शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
2
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
3
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
4
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
5
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
6
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
7
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
8
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
9
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
10
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
11
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
12
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
13
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
14
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
15
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
16
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
17
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
18
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
19
'या' मराठी अभिनेत्रीनं वर्षभर लपवून ठेवलं होतं स्वत:चं लग्न, कोणालाही लागला नाही पत्ता!
20
iPhone 17 सीरिजवर मोठी सवलत; आजपासून प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या डिटेल्स...

बालसुधार गृहातून ३० मुले पळाली

By admin | Updated: April 25, 2016 02:33 IST

जरीपटक्यातील बाल सुधार गृहाच्या सुरक्षा रक्षक आणि कर्मचाऱ्यांना मारहाण करून ३० मुले पळून गेली.

कर्मचाऱ्यांच्या डोळ्यात तिखट फेकले; मारहाणही केलीनागपूर : जरीपटक्यातील बाल सुधार गृहाच्या सुरक्षा रक्षक आणि कर्मचाऱ्यांना मारहाण करून ३० मुले पळून गेली. पळून गेलेल्यात अनेक गंभीर गुन्ह्यांमध्ये ताब्यात घेतलेल्या अल्पवयीन आरोपींचाही समावेश आहे. रविवारी रात्री ९ च्या सुमारास ही घटना घडली. त्यामुळे प्रशासनात प्रचंड खळबळ निर्माण झाली आहे.जरीपटक्यातील पाटणकर चौकात हे शासकीय बाल सुधार गृह आहे. तेथे अनाथ, पोलिसांना सापडलेली तसेच विविध गुन्ह्याच्या आरोपात पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या विधी संघर्षग्रस्त (अल्पवयीन) मुलांना ठेवले जाते. सकाळी आणि रात्री जेवणाच्या वेळी त्यांना पुरती मोकळीक मिळते. रविवारी रात्री ८.३० ते ९ च्या सुमारास जेवणाची तयारी सुरू असताना त्यांना नेहमीप्रमाणे एकत्रित करण्यात आले. यावेळी बाल सुधार गृहात सुरक्षा रक्षकासह मोजकेच कर्मचारी होते. ही संधी साधून काही मुलांनी त्यांच्या डोळ्यात मिरची पावडर फेकली आणि काहींनी कर्मचाऱ्यांना बेदम चोप देत सुधार गृहातून पलायन केले. तब्बल ३० मुले सुधार गृहातून पळाल्याने हादरलेल्या कर्मचाऱ्यांनी सुधार गृहाच्या व्यवस्थापकांना कळविले. त्यांनी जरीपटका पोलिसांना माहिती दिली. जरीपटका पोलिसांनी वायरलेसवरून शहरातील सर्व ठाण्यांना माहिती देऊन संशयास्पद अवस्थेत दिसणाऱ्या मुलांना पकडण्याबाबत सूचना दिल्या. त्यानंतर हादरलेल्या शहर पोलीस यंत्रणेने विविध भागात कसून तपास सुरू केला. जागोजागी नाकाबंदी केली. (प्रतिनिधी)अनेक जण चड्डी-बनियानवर पळालेल्या मुलांमध्ये खून, सामूहिक बलात्कार, जबरी चोरी अशा गंभीर गुन्ह्यात पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या आणि सुधार गृहात ठेवलेल्या काही बाल आरोपींचाही समावेश आहे. जेवणाच्या वेळी अनेक मुले चड्डी किंवा बरमुडा अन् बनियानवर असतात. तशाच अवस्थेत त्यांनी येथून पळ काढला. त्यांना शोधण्याचे काम पोलीस करीत होते. ९ परतले, १० पकडलेपळून गेलेल्यांपैकी काही वेळेतच ९ मुले स्वत:हून सुधार गृहात परतली तर, १० मुलांना वेगवेगळ्या भागात पकडण्यात आले. ११ जणांचा जागोजागी शोध घेतला जात होता. विशेष म्हणजे, काही दिवसांपूर्वी अशाच पद्धतीने कर्मचाऱ्यांना मारहाण करून गिट्टीखदानमधील एका सुधार गृहातून काही मुले पळून गेली होती. त्यात शहरातील सर्वच सुधार गृह, अनाथालयातून अधूनमधून मुले पळून जातात.