यात शहरातील सर्वच सुधार गृह, अनाथालयातून अधूनमधून मुले पळून जातात.